शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

चाळीसगाव परिसरात पावसाचा पुन्हा खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:11 IST

चाळीसगाव : दडी मारून बसलेल्या पावसाने २८ जून रोजी कमबॕॅक केल्यानंतर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना चालना मिळाली होती. मात्र २९ ...

चाळीसगाव : दडी मारून बसलेल्या पावसाने २८ जून रोजी कमबॕॅक केल्यानंतर खोळंबलेल्या खरिपाच्या पेरण्यांना चालना मिळाली होती. मात्र २९ जूनपासून पाऊस पुन्हा गायब झाल्याने शेतकरी चांगलेच हवालदिल झाले असून, दमदार पावसाची प्रतीक्षाही कायम आहे. चार दिवसांपासून पावसाची हजेरी निरंक असल्याने जवळपास १८ ते २० हजार हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या थांबल्या आहेत.

गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी पावसाने सुरुवातीपासूनच ओढ घेतली आहे. मान्सूनपूर्व पावसाने धूमशान घालत शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. तथापि, मृग नक्षत्रावर पाऊस साधा आभाळातही फिरकला नाही. या नक्षत्राचे तेरा दिवस कोरडेठाक गेल्याने खरिपाच्या पेरण्यांना पुन्हा ब्रेक लागला. एरवी मृग नक्षत्रावर होणाऱ्या पेरण्या या वर्षी आर्द्रा नक्षत्रापर्यंत लांबल्या.

चौकट

आर्द्राचीही ‘कोल्हेकुई’च

मृग नक्षत्राचे १३ दिवस निरंक हजेरी लावलेल्या पावसाने २१ जूनपासून झालेल्या आर्द्रा नक्षत्रावरही बळीराजाची घोर निराशा केली. या नक्षत्रातील सात दिवस उसंत घेत त्याने २८ रोजी चांगली हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राचे वाहन ‘कोल्हा’ असल्याने पुढे चार दिवस पाऊस गायब झाल्याने ही लबाड कोल्ह्याची ‘कोल्हेकुई’ ठरल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

१... आर्द्रा नक्षत्राच्या १४ दिवसांपैकी १० दिवस पूर्ण झाले आहेत. या १० दिवसांत २८ जून रोजी झालेला पाऊस वगळता इतर दिवशी त्याची हजेरी निरंक राहिली आहे.

२... येत्या सोमवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात आहे. आता याच नक्षत्रावर शेतकऱ्यांची सर्व मदार आहे.

चौकट

पाऊस गायब, करावी लागणार ‘डागडुजी’

पेरणीनंतर पाऊस आवश्यक असतो. कडधान्यासाठी त्याची उसंत फारशी त्रासदायक ठरत नाही. त्यामुळे २८ जूननंतर पेरणी झालेल्या कडधान्याच्या पिकाला पाऊस नसल्याने फारसा फरक पडणार नाही.

मात्र, कपाशी, मका लागवडीसाठी पेरणीनंतर पावसाची निकड अधिक असते. २८ जूननंतर जवळपास ६५ हजार हेक्टरवर पेरण्या आटोपल्या आहेत. यात बहुतांशी पेरणी कपाशी व मका पिकाची झाली असून, पाऊस नसल्याने ‘उतारा’ कमी होण्याची शक्यता शेतकऱ्यांंमधून वर्तविली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ‘डागडुजी’ म्हणजे पुन्हा निम्म्या क्षेत्रावर पेरणी करावी लागणार, असाही सूर ग्रामीण भागातून वर्तविला जात आहे.

- ९१ हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. शनिवारी अखेर ६५ हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस पुन्हा दडी मारून बसल्याने उर्वरित १८ ते २० हजार हेक्टरवरील पेरण्यांना ब्रेक लागला आहे.

महत्त्वाची चौकट

उन्हाचा चटका वाढला, मात्र आर्द्रताही चांगली

सद्य:स्थितीत पावसाने ओढ घेतली आहे. पुढचे सात ते आठ दिवस तो गायबच राहणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. यामुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.

उन्हाचा चटकाही वाढला आहे. मात्र जमिनीत ओल व हवामानात आर्द्रताही चांगली असल्याने पिकांची स्थिती ठीक आहे. अजूनही पुढचे सात ते आठ दिवस पावसाविना पिके तग धरू शकतात अर्थात पावसाची ओढ कायम राहिल्यास आठ दिवसांनी खरिपाच्या पूर्ण पेरणीवरच दुबारचे सावट गडद होऊ शकते.

शनिवार अखेर प्रमुख पिकांचे पेरणी झालेले एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)

कपाशी - ४७,६९०

मका - ८,०३६

ज्वारी - ७४०

बाजरी - ७४०

मूग - ६७२

उडीद - ५४८

इतर कडधान्ये - ५७५