शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेने वाजणार रणभेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:55 IST

जम्मू-काश्मिर विभाजन मुद्यावरुन भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा प्रयत्न ; विरोधकांमध्ये संभ्रम, भाजपामधील इनकमिंगमुळे समीकरणे बदलणार ; इच्छुकांचा जीव टांगणीला ; वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका

मिलिंद कुलकर्णीकाँग्रेस-राष्टÑवादीच्या यात्रा वर्षभरात खान्देशात येऊन गेल्या; परंतु त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. उलट पक्षातील बंडाळी आणि बेदिलीचे प्रदर्शन घडले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ येत आहे. पाच वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना पुढील पाच वर्षांसाठी ते महाजनादेश मागणार आहेत. खान्देशने प्रत्येक निवडणुकीत भाजपला साथ दिली. आता भाजप आणि सरकारने खान्देशला भरघोस देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीचा आढावा त्यांनी घेतला तरी खान्देशला खूप काही मिळेल, असे म्हणावे लागेल.जम्मू-काश्मिर-लडाख या राज्याच्या विभाजनाचा मास्टरस्ट्रोक मोदी-शहा जोडीने मारल्याने भाजपच्या गोटात ‘फील-गुड’चे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली अशी नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. ११ पैकी ८ मतदारसंघ भाजपकडे असून तेथे प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार रांगेत आहेत. त्यामुळे चर्चा होत आहे ती पण, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांविषयी. जसे जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. पण आतील गोटानुसार देवकर यांना भाजपने चाळीसगाव मतदारसंघासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंधी कधीही मधूर नव्हते, त्यामुळे भाजप तेथे आक्रमक असतो. तरीही पाटील यांच्याशी टक्कर देण्याएवढा तुल्यबळ उमेदवार भाजपकडे नाही, ही त्यांची कमजोरी आहे. म्हणून राष्टÑवादीतून माजी आमदार दिलीप वाघ यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.भाजपला धुळे आणि नंदुरबारमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची खरी कसोटी तेथे आहे. नवापुरात भरत गावीत यांच्यारुपाने मातब्बर उमेदवार गळाला लागला आहे, तसा उमेदवार धडगाव, साक्री, शिरपूर धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी शोधला जात आहे. काँग्रेस आघाडीतील विद्यमान आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे प्रस्ताव दिले गेल्याची चर्चा आहे. कुणाल पाटील यांच्याविषयी तर महाजन यांनी जाहीरपणे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत नेमके काय घडते, याविषयी मोठी उत्कंठा आहे.भाजपमधील इनकमिंग वाढल्यास इच्छुक उमेदवरांची कोंडी होणार असली तरी हे उमेदवार आता बंडखोरीच्या मानसिकतेत नाही. लोकसभा निवडणुकीतील भाजप विजयाची पुनरावृत्ती, नंदुरबार मतदारसंघात निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांची फसलेली बंडखोरी,लोकप्रिय घोषणांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार, निष्ठावंत भर निवडणुकीत निष्क्रिय, अलिप्त राहतील. पण बंडखोरी करणार नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला आशा असली तरी त्यांच्याकडे इनकमिंग फार काही वाढेल, असे नाही. याउलट आघाडीचे काही उमेदवार पक्षचिन्हाऐवजी अपक्ष निवडणुकीला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे. संघटनेतील बेदिली, पक्षाची ध्येय धोरणे, आर्थिक सहाय्य अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चिन्ह नको, असेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. या चर्चेमुळे मात्र भाजपमधील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. काही उमेदवार तर वर्षभरापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. मेहनत केल्यावर ऐनवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तिकीट घेऊन जाणार म्हटल्यावर जीव टांगणीला लागणे स्वाभाविक आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही नावे घेऊन गुगली तर टाकली आहे, विकेट पडते काय, हे कळेलच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव