शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

चाळीसगावात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमातून रंगली शब्दसुरांची मेजवानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 16:55 IST

लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली.

ठळक मुद्देकौटुंबिकतेकडून सांस्कृतिकतेकडे नेणाऱ्या 'दिवाळी पहाट' कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसादलाडशाखीय वाणी समाजातर्फे उपक्रम

चाळीसगाव, जि.जळगाव : लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील वाणी मंगल कार्यालयात 'दिवाळी पहाट' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुमधुर गीतांच्या मेजवानीने दिवाळी पहाट रंगतदार राहिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश बागड (मालेगाव) प्रमुख अतिथी होते, तर व्यासपीठावर स्रीरोगतज्ज्ञ डॉ.विनोद कोतकर, डॉ.प्रवीण भोकरे, डॉ.महेश वाणी, रवींद्र शिरुडे, नीलेश सोनगिरे, संस्थापक वसंत वाणी, अध्यक्ष योगेश भोकरे, सचिव विजय भामरे आदी उपस्थित होते.दिवाळी सण म्हटला की, सर्वत्र रंगीबेरंगी रोषणाई, रांगोळी, पणत्या व फराळ आलेच. याव्यतिरिक्त ‘दिवाळी पहाट’ हा कार्यक्रम खरोखरच मनाला या सणाची खरी ओळख करुन देतो. रामप्रहरी सप्तसूर आपल्या कानी पडल्यावर खरोखरच अगदी मन प्रसन्न होऊन जाते. किशोर गुरव यांनी आपल्या जादूई सुरांनी सवार्ना मंत्रमुग्ध केले तर विविधरंगी कलाविष्कार सादर केलेत,विद्या भोई,गायत्री चौधरी,पवन गुरव आदींनी गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.'माझे माहेर पंढरी', 'अबीर गुलाल उधळीत रंग', 'आळंदी वंदीन', 'विघ्नेश्वर तू वरदविनायका' यासारख्या गीतांनी दिवाळी पहाट सुरमयी झाली. बहारदार गीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध करीत उपस्थितांची मने जिंकली. आपल्या भक्तीमय गीताने सर्वांना आनंददायी मेजवानी दिली. यावेळी उपस्थितांना धन्वंतरीची प्रतिमा भेट देण्यात आली.आरोग्याचे जतन या मुख्य हेतूने सण उत्सववादी योजना आपल्या पूर्वजांनी केल्या आहेत, ज्यातला एक म्हणजे दिवाळी असून दिवाळीतील फराळ हा आहार परंपरेचा परिपाक आहे. याचा संबंध खाद्य संस्कृतीशीही असून मात्र खाण्यापिण्याची चंगळ सांभाळायला हवी. वातावरणाला अनुरुप व बदलांमुळे शरीरामध्ये संभवणाºया विकृतींना प्रतिबंधक काळजी घ्यायला हवी, असे डॉ.विनोद कोतकर यांनी मार्गदर्शनपर सांगितले तर डॉ.प्रवीण भोकरे यांनी थंडीतले निरोगी वातावरण, त्यात मुबलक धनधान्यातून बलवर्धन करणाºया आहारसेवनाचा विचार पूर्वजांनी केला असून हे स्वाभाविक गुण सर्वांनी अवलंबायला हवे असल्याचे सांगितले.शीतकाळामध्ये पौष्टिक आहार सेवन करण्याचा हा विचार प्रत्येकाने करायला हवा.समाजातल्या मध्यम व निम्न स्तरातील घरांमध्ये शिरलेल्या मधुमेह,हृदयरोग-कॅन्सर-स्थूलत्त्व आदी विकारामागेदेखील दिवाळीतील फराळांमधील साखर व मैदा हे प्रमुख कारण राहिले आहे. आहारात याची प्रमाणशीर काळजी घ्यायला हवी, असे डॉ.भाग्यश्री शिनकर यांनी सांगितले.सूत्रसंचालन कैलास पाखले यांनी, तर आभार प्रा.बी.आर.येवले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भालचंद्र सोनगिरे, अनिल कोतकर, हिरालाल शिनकर, पुरुषोत्तम ब्राह्मणकर, जयवंत कोतकर, सतीश देव, मनोज शिरुडे, रवींद्र अमृतकर ,बी.के.वाणी, रवी अमृतकर, केशव गोल्हार, अशोक गोल्हार, दिलीप येवले, प्रकाश अमृतकर, हरिचंन्द्र पिंगळे, श्रीधर फुलदेवरे, गजानन कोतकर, प्रशांत बागड आदीनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकChalisgaonचाळीसगाव