शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होणार की नाही? संभ्रम वाढला; मनसे नेते म्हणतात, “एकटे लढू, तयारी आहे”
2
मोठी बातमी : केरळमधील नर्स निमिषा प्रिया हिला होणारी फाशी टळली, भारताच्या मुत्सद्देगिरीला यश, पडद्यामागे घडल्या अशा घडामोडी 
3
चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्याच्या किंमतीतही झाला बदल; १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार
4
Mumbai Rains: मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी, उपनगरात जोरदार हजेरी; अंधेरी सबवे बंद!
5
असं काय घडलं की लिव्हइनमध्ये राहणाऱ्या बॉयफ्रेंडनं दोन मुलांच्या आईला यमसदनी धाडलं?
6
WTC Points Table : ऑस्ट्रेलिया १०० टक्केसह टॉपर! टीम इंडियापेक्षा अजूनही श्रीलंकन भारी!
7
"झोप येत नाहीये...!"; राधिका यादव हत्या प्रकरणात 'लव्ह जिहाद'च्या चर्चेवर आईची शपथ घेत काय म्हणाला इनामुल हक?
8
अंगठी विकता विकता कोट्यधीश बनला, दुबईहून यायचे मौलाना; गरीब युवतींना 'असं' जाळ्यात अडकवायचे, मग...
9
अमेरिकेत ३८ लाख, मग भारतात Tesla ची कार इतकी महाग का? जाणून घ्या कारण...
10
हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून
11
धावत्या बसमध्येच प्रसूती, नंतर बाळाला बाहेर फेकलं; कथित पती-पत्नीचा अमानुष प्रकार
12
"एकनाथ शिंदे पण त्यातलेच!" संजय गायकवाड आणि संजय शिरसाठ यांचे नाव घेत अंबादास दानवे संतापले!
13
शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकमध्ये पडणार खिंडार, माजी खासदार हेमंत गोडसेही भाजपच्या वाटेवर?
14
SBI, HDFC सह ६ म्युच्युअल फंडांनी 'या' १३ स्मॉल कॅप कंपन्यांमधून काढले हात! तुमचे तर पैसे नाहीत ना?
15
अमेरिकेने भारताला दिले गिफ्ट, पाकिस्तानचा थयथयाट; घातक फायटर जेटसाठी पाठवले खास इंजिन
16
Ganpati Extra Buses for Konkan : गुड न्यूज! चाकरमान्यांना बाप्पा पावला; गणेशोत्सवासाठी कोकणात STच्या जादा ५ हजार बस धावणार
17
SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! या तारखेला ATM, UPI, IMPS, NEFT सेवा राहणार बंद; पाहा डिटेल्स
18
Air India Plane Crash : मोठा दावा! विमान अपघातापूर्वीच इंधन नियंत्रण स्विच खराब असल्याचा इशारा'CAA'ने दिला होता
19
Raigad Heavy Rain: रायगडमध्ये पावसाचा कहर! सहा तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी
20
पत्नीला जाळून मारल्याप्रकरणी पतीला अटक, पण ती प्रियकरासोबत सापडली जिवंत, सोलापूरातील धक्कादायक प्रकार

समांतर रस्त्यांसाठी गडकरींना घालणार साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2017 00:44 IST

एक नागरिक मंचचा पुढाकार : मनपा आयुक्तांकडून घेतली माहिती; उद्या जाहीरसभा

जळगाव : राष्ट्रीय महामार्गालगतच्या समांतर रस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून कुठलेही पावले उचलली जात नसल्याने सर्वपक्षीय पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केल़े आता या समांतर रस्त्यांसाठी एक नागरिक मंचने पुढाकार घेतला असून यासाठी मंचचे पदाधिकारी केंद्रीयभूप्रृष्ठमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घालणार आह़े याच विषयावर मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़ेराष्ट्रीय महामार्गावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आह़े या महामार्गावर अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तरूणांचा अधिक समावेश आह़े खोल साईडपट्ट्या, महामार्गावरील खड्डे, अरूंद रस्ता यामुळे अपघातात नाहक निष्पांपाचा बळी जात आह़े  सर्वपक्षीय तसेच संस्था पदाधिका:यांनी जिल्हाधिका:यांना निवेदन देवून दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेल्या समस्येवर पर्यायी उपाययोजनेसाठी साकडे घातले होत़े यानंतर जिल्हा प्रशासनाकडून अधिका:यांच्या बैठक घेवून समांतर रस्त्याचा विषयाला हात घालण्यात आला़ जैन इरिगेशनच्या सहकार्याने महापालिका प्रशासनातर्फे राष्ट्रीय महामार्गालगत अभियांत्रिकी महाविद्यालय ते अग्रवाल चौक व चौफुली, इच्छादेवी ते अजिंठा चौफुली या समांतर रस्ते सपाटीकरणाचे काम केल़े काही दिवसानंतर हे काम थांबले. आता सपाटीकरण झालेल्या जागेवर अतिक्रमणे वाढत आहेत. आयुक्तांकडून घेतली माहितीसमांतर रस्त्यांसाठी नागरिकांनी एकत्र यावे, जनजागृती व्हावी, यासाठी मंचतर्फे 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जयप्रकाश नारायण चौक, नवीपेठ येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आह़े यात नागरिकांच्या तक्रारी तसेच मते जावून घेवून समांतर रस्त्यांसाठी पुढची दिशा ठरविण्यात येणार आह़े या समांतर रस्त्यांबाबतच्या आवश्यक माहितीसाठी गुरूवारी विराज कावडीया, विनोद देशमुख, मितेश गुजराथी, मुविकराज कोल्हे या पदाधिका:यांनी आयुक्त जीवन सोनवणे यांची भेट घेतली़समांतर रस्ते महामार्ग विभागाकडून पालिकेकडे वर्ग करण्यात आलेले नाहीत़ वर्ग झाल्यावरही बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मनपा हे काम करू शकत नाही, असे आयुक्तांनी पदाधिका:यांना सांगितल़े आता माहिती अधिकारात कागदपत्रे मिळवून लवकरच  नितीन गडकरी यांची भेट घेणारअसल्याचेविराजकावडीयायांनीलोकमतलासांगितल़ेशहरातून जाणा:या महामार्गावरील अपघातांचे प्रमाण मोठे आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन प्रस्तावित समांतर रस्त्यांसाठी आपण सहा वर्षापासून पाठपुरावा करीत आहोत. त्यासाठी उपोषण केले, महापालिकेच्या सभागृहात विषय गांभीर्याने मांडला पण उपयोग झाला नाही. त्यामुळे या लढय़ात जनसहभाग असावा या उद्देशाने आता लोकांना बरोबर घेऊन समांतर रस्त्यासाठी पाठपुरावा  करीत आहोत. एक नागरिक मंच हा जनतेचा असेल. त्यात कोणीही राजकारणी नाही. लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा दबाव आणण्याचा या माध्यमातून प्रय} असून सभेस नागरिक येऊन भविष्यात नियोजन ठरविले जाईल.    -अनंत जोशी, नगरसेवकसमांतर रस्ते हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. रस्त्यांसाठी जागा आहे, काही ठिकाणी रस्ते अस्तित्वातही आहेत पण काही ठिकाणी गायब झाले आहेत. हा रस्ता नियोजनानुसार पूर्ण व्हावा असेच आमचे प्रय} आहेत. हा विषय एकटय़ा व्यक्तीच्या पुढाकारातून निश्चितच होणार नाही. त्यामुळे सभा घेऊन जनजागृती करणे हा प्रमुख उद्देश आमचा आहे. चौपदरीकरण, उड्डाणपूल, सध्या अस्तित्वात असलेल्या महामार्गाचे रूंदीकरण असे किती तरी आश्वासन मिळाले असले तरी प्राधान्य हे समांतर रस्त्याला असून आमचा त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.        -विराज कावडियाशहरातून जाणा:या महामार्गावर प्रमुख चौकात उड्डाणपूल होणार, महामार्ग रूंद केला जाणार, चौपदरीकण होणार या घोषणा आता स्वपAवत वाटू लागल्या आहेत. ते होईल तेव्हा होईल पण मग तोर्पयत निष्पाप नागरिकांचे बळी जाऊ द्यायचे काय? असा माझा शहरवासीयांना सवाल असून त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन लढा पुकारणे हाच मुळ उद्देश आहे. रस्ते पक्के होऊ शकत नसतील तरी ठिक पण कच्चे रस्ते करून ते सलग असावेत अशी अपेक्षा आहे.  आमची सभा ही समांतर रस्ते व्हावेत या साठीच आहे. त्यासाठी प्रथम नागरिकांची बोलावून सभा घेणे, त्यानंतर भविष्यातील धोरण ठरविले जाईल.      -पियुष पाटील.