शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

रेल्वेत प्रवाशांना लुटणा:या टोळीला पकडले

By admin | Updated: March 17, 2017 00:30 IST

दरोडय़ाचा गुन्हा दाखल : चाकू, मिरची पूड हस्तगत; शहरात दरोडय़ाचे नियोजन

जळगाव : रेल्वेत प्रवाशांशी दादागिरी करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोकड लुटणा:या टोळीतील चार जणांना पकडण्यात शहर पोलिसांच्या पथकाला यश आले असून त्यातील दोन जण फरार झाले आहेत. दरम्यान, पकडलेल्या चौघांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू व दोर असे साहित्य आढळून आले. दरोडा टाकण्याच्या उद्देशानेच ही टोळी फिरत होती. दरम्यान, त्यांच्याविरुध्द दरोडय़ाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुरत-भसावळ या पॅसेंजरमध्ये सहा ते सात जणांची टोळी असून ती प्रवाशांशी दादागिरी करुन मोबाईल हिसकावत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळाली होती. त्यानुसार ठाकूर यांनी सहायक निरीक्षक दीपक गंधाले, सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, नवजीत चौधरी, प्रितम पाटील, दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, अमोल विसपुते व गणेश शिरसाळे यांचे पथक रेल्वे स्टेशनच्या आउटरला पाठविले. सकाळी आठ वाजता या पथकाने सापळा लावला होता. मात्र ही टोळी त्या जागेवर नाही तर हॉटेल निसर्गच्या पाठीमागे थांबल्याची माहिती गंधाले यांना मिळाली. त्यामुळे हे पथक तेथे आले असता पोलीस पाहताच त्यांनी पळ काढला. चौघे जाळ्यात, दोन फरारपाठलाग करत असताना पोलिसांनी शेख कदीर शेख इब्राहीम (वय 20) वसीम शेख अजीज (वय 21) व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. गणेश शिरसाळे व नवजीत चौधरी या पोलिसांनी बारीक गल्लीतून दोघांचा पाठलाग केला, मात्र ते निसटण्यात यशस्वी झाले. ताब्यात घेतलेल्या चौघांना पोलीस स्टेशनला आणले असता त्यांच्या बॅगेत मिरची पूड, चाकू, दोर तसेच एक सीम कार्ड नसलेला मोबाईल आढळून आला. या टोळीकडून शहरात जबरी चोरी किंवा दरोडा टाकण्याचे नियोजन होते. दरम्यान, अल्पवयीन मुलांची बालनिरीक्षण गृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक दीपक गंधाले यांनी दिली.

 

अमळनेरच्या भावंडाशी झाली झटापटपोलिसांनी पकडलेल्या टोळीने लक्ष्मण पोलाद कोळी व रमेश कोळी (रा.अमळनेर)या दोन भावंडाशी झटापट झाली होती.दोन्ही भाऊ हे  सकाळी 7.30 वाजता अमळनेर येथे गाडीत चढताना चोरटय़ाने त्यांच्या खिशातील मोबाईल चोरुन लांबवून पळ काढण्याचा प्रय} केला. चोरटय़ाच्या हातातून कोळी यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रय} केला असता त्यांनी गाडीतून फेकून देण्याची धमकी दिली. या दोघ भावांनी घडलेला प्रकार जळगाव येथील त्यांच्या नातेवाईकांना सांगितला.जळगावला आल्यावर शुभम रघुनाथ तायडे, मुन्ना संतोष सोनवणे, सुनील दुर्योधन सैंदाणे, भगवान काशीनाथ सोनवणे यांनी कोळी भावंडाना धीर देत 4 चोरटय़ांना पकडले, त्यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. अन्य दोन जण फरार होण्यात यशस्वी झाले. नंतर या चोरटय़ांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेबाबत सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांना विचारले असता आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती, त्यानुसार चोरटय़ांना आम्ही पकडले. त्यांचा रेल्वेत कोणाशी वाद झाला हे माहिती नसल्याचे स्पष्टीकरण दिले.