शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या यात्रेने वाजणार रणभेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:55 IST

जम्मू-काश्मिर विभाजन मुद्यावरुन भाजपाकडून विधानसभा निवडणुकीत ध्रुवीकरणाचा प्रयत्न ; विरोधकांमध्ये संभ्रम, भाजपामधील इनकमिंगमुळे समीकरणे बदलणार ; इच्छुकांचा जीव टांगणीला ; वेट अ‍ॅण्ड वॉच भूमिका

मिलिंद कुलकर्णीकाँग्रेस-राष्टÑवादीच्या यात्रा वर्षभरात खान्देशात येऊन गेल्या; परंतु त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडला नाही. उलट पक्षातील बंडाळी आणि बेदिलीचे प्रदर्शन घडले. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’ येत आहे. पाच वर्षांतील कामगिरीचा लेखाजोखा मांडताना पुढील पाच वर्षांसाठी ते महाजनादेश मागणार आहेत. खान्देशने प्रत्येक निवडणुकीत भाजपला साथ दिली. आता भाजप आणि सरकारने खान्देशला भरघोस देण्याची वेळ आली आहे. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांच्या पूर्तीचा आढावा त्यांनी घेतला तरी खान्देशला खूप काही मिळेल, असे म्हणावे लागेल.जम्मू-काश्मिर-लडाख या राज्याच्या विभाजनाचा मास्टरस्ट्रोक मोदी-शहा जोडीने मारल्याने भाजपच्या गोटात ‘फील-गुड’चे वातावरण आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वीच अर्धी लढाई जिंकली अशी नेते, उमेदवार आणि कार्यकर्त्यांची भावना झाली आहे. या निर्णयाचा परिणाम म्हणून भाजपमध्ये ‘इनकमिंग’ आणखी वाढण्याची शक्यता आहे.खान्देशचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक स्थिती चांगली आहे. ११ पैकी ८ मतदारसंघ भाजपकडे असून तेथे प्रत्येक मतदारसंघात दहापेक्षा अधिक इच्छुक उमेदवार रांगेत आहेत. त्यामुळे चर्चा होत आहे ती पण, शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघांविषयी. जसे जळगाव ग्रामीण मतदारसंघात गुलाबराव देवकर यांच्या प्रवेशाची चर्चा आहे. पण आतील गोटानुसार देवकर यांना भाजपने चाळीसगाव मतदारसंघासाठी प्रस्ताव दिल्याची चर्चा आहे. पाचोरा मतदारसंघात किशोर पाटील आणि गिरीश महाजन यांच्यातील संबंधी कधीही मधूर नव्हते, त्यामुळे भाजप तेथे आक्रमक असतो. तरीही पाटील यांच्याशी टक्कर देण्याएवढा तुल्यबळ उमेदवार भाजपकडे नाही, ही त्यांची कमजोरी आहे. म्हणून राष्टÑवादीतून माजी आमदार दिलीप वाघ यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.भाजपला धुळे आणि नंदुरबारमध्ये जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहे. मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल यांची खरी कसोटी तेथे आहे. नवापुरात भरत गावीत यांच्यारुपाने मातब्बर उमेदवार गळाला लागला आहे, तसा उमेदवार धडगाव, साक्री, शिरपूर धुळे शहर व धुळे ग्रामीण मतदारसंघासाठी शोधला जात आहे. काँग्रेस आघाडीतील विद्यमान आमदारांना भाजपमध्ये घेण्याचे प्रस्ताव दिले गेल्याची चर्चा आहे. कुणाल पाटील यांच्याविषयी तर महाजन यांनी जाहीरपणे वक्तव्य केले आहे. त्यामुळे महाजनादेश यात्रेत नेमके काय घडते, याविषयी मोठी उत्कंठा आहे.भाजपमधील इनकमिंग वाढल्यास इच्छुक उमेदवरांची कोंडी होणार असली तरी हे उमेदवार आता बंडखोरीच्या मानसिकतेत नाही. लोकसभा निवडणुकीतील भाजप विजयाची पुनरावृत्ती, नंदुरबार मतदारसंघात निष्ठावंत डॉ.सुहास नटावदकर यांची फसलेली बंडखोरी,लोकप्रिय घोषणांचा भाजपला फायदा होण्याची शक्यता लक्षात घेऊन इच्छुक उमेदवार, निष्ठावंत भर निवडणुकीत निष्क्रिय, अलिप्त राहतील. पण बंडखोरी करणार नाही. त्यामुळे काँग्रेस आघाडीला आशा असली तरी त्यांच्याकडे इनकमिंग फार काही वाढेल, असे नाही. याउलट आघाडीचे काही उमेदवार पक्षचिन्हाऐवजी अपक्ष निवडणुकीला पसंती देण्याची शक्यता अधिक आहे. संघटनेतील बेदिली, पक्षाची ध्येय धोरणे, आर्थिक सहाय्य अशा सगळ्या पार्श्वभूमीवर चिन्ह नको, असेही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी राजकीय गोटात चर्चा आहे. या चर्चेमुळे मात्र भाजपमधील इच्छुक उमेदवारांची कोंडी झाली आहे. काही उमेदवार तर वर्षभरापासून मोर्चेबांधणी करीत आहेत. मेहनत केल्यावर ऐनवेळी प्रतिस्पर्धी उमेदवार तिकीट घेऊन जाणार म्हटल्यावर जीव टांगणीला लागणे स्वाभाविक आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी काही नावे घेऊन गुगली तर टाकली आहे, विकेट पडते काय, हे कळेलच.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव