शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

जिल्ह्यात हरभऱ्याची २९ हजार क्विंटल खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ ९० टक्के पीक काढण्यात आले असून, लवकर जिल्ह्यात शासकीय खरेदीला सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यात रब्बीचे जवळजवळ ९० टक्के पीक काढण्यात आले असून, लवकर जिल्ह्यात शासकीय खरेदीला सुरुवात होणार आहे. हरभऱ्याच्या खरेदीला जिल्ह्यात सुरवात झाली असून जिल्ह्यातील १४ केंद्रांवर आतापर्यंत २९ हजार क्विंटल हरभऱ्याची खरेदी करण्यात आल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी जी.एन. मगर यांनी दिली आहे. तसेच गहू, मका व दादरच्या शासकीय खरेदीला देखील लवकरच सुरुवात होणार असून, यासाठी जिल्ह्यात १६ केंद्रांवर नोंदणी सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

जिल्हा मार्केटिंगतर्फे शासकीय खरेदीस लवकरच सुरुवात होणार असून , जिल्ह्यातील १६ केंद्रांवर नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. ३० एप्रिल पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी सातबाराचा उतारा, आधार कार्ड व बँकेचे पासबुक हे जमा करायचे आहे. जळगाव तालुक्यातील नोंदणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुरू आहे. तर इतर तालुक्यांमध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रांवर व बाजार समित्यांमध्ये देखील ही नोंदणी सुरू असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली आहे. यंदा हरभऱ्याला चांगला भाव मिळाला असून, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या केंद्रावर ५१०० रुपये प्रति क्विंटल या दराने हरभऱ्याची खरेदी केली जात आहे. शासकीय खरेदी केंद्रांवर चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे खाजगी बाजारापेक्षा शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विक्री करण्यास प्राधान्य दिसून येत आहे.

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर व्यापाऱ्यांकडून केली जाते विक्री

दरवर्षी शासनाकडून रब्बी पिकांच्या खरेदीला उशीर केला जात असतो, यामुळे अनेक शेतकरी आपला माल निघाल्यानंतर व्यापाऱ्यांकडे विक्री करत असतात, रब्बी हंगामाच्या काढणीला सुरुवात झाल्यानंतर जर शासनाने खरेदीला सुरुवात केली तर शेतकरी आपला माल थेट शासकीय खरेदी केंद्रावर आणू शकतात. मात्र शासन अजूनही याबाबत गंभीर नसल्याचे दिसून येते, हरभऱ्याची खरेदी जरी सुरू असली तरी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या नावावर अनेक व्यापारी आपला माल विक्री करत असल्याचीही माहिती अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे. ज्या शेतकऱ्यांनी आधी खासगी व्यापाऱ्यांना ४५०० रुपये दराने हरभऱ्याची विक्री केली होती. आता तेच व्यापारी शेतकऱ्यांचे उतारे घेऊन ५१०० रुपये दराने आपला माल शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करत आहेत. दरवर्षी हा प्रकार सुरू असून याबाबत शासन किंवा प्रशासन देखील कोणतेही लक्ष घालायला तयार नाही. जर रब्बी हंगाम काढायला सुरुवात झाली तेव्हाच शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले तर अशा प्रकारांना आळा बसू शकतो.

दादरची कवडीमोल भावात केली जातेय खरेदी

सध्या दादरला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३१०० रुपये प्रति क्विंटल इतका भाव निश्चित केला आहे. मात्र हा भाव निश्चित केला असला तरी बाजार समितीमध्ये दादरला केवळ २२०० ते २३०० रुपये इतका दर मिळत असून, त्यातही कट्टी कापून घेतली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. विशेष म्हणजे बाजार समिती प्रशासनाने गेल्या महिन्यात शेतकऱ्यांनी केलेल्या गोंधळानंतर दादरला ३१०० रुपये इतका भाव निश्चित केला होता. मात्र व्यापाऱ्यांकडून अजूनही शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तसेच याबाबतीत बाजार समिती प्रशासनाकडून देखील कोणतीही कारवाई केली जात नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.