शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:55 IST

तालुकास्तरावर दिलेली फिर्याद कमकुवत

जळगाव : रावेर मधील तीन गोडावूनवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह छापा टाकून ११८ क्विंटल धान्यसाठा जप्त केल्याप्रकरणात जिल्हा प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे तालुकास्तरावरच याबाबत तक्रार नोंदविण्याची व तपासाची कारवाई सुरू झाली. त्यामुळे रेशन माफियांविरोधात शासनाकडून प्रभावीपणे बाजूच मांडली न गेल्याने त्यांची लगेचच जामीनावर सुटका झाल्याने या माफियांना जीवदानच मिळाले आहे. रेशनचे धान्य परराज्यात काळ्याबाजारात विकणारे रॅकट उध्वस्त करण्याची संधी त्यामुळे प्रशासनाने गमावली आहे.गोडावूनवर छापे टाकून धान्यसाठा जप्त करण्यात आला होता. त्यात पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आला होता. तर गोडावून क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसºया गोडावूनमध्ये मका साठवला असल्याचे आढळून आले होते.फिर्याद तालुकास्तरीय अधिकाºयाकडूनमहिनाभरापासून या रेशनमाफियांवर लक्ष ठेवून छाप्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्यावर कारवाई करीत आहोत, ते सर्व परराज्यात रेशनची विक्री करणाºया साखळीचा भाग असल्याचे माहिती होते. जर तालुकास्तरावर कारवाई झाली असती तर वर्षानुवर्ष हा रेशनचा काळाबाजार सुरूच राहू शकला नसता. मात्र तरीही पोलिसांत फिर्याद देण्याची जबाबदारी तालुकास्तरावर सोपवून वरिष्ठ मोकळे झाले. त्यामुळेच आरोपींना जामीन मिळविणे सोपे गेल्याची चर्चा आहे.जिल्हाधिकाºयांकडून तपासणीचे आदेशया कारवाईनंतर जिल्हाधिकाºयांनी सर्व रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार यावल व रावेर तालुक्यातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात रावेर तालुक्यातील १६ दुकानांचे परवाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घातले तरच मूळ दोषींवर कठोर कारवाई शक्य आहे.कागदावर एक अन ओठांवर एकया प्रकरणातील संशयित आरोपी विलास चौधरी, बाळकृष्ण नेवे व विलास पाटील यांना जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ६-ब खाली नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर केले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासमोर संशयितांनी कान धरून माफीही मागितली. मात्र खुलाश्यामध्ये मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे कागदावर एक आणि ओठांवर एक असेच चित्र आहे. आता ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.साखर आली कुठून?पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखर आढळून आले. मात्र नेवे व चौधरी यांनी ते गोडावून त्यांचे नसल्याचे सांगितले. तर विलास पाटील यांनी जागा भाड्याने घेऊन त्यावर हे गोडावून बांधले असल्याचे सांगत गहू व तांदूळ त्यांचा आहे. मात्र साखर त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साखर आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव