शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

पावसाच्या दडीने भाजीपाल्याची आवक वाढली, भावातही घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:11 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले ...

विजयकुमार सैतवाल

जळगाव : पाऊस नसल्याने सर्वांनीच चिंता वाढली असताना पालेभाज्यांसह सर्वच भाज्यांची आवक वाढल्याने त्यांचे भाव कमी झाले आहे. पत्ता कोबी वगळता जवळपास सर्वच भाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता पावसाळा असल्याने जोरदार पाऊस झाल्यानंतर आवक कमी होऊन भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे. किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे.

सर्वच भाजीपाल्याची आवक चांगली असून भाव कमी झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. खाद्यतेलाचादेखील सध्या दिलासा असून गेल्या काही महिन्यांपासून भाव खाणाऱ्या खाद्यतेलाचे भाव कमी होत आहे. यामध्ये सोयाबीन तेल १४६, शेंगदाणा तेल १७०, सूर्यफूल तेल १५५, पाम तेल १२६० रुपये प्रति किलोवर आहे. तीळ तेल मात्र २०० रुपये प्रति किलोवर कायम आहे. तेलाचे भाव कमी होण्यासह इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहेत.

मागणीअभावी भाव स्थिर

सध्या निर्बंधामुळे दुकानांना दुपारी ४ वाजेपर्यंतच परवानगी असल्याने ग्राहकी कमी झाली आहे. यामुळे मागणीवरही परिणाम होऊन सर्वच किराणा मालाचे भाव स्थिर आहेत. बेसनपीठ ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर कायम आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये, तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर व इतरही किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

मेथीच्या भावात मोठी घसरण

पावसाचा हिरव्या पालेभाज्यांवर मोठा परिणाम होत असतो. मात्र सध्या पाऊस नसल्याने कोथिंबीर, मेथी, पालक यांची चांगली असल्याने त्यांचे भाव घसरले आहे. यामध्ये ७० ते ८० रुपयांवर असलेली मेथी सध्या ५० रुपये प्रति किलोवर आली आहे. कोथिंबीरचे भावदेखील ३० ते ४० रुपये प्रति किलोवर तर पालक ३० रुपये प्रति किलोवर आला आहे.

लिंबूचे भाव निम्म्यावर

गेल्या काही दिवसांपासून ५० ते ६० रुपयांवर असलेल्या लिंबूचे भाव सध्या ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. यासोबतच बटाट्याचे भाव २० रुपये प्रति किलो तर कांद्याचे भाव अजूनही ३० रुपये प्रति किलोवर आहे. लसूण १०० ते १४० रुपयांवर आहे.

पाऊस नसल्याने सर्वांना चिंता असली तरी भाजीपाल्याचे भाव कमी झाले आहे. त्यामुळे दिलासा आहे. खाद्यतेलाचेही भाव कमी होत असल्याने काहीसा भार कमी झाला आहे.

- मनोहर पवार, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव कमी होत असून इतर किराणा साहित्याचे भाव स्थिर आहे. सध्या ग्राहकी कमी असल्याने मागणी कमी होऊन हा परिणाम होत आहे.

- सुरेश वाणी, व्यापारी

सध्या पावसाने उघडीप दिल्याने भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहेत.

- नीलेश भोळे, भाजीपाला विक्रेते