शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विद्यापीठात मुख्य पदांवर प्रभारी राज, मग पदभरती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया संशयास्पद असून ती थांबविण्यात यावी व नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतरच विद्यापीठात पदभरती व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या ११ अधिसभा सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठातील संविधानिक पदे भरण्यासाठी नुकतीच शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संविधानिक पदांसोबत, विद्यापीठ फंडातून करारांवर तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठीसुद्धा पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही भरती संशयास्पद असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. तसेच तत्कालीन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही पदे रिक्त झालेली आहेत. प्रभारी कुलगुरू म्हणून कुलपती यांनी नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांची तर प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून प्रा. बी. व्ही. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे बी. व्ही. पवार यांची प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभारी कुलसचिवपदी प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, चौधरी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवर गेले असता डॉ. शामकांत भादलीकर यांची प्रभारी कुलसचिव पदी नेमणूक करण्यात आली. वैदयकीय रजेनंतर प्रा. चौधरी हे कामावर रुजू होऊनसुद्धा डॉ. भादलीकर हेच प्रभारी कुलसचिव म्हणून आजही काम बघत आहेत. त्यांच्याच मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच त्यांच्यावरील गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मग ही भरती प्रक्रिया का?

विविध पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रक्रिया राबविली आहे. जाहिरातीतील काही संविधानिक पदांचा पदावधी हा प्रभारी कुलगुरुंच्या पदावधी इतकाच असल्याने अशी पदे केवळ ३ ते ४ महिन्यांसाठी भरून विद्यापीठाला काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे. शेवटी अशा पदांसाठी पुन्हा ३ ते ४ महिन्यानंतर नवीन भरती प्रक्रिया राबवावीच लागणार आहे. त्यामुळे नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील पदभरती करावी व तशा सूचना जारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी माजी पालकमंत्री तथा अधिसभा सदस्य डॉ. सतीश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अनिल पाटील, प्रा. एकनाथ नेहते, प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. प्रकाश अहिरराव, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा .डॉ. सुनील गोसावी, प्रा. डॉ. अजय सुरवाडे आदींनी केली आहे.