शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

संस्कारी पिढीसाठी मुलांच्या संवेदना जपा : अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 21:19 IST

आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.

ठळक मुद्देगुरूवर्य अ‍ॅड़ अ़ वा़ अत्रे प्रतिष्ठानतर्फे व्याख्यानपालकांशी साधला हितगुजसंस्कृतीचा विनाश दारात उभा

जळगाव : आपल्या वागण्या-बोलण्यातून मुला-मुलींना काय वाटते, त्यांच्यावर काय संस्कार होतील याचा विचार करीत त्यांच्या संवेदना जपा, तरच संस्कारी पिढी घडेल, असा सल्ला अ‍ॅड़ अपर्णा रामतीर्थकर यांनी पालकांशी हितगूज साधताना दिला.अ‍ॅड़ अच्युतराव अत्रे यांच्या जन्मदिनानिमित्त गुरूवर्य अ‍ॅड़ अ़वा़अत्रे प्रतिष्ठानतर्फे २९ जून रोजी कांताई सभागृहात सायंकाळी अ‍ॅड़अपर्णा रामतीर्थकर यांचे ‘पालकांशी हितगुज’ या प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी त्या बोलत होत्या.संस्कृतीचा विनाश दारात उभाआपल्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच अ‍ॅड़रामतीर्थकर यांनी आपण मुलांना संस्कार देण्यात कमी पडत असल्याचा उल्लेख करून नात्यांमधील ओलावा संपत असल्याची खंत व्यक्त केली. आज ‘आई’ सर्वत्र शोधावी लागत असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, आपण कसे दिसतो यापेक्षा मी कशी आहे हे ओळखा. बाहेरचे धोके मुलांना कळावे म्हणून आईने सतर्क राहणे गरजेचे आहे, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला. मुलांच्या हाती मोबाईल देऊन ते काय पाहत आहे, याकडे आपण दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वेगवेगळ््या ‘फेस्टीवल’ तसेच गेमच्या आहारी मुले जात आहे. त्यामुळे संस्कृतीचा विनाश दारात उभा असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यासाठी वेळीच जागे, असे आवाहन त्यांनी पालकांना केले.मुलांचे कौतूक कराआज कुटुंब व्यवस्थेचा पाया खचत असून मुले पालकांपेक्षा बाहेर मित्रांमध्ये जास्त रमत आहे. त्यामुळे मुलांना किमान दोन तास वेळ देत त्यांच्या भावना जपा, त्यांचे कौतूक करणे शिका, त्यांना दाद द्या. त्यामुळे ते बाहेर रमण्यापेक्षा घरात रमतील, असेही अ‍ॅड. रामतीर्थकर म्हणाल्या.मुलींसाठी पालकांची भूमिका महत्त्वाचीमुलीची वडिलांशी तर मुलाची आईशी जवळीक असते. त्यामुळे वडिलांनी पत्नीसोबतच मुलीचेही कौतूक केले पाहिजे, असे सांगून त्यांनी मुलांवर वाचनाचे संस्कार करण्याचा सल्ला दिला. आज सर्व सुखसोयी घरात असल्या तरी आपण ‘बेडरुम’ तयार करून दुरावा निर्माण केल्याचे सांगून त्यांनी एकमेकांसोबत राहण्याचा सल्ला दिला.प्रारंभी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अ‍ॅड.अशोक माथूर वैश्य, प्रतिमा अत्रे, सदस्य अ‍ॅड. सुशील अत्रे, अनिल कांकरिया यांच्या उपस्थितीत अ‍ॅड़अच्युतराव अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रास्ताविक पद्मजा अत्रे यांनी केले.सूत्रसंचालन सोनिका मुजूमदार यांनी तर आभार लीना कुलकर्णी यांनी मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव