शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
3
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
4
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
5
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
6
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
7
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
8
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
9
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
10
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
11
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
12
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
13
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
14
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
15
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
16
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
17
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
18
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
19
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
20
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

...हा तर एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 12:46 IST

-अशोक कोतवाल

ठळक मुद्देदमनाच्या प्रकाराविरुद्ध निषेध नोंदवणे गरजेचेच; इतर साहित्यिकांचाही हा अपमानच

जळगाव : यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमलेनात ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक यांना उद्घाटनासाठी निमंत्रण देवून नंतर ते रद्द करणे म्हणजे साहित्यिकाचा अपमान करण्याचाच प्रकार आहे. संमलेनात कोणास बोलवावे, येणाऱ्याने काय बोलावे यासाठी दबावातून हे प्रकार घडणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हा घाला आहे, असे स्पष्ट मत साहित्यिक अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले. या एकूण प्रकाराबाबत त्यांची विशेष मुलाखत त्यांच्या शब्दात...प्रश्न - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्भवलेल्या वादाबद्दल आपणास काय वाटते?नयनतारा सहगल यांना संमेलनाचे निमंत्रण देवून नंतर मागे घेणे हे अत्यंत चुकीचे आहे. हे दडपणाच्या प्रकारामुळेच घडले. याचा मी निषेध करतो. असे प्रकार व्हायलाच नको. साहित्य संमेलनात आतापर्यंत विविध ठिकाणी विविध कलावंत व विविध भाषिक कलावंतांना बोलविण्यात आले आहे. भाषा व कलाप्रकार अस भेद केला गेला नाही. जळगावात १९८४ मध्ये झालेल्या संमेलनात हिंदी साहित्यिका महादेवी वर्मा यांना बोलविण्यात आले होते. पुण्यात अमिताभ बच्चन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही परंपरा असताना आताच का प्रश्न निर्माण झाला? असे प्रकार होणे चुकीचेच आहे.प्रश्न- सहगल यांचे निमंत्रण रद्द केल्यानंतर साहित्यिकांनी संमेलनावर बहिष्कार टाकणे योग्य वाटते का?सहगल यांंना निमंत्रण दिल्यावर ते रद्द करणे हा केवळ त्यांचाच अपमान नाही. तर साहित्य संमेलनात जे दमनाचे प्रकार होत आहे, त्याद्वारे इतर सर्व साहित्यिकांचा अपमान झाल्यासारखे आहे. या विरुद्ध सर्वच साहित्यिकांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.संमेलनाच उपस्थित न राहण्याचा निर्णय हा अगदी योग्य असून सर्वांची निषेधही केला आहे.आपण स्वत : साहित्य संमेलनाला जाणार आहात का?झालेला प्रकार निंदनीय असल्याने त्या विरुद्ध तीव्र प्रतिक्रिया उमटणे आवश्यक आहे, असे मला वाटत असताना मी साहित्य संमलेनास जाण्याचा प्रश्नच नाही. झालेल्या प्रकाराचे समाजात उमटणारे पडसाद योग्य असून साहित्यिकांनी संमेलनास न जाणेच योग्य आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप होतो असे वाटते का?सुरवातीस सहगल यांना निमंत्रणे देणे व नंतर ते परत घेणे यामागे निश्चितच हस्तक्षेप आणि दबावाचा प्रकार असून या मागे राजकीय शक्ती आहेच, परंतु त्यांनी छुप्या पद्धतीने हस्तक्षेप केला. संमेलनात काय बोलावे व काय बोलू नये, भाषा प्रांतवाद अशा गोष्टींवर आक्षेप घेतला जावू लागला आहे. आधी चुकीचा हस्तक्षेप करायचा व विरोधात प्रतिक्रिया आल्यावर सारवासारव करण्याला काहीच अर्थ नाही. आधीच विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट मत अशोक कोतवाल यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखत