शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

पावसाने दिलासा, मात्र रस्त्यांनी केले हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या पंधरा दिवसांपासून पाठ फिरवलेल्या वरुण राजाने जळगाव शहरासह परिसरावर आपली कृपादृष्टी दाखवली, यामुळे शेतकरी व उकाड्याने हैराण जळगावकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे मनपा प्रशासन व सत्ताधाऱ्यांचा अपयशामुळे खराब रस्त्यांमुळे जळगावकर हवालदिल झाले आहेत. चिखल, खड्डे आणि पाण्याचे डबके तुडवून जळगावकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. पावसानंतर आता शहराच्या रस्त्यावर वाहन चालविणे म्हणजे एक जीवघेणी कसरत करावी लागत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षांपासून शहरातील रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. त्यात विशेष करून गेल्या तीन वर्षांपासून तर नेहमी हवाहवासा वाटणारा पावसाळा खराब रस्त्यांमुळे जळगावकरांना नकोसा वाटू लागला आहे. प्रशासन व पदाधिकाऱ्यांचा उदासीनतेमुळेच ही वेळ आली आहे. प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यांची समस्या निर्माण होत असताना देखील मनपाकडून साधी दुरुस्तीही केली जात नाही.

शहरातील एकूण रस्त्यांची लांबी - ६४५ किमी दुर्दशा झालेल्या रस्त्यांची लांबी - ५७० किमी शहरातील ७५ % रस्त्यांची लागली वाट

आता अमृतच्या नावावर खापर फोडणे बंद करा

गेल्या तीन वर्षांपासून शहरात अमृत अंतर्गत पाणीपुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम हाती घेण्यात आले होते. त्यामुळे खराब रस्त्यांचा समस्येला शहरातील लोकप्रतिनिधींकडून नेहमी अमृतच्या कामांनाच जबाबदार धरण्यात येत होते. मात्र, आता अमृत अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. तर भुयारी गटार योजनेचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांचा दुरावस्थेला ‘अमृत’वर खापर फोडण्याचे दिवस ही गेले असून, आता जळगावकरांना चांगले रस्ते द्यावेत, अशीच भावना सर्वसामान्य जळगावकरांकडून व्यक्त होत आहे.

मुरूम,माती टाकलेल्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य

गेल्या महिन्यात पाऊस झाल्यानंतर रस्त्यांची समस्या निर्माण झाली होती. ‘लोकमत’ने हा प्रश्न मांडल्यानंतर मनपाकडून दुरुस्तीच्या कामांना सुरुवात केली होती. मात्र, दुरुस्ती करताना अनेक ठिकाणी माती व मुरुमाचा वापर करण्यात आला. ज्याठिकाणी मातीचा वापर करण्यात आला. त्याठिकाणी दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अक्षरश: चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे मनपाची दुरुस्ती जळगावकरांना चांगलीच महागात पडली आहे.

दुरुस्तीवर केलेला कोट्यवधींचा खर्च जातो कुठे?

महापालिकेने पावसाळ्याआधी ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, रस्त्यांच्या दुरुस्तीचे नियोजन केले होते. त्यापैकी मनपाने दिलेल्या माहितीनुसार ४ कोटी रुपयांच्या निधीतून दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र, सद्य:स्थितीत शहरातील रस्त्यांची स्थिती पाहिली तर दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला कोट्यवधींचा निधी गेला तरी कोठे ? असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.

जळगावकरांनी निवडून दिलेले नेते काय म्हणतात...

रस्त्यांची कामे केव्हा होणार?

१०० कोटींचा प्रश्न मार्गी लागल्यावर..

१०० कोटी रुपयांचा निधीमधून रस्त्यांचा कामांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाकडे याबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील सातत्याने पाठपुरावा करत असून, राज्य शासनाने स्थगिती उठविली की लवकरात लवकर शहरातील नवीन रस्त्यांचा कामांना सुरुवात करण्यात येईल. - जयश्री महाजन, महापौर

पावसाळ्यानंतर..

शहरातील रस्त्यांचा कामांना अमृत योजनेमुळे ब्रेक लागला होता. आता अमृतची कामे होत आली आहेत. राज्य शासनाकडे स्थगिती असलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीवरील स्थगिती उठली की कामांना पावसाळ्यानंतर सुरुवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सर्व पक्षीय मिळून प्रयत्न करू. -सुरेश भोळे, आमदार