शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘गिरणा’च्या रब्बी आवर्तनाचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 22:05 IST

अत्यल्प प्रतिसाद : अपेक्षित पाणी मागणीअभावी कालवे कोरडेठाक, नियोजनाची गरज

संजय हिरे ।खेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी मागणी अर्जाची मुदत दोन वेळेस वाढवूनही लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही. यामुळे अपेक्षित पाणी मागणी अर्जाअभावी ठरवलेल्या रब्बी हंगामाच्या वेळापत्रकानुसार गिरणा कालव्यांना आवर्तन तर सुटले नाहीच, परंतु शेतकऱ्यांची अशीच उदासीनता यापुढेही कायम राहिल्यास गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यातील शेतीसाठी आवर्तनाची गरज आहे की नाही? अशी चिंता व्यक्त होत आहे.प्राप्त माहितीनुसार, पांझण, जामदा व दहिगाव या गिरणा कालवा लाभक्षेत्रातून फक्त ४ हजार ३४१ हेक्टर क्षेत्राची पाणी मागणी आजवर आली आहे. प्रत्यक्षात या कालव्यांचे लाभक्षेत्र ५० हजार हेक्टरवर आहे. याशिवाय एक लाख हेक्टरवर क्षेत्राला अप्रत्यक्षपणे गिरणा कालव्यांना आवर्तन सोडल्यावर लाभ होत असूनही शेतकरी मागणी अर्ज भरत नाही, अशी खंत पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयाने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.यंदा गिरणा धरणात शंभर टक्के जलसाठा झाल्याने पाटबंधारे विभागाने रब्बी हंगामासाठी १५ आॅक्टोबर ते २८ फेब्रुवारी या दरम्यान कालव्यांना आवर्तन सोडण्याचे जाहीर केले. सुरवातीला ३० नोव्हेंबरपर्यंत व त्यानंतर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत वाढवूनही अपेक्षित पाणी मागणी झाली नाही. ही चिंताजनत बाब आहे.यास अनेक कारणे असली तरी डिसेंबरपर्यंत लाबंलेला खरीप हंगाम, अतिवृष्टीमुळे विहिरींना, नदी-नाल्यांना असलेले मुबलक पाणी व गिरणा धरण भरुनही उन्हाळी हंगाम नजरेआड करीत फक्त रब्बी हंगाम डोळ्यासमोर ठेवत पाटबंधारे विभागाने जाहीर केलेला कार्यक्रम व कर्मचाºयांना चिरीमिरी देत केली जाणारी आवर्तनातील पाण्याची चोरी, नादुरुस्त पाटचाºया हे कमी पाणी मागणी अर्ज आल्यामागची प्रमुख कारणे आहेत.आता रब्बी हंगामातील गहू, हरभरा आदी पिकांचा पेरणीचा कालावधी जवळजवळ आटोपला आहे.आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांतच रब्बीची पेरणी केल्यास चांगले उत्पादन मिळते.आजच्या कालवा समितीच्या बैठकीकडे लक्षगिरणा धरणातून रब्बी हंगामासाठी अपेक्षित पाणी मागणी अर्ज न आल्याने ठरलेल्या नियोजनानुसार रब्बीसाठी कालव्यांना आवर्तन सोडण्याचा धोका पाटबंधारे विभागाच्या अधिका-यांनी पत्करला नाही. यामुळे हा निर्णय आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आठ जानेवारी रोजी कालवा समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. मात्र आता रब्बी हंगामाचा कालावधी हुकल्याने रब्बी-उन्हाळी अशा संमिश्र हंगामाचे नियोजन होण्याची आवश्यकता जाणकार व्यक्त करीत आहेत. लेट रब्बीसाठी अर्थात मार्चअखेरपर्यंत तिसरे आवर्तन सुटेल, यास पाटबंधारे विभागाकडून दुजोरा मिळत आहे.रब्बी-उन्हाळी संमिश्र हंगामासाठी नियोजन हवेआता पाटबंधारे विभागाला गिरणा कालव्यांना आवर्तन सोडावयाचे झाल्यास रब्बी-उन्हाळी अशा संमिश्र हंगामासाठी आवर्तनाचे नियोजन करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. उशिरा मार्चपर्यंत किंवा १५ एप्रिलपर्यंत सिंचनासाठी आवर्तनाचे नियोजन झाल्यासच शेतकºयांकडून पाण्याची मागणी वाढू शकते. उन्हाळी बाजरी, सूर्यफुल, भुईमुग व ज्वारी आदी पीक घेण्याकडे शेतकºयांचा कल आहे.