शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
3
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
4
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
5
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
6
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
7
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
8
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
9
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
10
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
11
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
12
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
13
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
14
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
15
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
16
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
17
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
18
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
19
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
20
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

पावसाच्या दडीने भाजीपाल्याची आवक वाढली, भावातही घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले ...

विजयकुमार सैतवाल

जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले आहे. पत्ता कोबी वगळता जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता पावसाळा असल्याने जोरदार पाऊस झाल्यानंतर आवक कमी होऊन भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे.

सर्वच भाजीपाल्याची आवक चांगली असून भाव कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. खाद्यतेलाचादेखील सध्या दिलासा असून गेल्या काही महिन्यांपासून भाव खाणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमी होत आहे. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६० रुपये प्रति किलोवर आहे. तीळ तेल मात्र २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. तेलाचे भाव कमी होण्यासह इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत.

मागणीअभावी भाव स्थिर

सध्या निर्बंधामुळे दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने ग्राहकी कमी झाली आहे. यामुळे मागणीवरही परिणाम होऊन सर्वच किराणा मालाचे भाव स्थिर आहेत. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

मेथीच्या भावात मोठी घसरण

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर मोठा परिणाम होत असतो. मात्र सध्या पाऊस नसल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांची चांगली असल्याने त्यांचे भाव घसरले आहे. यामध्ये ७० ते ८० रुपयांवर असलेली मेथी सध्या ५० रुपये प्रति किलोवर आली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ३० ते ४० रुपये प्रति किलोवर तर पालक ३० रुपये प्रति किलोवर आला आहे.

लिंबूचे भाव निम्म्यावर

गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० रुपयांवर असलेल्या लिंबूचे भाव सध्या ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. यासोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसूण १०० ते १४० रुपयांवर आहे.

पाऊस नसल्याने सर्वांना चिंता असली तरी भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे दिलासा आहे. खाद्यतेलाचेही भाव कमी होत असल्याने काहीसा भार कमी झाला आहे.

- मनोहर पवार, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव कमी होत असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. सध्या ग्राहकी कमी असल्याने मागणी कमी होऊन हा परिणाम होत आहे.

- सुरेश वाणी, व्यापारी

सध्या पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहेत.

- नीलेश भोळे, भाजीपाला विक्रेते