शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात

By admin | Updated: November 24, 2015 01:04 IST

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे.

नंदुरबार : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात बदललेल्या ढगाळ वातावरणाने रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. हे वातावरण आणखी लांबल्यास शेतात उभ्या असलेल्या पिकांचे आणखी नुकसान होऊ शकते. दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे मिरची उत्पादक शेतक:यांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.

शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. हे वातावरण पिकांना मारकही ठरू लागले आहे. त्यात सप्टेंबरअखेर हरभ:याची पेरणी झाली आहे. या हरभ:यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच तूर पीक फुले व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या तूर पिकावरही घाटे अळी व शेंगा पोखरणा:या अळीचा दणका बसू शकतो.

याशिवाय शेतात मिरची उभी आहे. असे ढगाळ वातावरण अजून काही दिवस राहिल्यास मिरची पिकावर भुरी रोग उद्भवू शकतो. वेलवर्गीय पिकांमध्ये (उदा. कारले, गिलके, दोडके आदी) केवडा, करपा व भुरी रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. विविध रोगांपासून बचाव होण्यासाठी पिकांवर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पेरणी करावी, असे सांगण्यात आले. गहू गेल्या 10 नोव्हेंबरपासून पेरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे गहू पिकावर रोग उद्भवण्याची शक्यता कमी आहे.

मिरची पडते काळी

ढगाळ वातावरण शेतक:यांप्रमाणेच मिरची व्यापा:यांसाठीही नुकसानदायी ठरत आहे. अशा वातावरणात पथा:यांवरील 34 ते 40 टक्के मिरची काळी पडते. गेल्या दोन दिवसांपासून मिरची वाळवण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे.

मिरचीला आतून बुरशी लागते आणि बाहेरून मात्र लाल दिसते. आजच्या स्थितीत शहरात भालेर रस्त्यावर 25 पथा:यांवर तेवढय़ाच व्यापा:यांच्या मिरच्या वाळवण्यासाठी टाकण्यात आल्या आहेत.

मिरची एकदा तोडल्यानंतर पथा:यांवर टाकण्याशिवाय पर्याय नसतो. बदललेले वातावरण, दोन दिवसात झालेला पावसाचा शिडकावा यामुळे मिरची व्यापारी हतबल झाले आहेत.