शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:55 IST

तालुकास्तरावर दिलेली फिर्याद कमकुवत

जळगाव : रावेर मधील तीन गोडावूनवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह छापा टाकून ११८ क्विंटल धान्यसाठा जप्त केल्याप्रकरणात जिल्हा प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे तालुकास्तरावरच याबाबत तक्रार नोंदविण्याची व तपासाची कारवाई सुरू झाली. त्यामुळे रेशन माफियांविरोधात शासनाकडून प्रभावीपणे बाजूच मांडली न गेल्याने त्यांची लगेचच जामीनावर सुटका झाल्याने या माफियांना जीवदानच मिळाले आहे. रेशनचे धान्य परराज्यात काळ्याबाजारात विकणारे रॅकट उध्वस्त करण्याची संधी त्यामुळे प्रशासनाने गमावली आहे.गोडावूनवर छापे टाकून धान्यसाठा जप्त करण्यात आला होता. त्यात पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आला होता. तर गोडावून क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसºया गोडावूनमध्ये मका साठवला असल्याचे आढळून आले होते.फिर्याद तालुकास्तरीय अधिकाºयाकडूनमहिनाभरापासून या रेशनमाफियांवर लक्ष ठेवून छाप्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्यावर कारवाई करीत आहोत, ते सर्व परराज्यात रेशनची विक्री करणाºया साखळीचा भाग असल्याचे माहिती होते. जर तालुकास्तरावर कारवाई झाली असती तर वर्षानुवर्ष हा रेशनचा काळाबाजार सुरूच राहू शकला नसता. मात्र तरीही पोलिसांत फिर्याद देण्याची जबाबदारी तालुकास्तरावर सोपवून वरिष्ठ मोकळे झाले. त्यामुळेच आरोपींना जामीन मिळविणे सोपे गेल्याची चर्चा आहे.जिल्हाधिकाºयांकडून तपासणीचे आदेशया कारवाईनंतर जिल्हाधिकाºयांनी सर्व रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार यावल व रावेर तालुक्यातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात रावेर तालुक्यातील १६ दुकानांचे परवाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घातले तरच मूळ दोषींवर कठोर कारवाई शक्य आहे.कागदावर एक अन ओठांवर एकया प्रकरणातील संशयित आरोपी विलास चौधरी, बाळकृष्ण नेवे व विलास पाटील यांना जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ६-ब खाली नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर केले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासमोर संशयितांनी कान धरून माफीही मागितली. मात्र खुलाश्यामध्ये मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे कागदावर एक आणि ओठांवर एक असेच चित्र आहे. आता ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.साखर आली कुठून?पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखर आढळून आले. मात्र नेवे व चौधरी यांनी ते गोडावून त्यांचे नसल्याचे सांगितले. तर विलास पाटील यांनी जागा भाड्याने घेऊन त्यावर हे गोडावून बांधले असल्याचे सांगत गहू व तांदूळ त्यांचा आहे. मात्र साखर त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साखर आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव