शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

रेल्वे डमी जोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही रेल्वेच्या भुसावळ विभागातून गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व चाळीसगाव येथून हजारो प्रवासी जळगावला अफडाऊन ...

मुंबईत सवलत, आम्हाला का नाही

रेल्वेच्या भुसावळ विभागातून गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा व चाळीसगाव येथून हजारो प्रवासी जळगावला अफडाऊन करत असतात. यातून रेल्वेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र, कोरोनाचे कारण सांगून रेल्वेने मासिक पास व जनरल तिकीट अद्यापही बंद ठेवल्याने, या प्रवाशांना विशेष गाड्यांना जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. असे असताना रेल्वे प्रशासन भुसावळच्या प्रवाशांचा विचार न करता, मुंबईतल्या प्रवाशांना सवलत देते, तर मग आम्हाला का नाही, असा संतप्त सवाल प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.

इन्फो :

कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर, रेल्वे प्रशासनाने मुंबईतल्या प्रवाशांप्रमाणे भुसावळ विभागातल्या प्रवाशासांठीही पॅसेंजर गाड्या सुरू करणे गरजेचे आहे. तसेच ज्या प्रवाशांनी लसीकरणाचे दोन डोस पूर्ण केले आहेत. त्यांना मासिक पासही देणे गरजेचे आहे. सध्या या प्रवाशांना कुठल्याही सुविधा नसल्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

बाळासाहेब वाबळे, प्रवासी

दररोज चाळीसगाव, पाचोरा या भागातून हजारो प्रवासी जळगावला नोकरी, व्यावसायानिमित्त ये-जा करीत असतात. रेल्वेने मात्र कोरोनाचे कारण पुढे करून, पॅसेंजर अद्यापही बंद ठेवल्यामुळे या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यात जनरल तिकीटही मिळत नसल्याने, या प्रवाशांना खासगी वाहनांनी जादा पैसे मोजून, जळगावला यावे लागत आहे.

दुष्यंत भाटेवाल, प्रवासी

रेल्वे प्रशासन एकीकडे कोरोनाचे नाव सांगून, पॅसेंजर सुरू करत नसली, तरी सध्या ज्या गाड्या सुरू आहेत. त्या गाड्याना तर प्रचंड गर्दी आहे. त्यात कुठलेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नसून, प्रवासी मास्कही घालतांना दिसून येत नाहीत. त्यामुळे रेल्वेने कोरोनाचे नाव सांगून, मासिक पास किंवा पॅसेंजर सुरू न करण्याचे निर्णय मागे घ्यायला हवेत. तसेच या मागणीसाठी प्रवाशांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

योगेश पाटील, प्रवासी

इन्फो :

राज्य शासनाच्या आदेशानंतर मासिक पास सुरू होणार

मुंबईत लोकल सुरू झाल्या, मासिक पास देण्यात येत आहे. भुसावळ विभागातील प्रवाशांना केव्हा मिळणार, याबाबत ‘लोकमत’ प्रतिनिधीने भुसावळ जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला असता, त्यांनी राज्य शासन व केंद्र शासन परवानगी देईल, तेव्हाच मासिक पास व पॅसेंजर सुरू होणार असल्याचे सांगितले. विशेषत : यामध्ये राज्य शासनाची परवानगी प्रथम मिळणे गरजेच असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.