शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:55 IST

तालुकास्तरावर दिलेली फिर्याद कमकुवत

जळगाव : रावेर मधील तीन गोडावूनवर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी इतर अधिकाऱ्यांसह छापा टाकून ११८ क्विंटल धान्यसाठा जप्त केल्याप्रकरणात जिल्हा प्रशासनाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे तालुकास्तरावरच याबाबत तक्रार नोंदविण्याची व तपासाची कारवाई सुरू झाली. त्यामुळे रेशन माफियांविरोधात शासनाकडून प्रभावीपणे बाजूच मांडली न गेल्याने त्यांची लगेचच जामीनावर सुटका झाल्याने या माफियांना जीवदानच मिळाले आहे. रेशनचे धान्य परराज्यात काळ्याबाजारात विकणारे रॅकट उध्वस्त करण्याची संधी त्यामुळे प्रशासनाने गमावली आहे.गोडावूनवर छापे टाकून धान्यसाठा जप्त करण्यात आला होता. त्यात पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखरेचा साठा आढळून आला होता. तर गोडावून क्र.२ मध्ये गहू व हरभरा तर तिसºया गोडावूनमध्ये मका साठवला असल्याचे आढळून आले होते.फिर्याद तालुकास्तरीय अधिकाºयाकडूनमहिनाभरापासून या रेशनमाफियांवर लक्ष ठेवून छाप्याची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे ज्यांच्यावर कारवाई करीत आहोत, ते सर्व परराज्यात रेशनची विक्री करणाºया साखळीचा भाग असल्याचे माहिती होते. जर तालुकास्तरावर कारवाई झाली असती तर वर्षानुवर्ष हा रेशनचा काळाबाजार सुरूच राहू शकला नसता. मात्र तरीही पोलिसांत फिर्याद देण्याची जबाबदारी तालुकास्तरावर सोपवून वरिष्ठ मोकळे झाले. त्यामुळेच आरोपींना जामीन मिळविणे सोपे गेल्याची चर्चा आहे.जिल्हाधिकाºयांकडून तपासणीचे आदेशया कारवाईनंतर जिल्हाधिकाºयांनी सर्व रेशन दुकानांच्या तपासणीचे आदेश दिले. त्यानुसार यावल व रावेर तालुक्यातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यात रावेर तालुक्यातील १६ दुकानांचे परवाने जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणी जिल्हाधिकाºयांनी स्वत: लक्ष घातले तरच मूळ दोषींवर कठोर कारवाई शक्य आहे.कागदावर एक अन ओठांवर एकया प्रकरणातील संशयित आरोपी विलास चौधरी, बाळकृष्ण नेवे व विलास पाटील यांना जिवनावश्यक वस्तू कायदा कलम ६-ब खाली नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार त्यांनी ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून लेखी म्हणणे सादर केले. तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांच्यासमोर संशयितांनी कान धरून माफीही मागितली. मात्र खुलाश्यामध्ये मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यामुळे कागदावर एक आणि ओठांवर एक असेच चित्र आहे. आता ९ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.साखर आली कुठून?पहिल्या गोडावूनमध्ये गहू, तांदूळ व साखर आढळून आले. मात्र नेवे व चौधरी यांनी ते गोडावून त्यांचे नसल्याचे सांगितले. तर विलास पाटील यांनी जागा भाड्याने घेऊन त्यावर हे गोडावून बांधले असल्याचे सांगत गहू व तांदूळ त्यांचा आहे. मात्र साखर त्यांची नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे साखर आली कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव