शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

गाळेधारकांचा प्रश्न अधांतरीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:17 IST

आतापर्यंत गाळेधारकांकडून झालेली वसुली - ८५ कोटी पूर्ण रक्कम भरलेले गाळेधारक - २६१ मनपाने आतापर्यंत सील केलेले गाळे- ...

आतापर्यंत गाळेधारकांकडून झालेली वसुली - ८५ कोटी

पूर्ण रक्कम भरलेले गाळेधारक - २६१

मनपाने आतापर्यंत सील केलेले गाळे- ३५

गाळेधारकांकडे असलेली थकीत वसुली- १७० कोटी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न अजूनही सुटत नसून हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा होत आहे. शहरातील १६ मार्केटमधील गाळेधारकांनी गेल्या महिनाभरापासून संप पुकारला आहे. मात्र या संपाकडे मनपा प्रशासनासह मनपातील सत्ताधारी व विरोधकदेखील लक्ष घालायला तयार नाहीत. मनपा प्रशासनाकडूनदेखील गाळेधारकांकडील थकीत वसुलीसाठीदेखील कोणतेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासूनचा हा प्रश्न अजूनही अधांतरीच अवस्थेतच आहे.

महापालिकेच्या मुदत संपलेला मार्केटमधील गाळेधारकांचा प्रश्न हा गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत सर्वोच्च न्यायालयानेदेखील महापालिकेच्या बाजूने निर्णय देत गाळे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. मात्र महापालिका प्रशासनदेखील कोणतीही कारवाई करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचे दिसून येत नाही. आता कोरोनाची भीषण परिस्थिती असताना महापालिका प्रशासनाने गाळेधारकांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. गाळेधारकांच्या प्रश्नावर महापालिकेचे सर्व आर्थिक गणित अवलंबून आहे, असे असतानादेखील याबाबत महापालिका प्रशासन गांभीर्याने लक्ष देताना दिसून येत नाही तसेच यातून तोडगा काढून गाळेधारक व महापालिकेचे ही आर्थिक हित साधता येईल, असा मार्गदेखील काढायला मनपा प्रशासन किंवा सत्ताधारीदेखील फारसे गंभीर नाही.

प्रशासनाच्या त्या प्रस्तावाला सत्ताधारी महासभेत मंजुरी देतील का?

गाळेधारकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्नावर मनपा प्रशासनाने तोडगा काढण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात प्रस्ताव तयार केला होता. तसेच महासभेपुढे हा प्रस्ताव मांडण्यासाठीदेखील प्रशासनाने महापौरांकडे पाठवण्यात आला होता. मात्र तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव महासभेपुढे येऊ दिला नव्हता, अजूनही हा प्रस्ताव प्रशासनाकडे पडून आहे. महापालिकेत सत्तांतर झाल्यामुळे भाजपची सत्ता जाऊन शिवसेनेकडे महापालिकेची सत्ता आली आहे. अशा परिस्थितीत नवीन महापौर जयश्री महाजन या मनपा प्रशासनाच्या गाळेधारकांबाबतचा त्या प्रस्तावाला महासभेत येऊ देतील का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे. तसेच महापौरांनी गाळेधारकांच्या प्रश्न नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडून यावर तोडगा काढण्याचे आश्वासन गाळेधारकांना दिले आहे. मात्र आतापर्यंत याबाबत नगरविकास मंत्र्यांशी कोणताही पाठपुरावा सत्ताधाऱ्यांनी केलेला नाही. यासह पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी गाळेधारकांना आश्वासन दिले होते; मात्र अजूनही याबाबत कोणतीही बैठक झालेली नाही.