शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:55 IST

लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली.

ठळक मुद्देकौटुंबिकतेकडून सांस्कृतिकतेकडे नेणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसादलाडशाखीय वाणी समाजातर्फे उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बागड (मालेगाव) प्रमुख अतिथी होते, तर व्यासपीठावर स्रीरोगतज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रवीण भोकरे, डॉ.महेश वाणी, रवींद्र शिरुडे, नीलेश सोनगिरे, संस्थापक वसंत वाणी, अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव विजय भामरे आदी उपस्थित होते.दिवाळी सण म्हटला की, सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. याव्यतिरिक्त ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सवार्ना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत,विद्या भोई,गायत्री चौधरी,पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.'माझे माहेर पंढरी', 'अबीर गुलाल उधळीत रंग', 'आळंदी वंदीन', 'विघ्नेश्वर तू वरदविनायका' यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी झाली. बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भक्तीमय गीताने सर्वांना आनंददायी मेजवानी दिली. यावेळी उपस्थितांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली.आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण उत्सववादी योजना आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक म्हणजे दिवाळी असून दिवाळीतील फराळ हा आहार परंपरेचा परिपाक आहे. याचा संबंध खाद्य संस्कृतीशीही असून मात्र खाण्यापिण्याची चंगळ सांभाळायला हवी. वातावरणाला अनुरुप व बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाºया विकृतींना प्रतिबंधक काळजी घ्यायला हवी, असे डॉ.विनोद कोतकर यांनी मार्गदर्शनपर सांगितले तर डॉ.प्रवीण भोकरे यांनी थंडीतले निरोगी वातावरण, त्यात मुबलक धनधान्यातून बलवर्धन करणाºया आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला असून हे स्वाभाविक गुण सर्वांनी अवलंबायला हवे असल्याचे सांगितले.शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार प्रत्येकाने करायला हवा.समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह,हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारामागेदेखील दिवाळीतील फराळांमधील साखर व मैदा हे प्रमुख कारण राहिले आहे. आहारात याची प्रमाणशीर काळजी घ्यायला हवी, असे डॉ.भाग्यश्री शिनकर यांनी सांगितले.सूत्रसंचालन कैलास पाखले यांनी, तर आभार प्रा.बी.आर.येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगिरे, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, जयवंत कोतकर, सतीश देव, मनोज शिरुडे, रवींद्र अमृतकर ,बी.के.वाणी, रवी अमृतकर, केशव गोल्हार, अशोक गोल्हार, दिलीप येवले, प्रकाश अमृतकर, हरिचंन्द्र पिंगळे, श्रीधर फुलदेवरे, गजानन कोतकर, प्रशांत बागड आदीनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव