शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

इंडिया आघाडीच्या नेत्यांनी मुंबईची हवा खावी, समुद्र बघावा!: रामदास आठवले

By सुनील पाटील | Updated: August 31, 2023 15:08 IST

मोदींच्या नेतृत्वात २०२४ मध्ये पुन्हा सरकार येणार

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव : आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत इंडिया आघाडीची बैठक होत आहे. या बैठकिसाठी आलेल्या नेत्यांनी मुंबईची हवी खावी, तेथील समुद्र बघावा. त्यांनी कितीही कांगावा केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात पुन्हा आमचे सरकार येणार असा विश्वास केंद्रीय राज्य मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी जळगावात व्यक्त केला.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या मेळाव्यासाठी रामदास आठवले जळगाव दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी अजिंठा शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर टिका केली. इंडिया आघाडीने  पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवावा. आता २६ पक्ष एकत्र आले आहेत त्यात अजून १६ ते १७ पक्ष समावेश होणार असल्याची माहिती आहे. आगामी निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष मोदींच्या नेतृत्वात महायुती सोबत राहील व आमचेच सरकार सत्तेत येईल.

राज्यात मंत्रीपद हवे

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा आणि आम्हाला एक मंत्रीपद आणि महामंडळ द्यावे अशी आमची मागणी आहे. वर्षा बंगल्यावर महायुतीची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला आपल्यालाही बोलावणं आले आहे तेथे उपस्थित राहणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्यात वाद नाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात कोणताही वाद नाही. ज्या मंत्र्यांना जी खाती दिली गेली आहेत. त्यांचे अधिकार त्या मंत्र्यांकडे असतात. तसेच मंत्री मंडळाचे निर्णय हे सामूहिक असतात. ही सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे सर्वच निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात असे नाही. अजित पवार देखील शिंदे व फडणवीस यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेत आहेत. त्यामुळे यात वादाचा विषय नाही, असेही आठवले म्हणाले.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी