शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे शेतकरी व उकाड्याने हैराण जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा अपयशामुळे खराब रस्त्यांमुळे जळगावकर हवालदिल झाले आहेत. चिखल, खड्डे आणि पाण्याचे डबके तुडवून जळगावकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पावसानंतर आता शहराच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे एक जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात विशेष करून गेल्या तीन वर्षांपासून तर नेहमी हवाहवासा वाटणारा पावसाळा खराब रस्त्यांमुळे जळगावकरांना नकोसा वाटू लागला आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीनतेमुळेच ही वेळ आली आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची समस्या निर्माण होत असताना देखील मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही.

शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - ६४५ किमी दुर्दशा झालेल्या रस्त्यांची लांबी - ५७० किमी शहरातील ७५ % रस्त्यांची लागली वाट

आता अमृतच्या नावावर खापर फोडणे बंद करा

गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे खराब रस्त्यांचा समस्येला शहरातील लोकप्रतिनिधींकडून नेहमी अमृतच्या कामांनाच जबाबदार धरण्यात येत होते. मात्र, आता अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा दुरावस्थेला ‘अमृत’वर खापर फोडण्याचे दिवस ही गेले असून, आता जळगावकरांना चांगले रस्ते द्यावेत, अशीच भावना सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

मुरूम,माती टाकलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

गेल्या महिन्यात पाऊस झाल्यानंतर रस्त्यांची समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर मनपाकडून दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी माती व मुरुमाचा वापर करण्यात आला. ज्याठिकाणी मातीचा वापर करण्यात आला. त्याठिकाणी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मनपाची दुरुस्ती जळगावकरांना चांगलीच महागात पडली आहे.

दुरुस्तीवर केलेला कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?

महापालिकेने पावसाळ्याआधी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले होते. त्यापैकी मनपाने दिलेल्या माहितीनुसार ४ कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा निधी गेला तरी कोठे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

जळगावकरांनी निवडून दिलेले नेते काय म्हणतात...

रस्त्यांची कामे केव्हा होणार?

१०० कोटींचा प्रश्न मार्गी लागल्यावर..

१०० कोटी रुपयांचा निधीमधून रस्त्यांचा कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडे याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, राज्य शासनाने स्थगिती उठविली की लवकरात लवकर शहरातील नवीन रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यात येईल. - जयश्री महाजन, महापौर

पावसाळ्यानंतर..

शहरातील रस्त्यांचा कामांना अमृत योजनेमुळे ब्रेक लागला होता. आता अमृतची कामे होत आली आहेत. राज्य शासनाकडे स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठली की कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व पक्षीय मिळून प्रयत्न करू. -सुरेश भोळे, आमदार