शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

जागा खाली करण्यासाठी कंडारेच्या हस्तकांकडून खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल ...

जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

बीएचआर संस्था अवसायनात गेल्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभागाने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून संस्थेवर निवड केली. निवड झाल्याबरोबर कंडारे याने संस्थेच्या मालकीच्या किती शाखा आहेत, किती शाखेवर स्वमालकी आहे व किती भाड्याच्या जागेत सुरु आहेत याची माहिती काढली.

संस्थेच्या मालमत्तेच्या जागा बनावट वेबसाईट तयार करुन कवडीमोल भावात जवळच्या व्यक्तींना विक्री केल्याचा सपाटा लावल्यानंतर त्याच्यासोबतच भाड्याच्या जागा खाली करण्यासाठी मुळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये खंडणीच्या स्वरुपात रक्कम घेतली जात होती. त्यासाठी कंडारे याने कार्यालयात काम करणारा जवळच्या व्यक्तीला हस्तक नेमले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशी होती एमओबी

बीएचआर संस्थेला शाखा सुरु करण्यासाठी मालकांनी १० ते १५ वर्षाचा करार केलेला होता. या करारामुळे संस्था व मालक एकमेकांशी बांधील होते. मात्र मध्येच संस्था अवसायनात गेल्याने संस्थेच्या सर्व २६४ शाखा बंद करण्यात आल्या. त्यामुळे जागा मालकांचे भाडेदेखील थांबले. दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला जागा भाड्याने द्यायची असल्यास त्यासाठी बीएचआरने जागा खाली करणे अपेक्षित होते. मालक प्रशासकांकडे जावून जागा खाली करण्याची विनंती करीत होते.

तेव्हा कंडारे अमूक व्यक्तीला भेटा, त्याच्याकडे हे काम सोपविले आहे, असे सांगायचा. या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही करार केला आहे. त्यामुळे कराराची मुदत संपेपर्यंत जागा संस्थेच्या ताब्यातच राहिल. त्याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेचा हा भाग होईल, त्यामुळे तुम्हाला जागा खाली करुन मिळणार नाही असे सांगितले जायचे.

मालकाने एक दोन वेळा चकरा मारल्यानंतर विशिष्ट रक्कम दिल्यानंतर जागा खाली करुन देतो, असे या हस्तकामार्फत जागा मालकापर्यंत निरोप दिला जायचा. मालकही कोर्ट कचेरीची भानगड, त्याशिवाय जागा मिळाल्यास आजच उत्पन्न सुरु होईल, या विचाराने हस्तकाची मागणी पूर्ण केली जायची. त्यानुसार १ ते ३ लाखापर्यंतची रक्कम घेऊन संस्था जागा खाली करुन देत होते.