शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
4
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
5
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
7
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
8
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
10
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
11
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
12
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
13
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
14
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
15
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
16
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
17
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
18
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
19
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
20
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...

विश्वासघातकी भाजपला दूर ठेवून ‘मविआ’शी जुळवून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

जळगाव : गेली २५ वर्षे भाजपसोबत एकत्र राहून सर्व निवडणुका आपण सोबत लढविल्या, मात्र या मित्राने नेहमी शिवसेनेसोबत कपटपणा ...

जळगाव : गेली २५ वर्षे भाजपसोबत एकत्र राहून सर्व निवडणुका आपण सोबत लढविल्या, मात्र या मित्राने नेहमी शिवसेनेसोबत कपटपणा वागला. त्यामुळे राज्याच्या भल्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस मिळून राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आली आहे.

भाजपने दिलेल्या दगाफटक्याला उत्तर देण्याची वेळ आली असून, आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत विश्वासघातकी भाजपला धडा शिकवा, अशा सूचना नेत्यांनी शिवसैनिकांना दिल्या आहेत. तसेच ज्या ठिकाणी ताकत कमी असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी जुळवून घ्या, अशाही सूचना सेना नेत्यांनी दिल्या आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा शिवसेनेच्या लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा जिल्हा मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी लेवा भवन येथे करण्यात आले होते. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, लता सोनवणे, महानगरप्रमुख शरद तायडे, शहर संघटक दिनेश जगताप, माजी महापौर विष्णू भंगाळे, नगरसेवक नितीन बरडे, प्रशांत नाईक, गटनेते अनंत जोशी आदी उपस्थित होते.

..तर खासदार शिवसेनेचाच होईल : गुलाबराव पाटील

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना क्रमांक एकचा पक्ष आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातही आपले दोन आमदार आहेत. ग्रामपंचायत निवडणुका कशा लढायच्या, हे सांगायची शिवसैनिकाला गरज नाही. म्हणूनच वर्षानुवर्षे पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर आपले प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत. ग्रामपंचायत निवडणूक जास्तीत जास्त बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. पुढे जाऊन जिल्हा परिषदेची निवडणूक होईल, त्यात आपल्या ताकदीचा फायदा होईल असेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेची ताकत पाहता पुढील खासदार देखील शिवसेनेचाच होईल, अशी खात्रीही गुलाबराव पाटील यांनी दिली.

नेत्यांनी जुळवून घेतले कार्यकर्त्यांनीही जुळवून घ्यावे : संजय सावंत

ग्रामपंचायतीची निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. ही निवडणूक पक्षविरहित मानली जात असली तरी महाविकास आघाडी सरकारने केलेल्या

कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवा. आता आपण महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत. ज्यांच्याशी आपण अनेक वर्षे मैत्री केली,

त्यांनी आपला विश्वासघात केला आहे. आता आपण आजवर विरोधक असलेल्या पक्षांसोबत आहोत. विश्वासघात करणाऱ्यांशी आपल्याला लढायचे आहे, असे संजय सावंत यांनी सांगितले. मोठ्या नेत्यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादीशी जुळवून घेतले असून, आता कार्यकर्त्यांनींही जुळवून घ्यावे असेही आवाहन सावंत यांनी केले.

कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा

जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा झेंडा फडकेल, या पद्धतीने काम करण्याची गरज आहे. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जरूर प्रयत्न करू. पण ज्या ठिकाणी अडचणी आहेत, आपली ताकद कमी आहे, त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा.

यावेळी सरपंचाचे आरक्षण निकालानंतर कळणार असल्याने ‘''ब्लाइंड गेम’ खेळावा लागणार आहे. आजवर आपण भाजपसोबत होतो. पण भाजपने आपला विश्वासघात केला आहे. आपला प्रमुख शत्रू भाजप आहे, हे लक्षात घ्या, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. चिमणराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना ग्रा.पं.निवडणुकीत तयारी करण्याचा सूचना दिल्या. यावेळी तालुकांप्रमुखांकडून आढावा घेण्यात आला.