शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विद्यापीठात मुख्य पदांवर प्रभारी राज, मग पदभरती का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:12 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सर्वच मुख्यपदांवर प्रभारी राज सुरू असताना संविधानिक पदे व विद्यापीठ फंडातून इतर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. ही भरती प्रक्रिया संशयास्पद असून ती थांबविण्यात यावी व नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतरच विद्यापीठात पदभरती व्हावी, अशी मागणी विद्यापीठाच्या ११ अधिसभा सदस्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

राज्यातील सर्व अकृषिक विद्यापीठातील संविधानिक पदे भरण्यासाठी नुकतीच शासनाने परवानगी दिलेली आहे. त्यानुसार कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने संविधानिक पदांसोबत, विद्यापीठ फंडातून करारांवर तात्पुरत्या स्वरूपातील पदांसाठीसुद्धा पदभरतीची प्रक्रिया सुरू केलेली आहे. ही भरती संशयास्पद असल्याचा आरोप अधिसभा सदस्यांनी केला आहे. तसेच तत्कालीन कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर विद्यापीठातील कुलगुरू, प्र-कुलगुरू आणि अधिष्ठाता ही पदे रिक्त झालेली आहेत. प्रभारी कुलगुरू म्हणून कुलपती यांनी नाशिक येथील यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. वायुनंदन यांची तर प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून प्रा. बी. व्ही. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे बी. व्ही. पवार यांची प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून नियुक्ती झाल्याने प्रभारी कुलसचिवपदी प्रा. ए. बी. चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु, चौधरी यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे ते वैद्यकीय रजेवर गेले असता डॉ. शामकांत भादलीकर यांची प्रभारी कुलसचिव पदी नेमणूक करण्यात आली. वैदयकीय रजेनंतर प्रा. चौधरी हे कामावर रुजू होऊनसुद्धा डॉ. भादलीकर हेच प्रभारी कुलसचिव म्हणून आजही काम बघत आहेत. त्यांच्याच मार्फत भरती प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच त्यांच्यावरील गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडे हे पद देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मग ही भरती प्रक्रिया का?

विविध पदांसाठी विद्यापीठाने जाहिरात प्रक्रिया राबविली आहे. जाहिरातीतील काही संविधानिक पदांचा पदावधी हा प्रभारी कुलगुरुंच्या पदावधी इतकाच असल्याने अशी पदे केवळ ३ ते ४ महिन्यांसाठी भरून विद्यापीठाला काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल अधिसभा सदस्यांनी उपस्थित केला आहे. शेवटी अशा पदांसाठी पुन्हा ३ ते ४ महिन्यानंतर नवीन भरती प्रक्रिया राबवावीच लागणार आहे. त्यामुळे नियमित कुलगुरूंच्या नियुक्तीनंतर विद्यापीठातील पदभरती करावी व तशा सूचना जारी कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी माजी पालकमंत्री तथा अधिसभा सदस्य डॉ. सतीश पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. अनिल पाटील, प्रा. एकनाथ नेहते, प्राचार्या. डॉ. संध्या सोनवणे, प्रा. डॉ. किशोर कोल्हे, प्रा. डॉ. प्रकाश अहिरराव, प्रा. डॉ. मोहन पावरा, प्रा .डॉ. सुनील गोसावी, प्रा. डॉ. अजय सुरवाडे आदींनी केली आहे.