शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
4
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
5
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
6
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
7
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
9
Viral Video: लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
10
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
11
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
12
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
13
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
14
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
15
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
16
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
17
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
18
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
19
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
20
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट

बेवारस मृतांच्या नातेवाइकांना शोधतांना रेल्वे पोलिसांची दमछाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:59 IST

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रेल्वेचा धक्का लागल्याचे दोन वर्षात २२५ अपघात झाले ...

जळगाव : धावत्या रेल्वेतून पडल्याने, रेल्वे रूळ ओलांडताना किंवा इतर कारणांनी रेल्वेचा धक्का लागल्याचे दोन वर्षात २२५ अपघात झाले असून त्यात या लोकांचा जीव गेलेला आहे, त्यातील ७२ जणांची तर ओळखच पटली नाही. त्यामुळे या अनोळखी मृतांच्या नातेवाइकांचा शोध घेतांना रेल्वे पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

रेल्वेचा अपघात म्हटला की, पोलिसांची कसरत आलीच. रेल्वे रुळावरील मृतदेह आणण्यासाठी सर्वात आधी वाहनाची अडचण येते, थेट घटनास्थळापर्यंत वाहनच जाऊ शकत नाही. गेलेच तर किमान २०० ते ५०० मीटर अंतरापर्यंत वाहन पोहचते. रेल्वे अपघातातील मृतदेहांची अवस्था पाहता रेल्वे पोलिसांना मांसाचे तुकडे गोळा करावे लागतात, हे काम करीत असताना पोलीस नाकीनऊ येतात, मात्र कर्तव्य महत्त्वाचे असल्याने त्याला प्राधान्य द्यावेच लागते. बऱ्याच घटनांमध्ये पोलिसांना मृतदेह ने-आण करण्यासाठी वाहनच मिळत नाही. रात्रीच्यावेळी तर मोठी समस्या निर्माण होते. वाहन न मिळाल्याने काही वेळा तर बैलगाडी, हातगाडी यावर मृतदेह आणण्याची वेळ पोलिसांवर आली आहे.

मृतदेहाची ओळख पटविण्यात अनेक अडचणींना सामना करावा लागतो. खिशात आधारकार्ड किंवा काही पुरावा असला तर ओळख पटवायला सोपं जात असली तरी नातेवाइकांशी संपर्क व्हायला खूप अडचणी येतात. रेल्वे अपघातातील मृत शक्यतो दुसरा जिल्हा किंवा राज्यातीलच असतात, त्यामुळे नातेवाइकांना यायला सहज दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागतो. काही मृतदेहांचा चेंदामेंदा झालेला असल्याने त्यांची ओळख पटतच नाही. अंगावरील कपडे, शरीरावरील निशाणी व इतर काही खूण असेल तर त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करावे लागतात, तरी देखील ओळख पटतेच असे नाही. दोन वर्षात तब्बल ७२ मृतांची ओळखच पटली नाही, त्यामुळे रेल्वे पोलिसांनाच या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करावे लागले.

७२ मृतदेहांची ओळखच पटली नाही

- लोहमार्ग पोलिसांच्या हद्दीत २०१९ या वर्षात ५९ तर २०२० या वर्षात १३ असे एकूण ७२ मृतदेहांची शेवटपर्यंत ओळखच पटली नाही. त्यामुळे या मृतदेहांवर शासकीय नियमानुसार तीन दिवस सांभाळून अंत्यसंस्कार करण्यात आले.

- काही मृतदेह तर असे होते की जागेवरच चेहऱ्याचा चेंदामेंदा तर काहींचे शरीर व मुंडके वेगळे अशी होती. बहुतांश मृतदेहांचे मांसाचे तुकडे होते, तरीही घटनास्थळावरच पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले. नियमानुसार जी प्रक्रिया आहे, ती पार पाडावीच लागते.

कोट..

अनोळखी मृतदेह सांभाळण्यासह जेथे घटना घडते, तेथे जायला ना सरकारी वाहन ना रुग्णवाहिका मिळते. रात्री-अपरात्री कर्मचाऱ्यांना दुचाकीवरच जाऊन पंचनामा करावा लागतो. अशा वेळी कोणतेच वाहन मिळत नाही. विनवण्या करून व खिशातून पैसे खर्च करून मिळेल त्या वाहनाने मृतदेह रुग्णालयात न्यावा लागतो.

-सुरेश सरडे, पोलीस निरीक्षक, लोहमार्ग पोलीस स्टेशन

२०१९

रेल्वे अपघात :१६५

मृत्यू : ५९

२०२०

रेल्वे अपघात :६०

मृत्यू : १३

--