शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

जागा खाली करण्यासाठी कंडारेच्या हस्तकांकडून खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST

जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल ...

जळगाव : बीएचआर संस्थेच्या शाखा बंद पडल्यानंतर भाडेतत्वावरील जागा परत करण्यासाठी मूळ मालकांकडून कंडारेच्या हस्तकांनी लाखो रुपयांची खंडणी वसुल केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

बीएचआर संस्था अवसायनात गेल्यामुळे केंद्र सरकारच्या सहकार विभागाने जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून संस्थेवर निवड केली. निवड झाल्याबरोबर कंडारे याने संस्थेच्या मालकीच्या किती शाखा आहेत, किती शाखेवर स्वमालकी आहे व किती भाड्याच्या जागेत सुरु आहेत याची माहिती काढली.

संस्थेच्या मालमत्तेच्या जागा बनावट वेबसाईट तयार करुन कवडीमोल भावात जवळच्या व्यक्तींना विक्री केल्याचा सपाटा लावल्यानंतर त्याच्यासोबतच भाड्याच्या जागा खाली करण्यासाठी मुळ मालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये खंडणीच्या स्वरुपात रक्कम घेतली जात होती. त्यासाठी कंडारे याने कार्यालयात काम करणारा जवळच्या व्यक्तीला हस्तक नेमले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अशी होती एमओबी

बीएचआर संस्थेला शाखा सुरु करण्यासाठी मालकांनी १० ते १५ वर्षाचा करार केलेला होता. या करारामुळे संस्था व मालक एकमेकांशी बांधील होते. मात्र मध्येच संस्था अवसायनात गेल्याने संस्थेच्या सर्व २६४ शाखा बंद करण्यात आल्या. त्यामुळे जागा मालकांचे भाडेदेखील थांबले. दुसऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला जागा भाड्याने द्यायची असल्यास त्यासाठी बीएचआरने जागा खाली करणे अपेक्षित होते. मालक प्रशासकांकडे जावून जागा खाली करण्याची विनंती करीत होते.

तेव्हा कंडारे अमूक व्यक्तीला भेटा, त्याच्याकडे हे काम सोपविले आहे, असे सांगायचा. या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्ही करार केला आहे. त्यामुळे कराराची मुदत संपेपर्यंत जागा संस्थेच्या ताब्यातच राहिल. त्याशिवाय न्यायालयीन प्रक्रियेचा हा भाग होईल, त्यामुळे तुम्हाला जागा खाली करुन मिळणार नाही असे सांगितले जायचे.

मालकाने एक दोन वेळा चकरा मारल्यानंतर विशिष्ट रक्कम दिल्यानंतर जागा खाली करुन देतो, असे या हस्तकामार्फत जागा मालकापर्यंत निरोप दिला जायचा. मालकही कोर्ट कचेरीची भानगड, त्याशिवाय जागा मिळाल्यास आजच उत्पन्न सुरु होईल, या विचाराने हस्तकाची मागणी पूर्ण केली जायची. त्यानुसार १ ते ३ लाखापर्यंतची रक्कम घेऊन संस्था जागा खाली करुन देत होते.