शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
2
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
3
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
4
राज्य मंत्रिमंडळाचे २१ 'जम्बो निर्णय'; आचारसंहितेपूर्वी महायुती सरकारचा घोषणांचा धमाका
5
आयसीसीनं लॉरावर केली मर्जी बहाल! वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतवर अन्याय?
6
उत्पन्न वाढीसाठी एसटी रिटेल इंधन विक्री करणार, निविदा प्रक्रिया सुरू, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती 
7
एअर इंडियाच्या विमानात गडबड! दिल्लीहून बांगळुरूला जाणाऱ्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग
8
Relationship Tips: भांडणानंतर बायको रडत राहते आणि नवरा झोपी जातो, असे का?
9
महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या राज्यातील खेळाडूंना रोख पारितोषिक, सत्कार होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
10
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
11
"...तर गोळीचे उत्तर गोळ्याने दिले जाईल"; अमित शाह यांचा "नापाक" पाकिस्तानला सज्जड दम! विरोधकांवरही बरसले
12
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा 
13
‘एक बुथ, १० युथ’ या सुत्रानुसार युवक काँग्रेसने काम करा, जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवा, नसीम खान यांचं आवाहन
14
Mumbai: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!
15
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
16
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
17
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
18
रागाच्या भरात परेश रावल यांनी चक्क केली होती हाणामारी! म्हणाले, "एकाला थप्पड लगावली, दुसऱ्याच्या डोक्यात दगड..."
19
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
20
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो

रेल्वे स्थानक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:19 IST

रेल्वे स्थानकावर पुतळ्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांना थांबा आहे. मात्र रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांच्या पळवापळवीसाठी रिक्षा रस्त्यात थांबविल्या जातात. पुतळ्यापासून ...

रेल्वे स्थानकावर पुतळ्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांना थांबा आहे. मात्र रेल्वे गाडी आल्यानंतर प्रवाशांच्या पळवापळवीसाठी रिक्षा रस्त्यात थांबविल्या जातात. पुतळ्यापासून तर जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत बेशिस्तपणे रिक्षा रस्त्यात उभ्या करण्यापासून तर हात धरुन प्रवाशी पळविले जातात. या ठिकाणी गाडी येते तेव्हा नेमके वाहतूक पोलीस नसतात, हे एक मोठे दुर्देव आहे.

जुने बसस्थानक

जुने बसस्थानक परिसरात किमान पाच ते सहा रिक्षा थांबे आहेत. येथून पाळधी येथे देखील रिक्षा जातात. रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी रिक्षांची पार्कींग होते. खेडेगावातून आलेल्या प्रवाशांना येथे मोठा त्रास आहे. बाजारातून आलेल्या प्रवाशांना वळविण्यासाठी कधी डाव्या बाजुने तर कधी उजव्या बाजुने प्रवाशी पळविले जातात. नजीकच दाणाबाजार असल्याने तेथे देखील परिस्थिती अशीच आहे.

फुले मार्केट परिसर

फुले मार्केटला लागून अनेक मार्केट असल्याने साहजिकच या भागात ग्राहकांची गर्दी जास्त असते. शहरातील मुख्य मार्केट हेच असल्याने रिक्षांची संख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे. चारही बाजुंनी अगदी बेशिस्तपणाने रिक्षा पार्कींग करण्यासह येथेही प्रवाशांची पळवापळवी होते. रिक्षांमुळेच या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते.

मनमानी पध्तीने भाडे आकारणी

-महाबळ, खोटे नगर, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागातून शहरात यायचे असेल तर पंधरा रुपये भाडे आकारले जाते. पुन्हा परतीला याच भागात जायचे असले तरी देखील तितकेच भाडे आहे, मात्र गल्लीत किंवा याच भागातील दुसऱ्या कॉलनीत जायचे असेल तर एका प्रवाशासाठी शंभर ते दिडशे रुपये आकारले जातात, दोन व तीन प्रवाशी असले तर त्यापेक्षा जास्त भाडे आकारले जाते.

-रेल्वेने किंवा एस.टी.बसने एखादी बाहेरगावचा प्रवाशी शहरात आला असेल व जेथे नियमित पंधरा रुपये भाडे आहे,अशा ठिकाणचे शंभर रुपयांच्या घरात भाडे आकारले जाते.बोलीभाषेवरुनच प्रवाशी स्थानिक आहे किंवा बाहेरचा हे रिक्षा चालकांकडून ओळखले जाते, आणि त्या पध्दतीने भाड्याची आकारणी जाते.

- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, बांभोरी, चिंचोली, नशिराबाद व तरसोद आदी भागात देखील शहरातून रिक्षाची सुविधा आहे. या मार्गावर शक्यतो जास्त भाडे आकारले जात नाही, मात्र एकटा प्रवासी असेल तर मनमानीपध्दतीनेच भाड्याची आकारणी होते.

-एमआयडीसी, अयोध्या नगर, सुप्रीम कॉलनी या भागात तर अव्वाच्या सव्वा भाड्याची आकारणी होते. गाडगेबाबा चौक, संभाजी चौक, मोहाडी रोड, डी मार्ट परिसर व काव्यरत्नावलीमार्गे रामानंद नगर या भागात ३० ते ४० रुपये भाडे आकारले जाते. प्रवासी मिळत नसल्याचे कारण रिक्षा चालकांकडून सांगितले जाते.

प्रवाशांना त्रास

खरे तर एका रिक्षात तीनच प्रवासी बसविणे अपेक्षित आहे, मात्र जास्त पैसे मिळण्याच्या अपेक्षेने प्रवासी अगदी कोंबून भरले जातात. चालकाच्या आजुबाजुला देखील दोन प्रवासी बसविले जातात. तीन प्रवासी असले तरी पंधरा रुपये जास्त असले तरी तितकेच भाडे आकारले जाते. यात प्रवाशांचे हाल होतात.

-जिजाबराव पाटील, प्रवासी

रिक्षा चालकांनी प्रत्येक मार्गावर भाडे निश्चित करावे किंवा मीटर पध्दत सुरु करावी. मनमानी भाडे आकारुन प्रवाशांची लूट केली जाते. आपले नुकसान होणार नाही व प्रवाशालाही परवडेल अशाच पध्दतीने भाड्याची आकारणी व्हावी. काही जण उर्मट पध्दतीने वागतात, त्याचा प्रवाशांना त्रास होतो.

-अकील शेख

कोट...

आपण नुकताच पदभार स्विकारला आहे. शहरात वाहतुकीला शिस्त लावणे व बेशिस्त पार्कींग यावर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहे. मागील आठवड्यात अनेक रिक्षा चालकांवर कारवाई केली. रिक्षा वाहतूक शाखेच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या होत्या. कारवाई टाळण्यासाठी रिक्षा चालकांनी स्वत: ला शिस्त लावून नियमांचे पालन करावे.

लिलाधर कानडे, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

-