शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

तुलसीदास जयंती विशेष : रामबोला ते गोस्वामी तुलसीदास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:27 IST

चुडामण बोरसेजळगाव - ‘रामचरितमानस’ची आठवण आली तरी आपोआप गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. बहुप्रतिभेचे धनी असलेल्या तुलसीदासांनी अनेक रचना केल्या आणि त्या अजरामर झाल्या. साक्षात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन दिले आणि विशेष म्हणजे ही भेट प्रत्यक्ष हनुमानाने चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या किनारी घडवून आणली... स्वत: श्रीरामाने तुलसीदासांना तिलक लावला... त्यामुळेचित्रकूट ...

चुडामण बोरसेजळगाव - ‘रामचरितमानस’ची आठवण आली तरी आपोआप गोस्वामी तुलसीदास यांची आठवण येते. बहुप्रतिभेचे धनी असलेल्या तुलसीदासांनी अनेक रचना केल्या आणि त्या अजरामर झाल्या. साक्षात प्रभू रामचंद्राने त्यांना दर्शन दिले आणि विशेष म्हणजे ही भेट प्रत्यक्ष हनुमानाने चित्रकूट येथील मंदाकिनी नदीच्या किनारी घडवून आणली... स्वत: श्रीरामाने तुलसीदासांना तिलक लावला... त्यामुळेचित्रकूट के घाटपर भई संतन की भीरतुलसीदास चंदन घिसे तिलक देत रघुवीर... हा दोहा प्रचलित झाला तो या भेटीमुळेच...प्रयागनजीक चित्रकूट जिल्ह्यातील राजापूर येथे तुलसीदासांचा जन्म श्रावण शुद्ध सप्तमीला झाला. बारा महिने आईच्या गर्भात राहिलेल्या या बालकाचा रडण्याचा आवाज न येता ‘राम’ हा शब्द निघाला... तोंडात चक्क ३२ दात आणि हालचाल पाच वर्षाच्या बालकासारखी होती. आईच्या अकाली मृत्यूनंतर दासी चुनिया हिने या बालकाचा सांभाळ केला.काही काळानंतर नरहरीनंद स्वामी नावाचे गृहस्थ शोध घेत तुुलसीदासांपर्यंत पोहचले. त्यांनी त्यांचे ‘रामबोला’ असे नामकरण करीत अयोध्येला नेले. न शिकविता हा बालक गायत्री मंत्राचा उच्चार करीत होता. त्यामुळे तेही चकीत झाले. पुढे ‘रामबोला’ काशी येथे गेले आणि वेदाचा अभ्यास करु लागले. तिथून ते जन्मभूमी राजापूरला आणि काशीला गेले. तिथे रामकथा सुरुच होती. तिथे त्यांनी साधूवेश धारण केला. या रामभक्ताला प्रत्यक्ष हनुमानाचे दर्शन झाले. पुढे हनुमानानेच चित्रकूटमध्ये तुम्हाला रामाचे दर्शन होईल, असे सांगितले. चित्रकूटला आल्यावर मौनी अमावस्येला तुलसीबाबांना रामाचे दर्शन झाले.यानंतर ते काशीला आले. तिथे प्रल्हाद घाटावर राहत असताना कवित्वशक्तीची जाणीव झाली आणि ते संस्कृतमध्ये पद्यरचना करु लागले. असे म्हणतात की भगवान शंकराच्या आज्ञेवरुन ते अयोध्येला गेले आणि हिंदी भाषेत रचना सुरु केली.रामनवमीच्या दिवशीच ‘रामचरितमानस’ लिहायला सुरुवात झाली. तब्बल दोन वर्षे, सात महिने आणि २६ दिवसांनी म्हणजे रामविवाहाच्या दिवशीच रामचरितमानस लिहून पूर्ण झाले आणि जगाला साहित्यातील सर्व रस असलेला हा अद्भूत ग्रंथ मिळाला.‘रामचरितमानस’ लिहून पूर्ण झाल्यावर रात्री तो विश्वनाथ मंदिरात ठेवण्यात आला. सकाळी त्यावर सत्यं, शिवमं, सुंदरम् अशी अक्षरे लिहलेली आढळून आली.. त्यामुळे या ग्रंथावर जणू मान्यतेची मोहोरच उमटली आणि त्यातल्या भाषा सौंदर्यांने हा ग्रंथ उजळून निघाला आणि त्यातले अनेक दोहे हे सहजपणे ओठावर येत असतात...

टॅग्स :Indian Traditionsभारतीय परंपराJalgaonजळगाव