शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेने वाजणार रणभेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:55 IST

जम्मू-काश्मिर विभाजन मुद्यावरुन भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा प्रयत्न ; विरोधकांमध्ये संभ्रम, भाजपामधील इनकमिंगमुळे समीकरणे बदलणार ; इच्छुकांचा जीव टांगणीला ; वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका

मिलिंद कुलकर्णीकाँग्रेस-राष्टÑवादीच्या यात्रा वर्षभरात खान्देशात येऊन गेल्या; परंतु त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. उलट पक्षातील बंडाळी आणि बेदिलीचे प्रदर्शन घडले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ येत आहे. पाच वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना पुढील पाच वर्षांसाठी ते महाजनादेश मागणार आहेत. खान्देशने प्रत्येक निवडणुकीत भाजपला साथ दिली. आता भाजप आणि सरकारने खान्देशला भरघोस देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीचा आढावा त्यांनी घेतला तरी खान्देशला खूप काही मिळेल, असे म्हणावे लागेल.जम्मू-काश्मिर-लडाख या राज्याच्या विभाजनाचा मास्टरस्ट्रोक मोदी-शहा जोडीने मारल्याने भाजपच्या गोटात ‘फील-गुड’चे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली अशी नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. ११ पैकी ८ मतदारसंघ भाजपकडे असून तेथे प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार रांगेत आहेत. त्यामुळे चर्चा होत आहे ती पण, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांविषयी. जसे जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. पण आतील गोटानुसार देवकर यांना भाजपने चाळीसगाव मतदारसंघासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंधी कधीही मधूर नव्हते, त्यामुळे भाजप तेथे आक्रमक असतो. तरीही पाटील यांच्याशी टक्कर देण्याएवढा तुल्यबळ उमेदवार भाजपकडे नाही, ही त्यांची कमजोरी आहे. म्हणून राष्टÑवादीतून माजी आमदार दिलीप वाघ यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.भाजपला धुळे आणि नंदुरबारमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची खरी कसोटी तेथे आहे. नवापुरात भरत गावीत यांच्यारुपाने मातब्बर उमेदवार गळाला लागला आहे, तसा उमेदवार धडगाव, साक्री, शिरपूर धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी शोधला जात आहे. काँग्रेस आघाडीतील विद्यमान आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे प्रस्ताव दिले गेल्याची चर्चा आहे. कुणाल पाटील यांच्याविषयी तर महाजन यांनी जाहीरपणे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत नेमके काय घडते, याविषयी मोठी उत्कंठा आहे.भाजपमधील इनकमिंग वाढल्यास इच्छुक उमेदवरांची कोंडी होणार असली तरी हे उमेदवार आता बंडखोरीच्या मानसिकतेत नाही. लोकसभा निवडणुकीतील भाजप विजयाची पुनरावृत्ती, नंदुरबार मतदारसंघात निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांची फसलेली बंडखोरी,लोकप्रिय घोषणांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार, निष्ठावंत भर निवडणुकीत निष्क्रिय, अलिप्त राहतील. पण बंडखोरी करणार नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला आशा असली तरी त्यांच्याकडे इनकमिंग फार काही वाढेल, असे नाही. याउलट आघाडीचे काही उमेदवार पक्षचिन्हाऐवजी अपक्ष निवडणुकीला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे. संघटनेतील बेदिली, पक्षाची ध्येय धोरणे, आर्थिक सहाय्य अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चिन्ह नको, असेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. या चर्चेमुळे मात्र भाजपमधील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. काही उमेदवार तर वर्षभरापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. मेहनत केल्यावर ऐनवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तिकीट घेऊन जाणार म्हटल्यावर जीव टांगणीला लागणे स्वाभाविक आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही नावे घेऊन गुगली तर टाकली आहे, विकेट पडते काय, हे कळेलच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव