शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

‘देवळे-रावळे’ पुस्तकाचे जळगावात थाटात प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 10:54 IST

गंधे सभागृहात झाला कार्यक्रम

ठळक मुद्देअ‍ॅड.सुशील अत्रे यांचे ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते सदर जिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादा समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो-दादा महाराज जोशी

जळगाव : जिल्ह्यातील विविध मंदिरांच्या प्रश्नांचा मागोवा घेत अ‍ॅड. सुशील अत्रे यांनी जिल्हाभर भ्रमंती करुन ‘लोकमत’ मधून प्रसिद्ध केलेल्या ‘देवळे रावळे’ या सदरांचे पुस्तक ‘देवळे रावळे’चे प्रकाशन रविवारी सायंकाळी ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी माजी मंत्री सुरेशदादा जैन, प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे होते. व्यासपीठावर अ‍ॅड.अत्रे, नवजीवन सुपर शॉपचे संचालक अनिल कांकरिया उपस्थित होते.जो देतो तो देव, अशी व्याख्या देवाची केली जाते. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याला सभ्यता, सरळता व सत्यता हे अंगी बाळगता आले तर तो देव होतो. चंद्र-सूर्य हे प्रत्यक्षात दिसणारे देव. त्यांच्याशिवाय धान्यही पिकू शकत नाही. आपण सगळ्या समाजाला प्रेम दिले तर माणसाचाही देव होऊन जातो, असे प्रतिपादन चिमुकले राम मंदिराचे पुजारी दादा महाराज जोशी यांनी केले. पुस्तकाचे लेखक अ‍ॅड.सुशील अत्रे यांनी मनोगतात सांगितले की, ‘प्राचीनत्व’ हा निकष ठेवून २०० अथवा त्यापेक्षा अधिक जुनी परंपरा असलेल्या मंदिरांना भेट देऊन माहिती घेतली. इंटरनेटवरून कोणतही माहिती न घेता स्वत: तेथील पुजारी, मंदिराबाहेर वर्षानुवर्ष फुलविक्री करणारे विक्रेते, इतकेच काय भिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली. सुरूवातीला पाटणादेवी, पद्मालय, तरसोद अशी मंदिरे घेतली. त्याबाबतचे लेख ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध व्हायला लागल्यावर लोकांकडून स्वत:हून मला फोनयेऊ लागले. त्या मंदिरांनाही मी भेटी दिल्या. २०१४ मध्ये म्हसव्याच्या मंदिरासमोरच सूर्यमंदिर असल्याचे मला आढळून आले. त्याबाबत छापून आल्यानंतर आज त्या ठिकाणी जिर्णोद्धार होऊन मोठे मंदिर झाले. पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी विस्मरणात चाललेला वारसा अ‍ॅड.अत्रे यांनी डोळस श्रद्धेने बघत समाजासमोर आणला. हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी यांनी तर आभार आकाश कांकरिया यांनी मानले. स्मृती जोशी हिने सादर केलेल्या पसायदान नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.----जिल्ह्याचा समृद्ध वारसा जगासमोर आला-सुरेशदादासुरेशदादा जैन म्हणाले की, अ‍ॅड.अत्रे यांनी २०१४ मध्ये वर्षभर जिल्ह्यातील प्राचीन देवळांना भेट देऊन अभ्यास करून वेगळ्या दृष्टीने लिखाण केले. ‘लोकमत’मध्ये निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी ते मालिका स्वरूपात प्रसिद्ध केले. जिल्हा परंपरेने किती समृद्ध आहे? याची माहिती त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचली. आज ते पुस्तक रूपात लोकांपर्यंत जात आहे.