शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पावसाची दमदार ‘बॅटींग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 12:42 IST

हवेत गारवा, चाळीस मिनिटे आनंदवर्षा

जळगाव : शहर आणि परिसरात रात्री मुसळधार पाऊस पडला. अनेक दिवस प्रतिक्षेत असलेल्या शेतकरीराजाला पावसाने आपल्या ‘एन्ट्री’ने खूष करून टाकले आहे. चाळीस मिनिटे पडलेल्या या पावसाने हवेत गारवाही निर्माण झाला होता.जळगाव शहर आणि परिसरात गेले आठ दिवस पाऊस नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत पडला होता. त्याचबरोबर हवेत उष्माही निर्माण झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबरच नागरिकही पावसाच्या प्रतिक्षेत होते. या साऱ्यांनाच पावसाने दमदार पुनरागमन करत गारवा दिला.यापूर्वी पावसाने चक्रीवादळाच्या वेळी हजेरी लावली होती. त्यानंतर आठ दिवसांपूर्वीही जोरदार पाऊस बरसला होता. त्यानंतर पावसाने सातत्याने पाठ फिरवली. पाऊस नसल्याने अनेक पिके संकटात आली होती. जिल्ह्यातील ८८ टक्के कामे पूर्ण झाली असली तरी पाऊस नसल्याने कदाचित दुबार पेरणीचे संकट तर ओढवणार नाही ना, अशी भीती शेतकºयांमध्ये व्यक्त होत होती. दि. २ जुलैपासून पाऊस बरसेल, हा हवामान खात्याचा अंदाजही पावसाने खोटा ठरवला होता. मात्र, शनिवारी आलेल्या पावसाने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे.शनिवारी रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास पावसाने सुरुवात केली. रिमझिम बरसणाºया पावसाने काहीवेळातच मुसळधार रुप धारण केले. जवळपास चाळीस मिनिटे हा पाऊस बरसत होता. पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते.वीजपुरवठा खंडितपावसामुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल परिसर, रायसोनीनगर, जिल्हा पेठ, दिक्षित वाडी, जयकिसनवाडी, पिंप्राळा, महाबळ, गणेश कॉलनी यासह शहरातील वीजपुरवठा तासभर खंडित झाला होता.

टॅग्स :Jalgaonजळगाव