शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:54 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालण्याचे केली नागरिकांनी मागणी

ठळक मुद्देप्रस्तावित बायपास पुरा भागातून निघुन बोदवड पुलाजवळ निघणारसार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात करावीभुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतराचा फेरा कमी

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.९ : भुसावळहून औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग जामनेर शहराच्या मध्यवस्तीतून जात असल्याने अवजड वाहनांची वाहतुक वाढली आहे. परिणामी शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणुन हा मार्ग शहराबाहेरुन काढण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी यापूर्वीच सांगितले. या कामास तत्काळ सुरुवात करुन गती मिळावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.भुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जळगावमार्गे जाण्याएवेजी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतर वाचते. त्यामुळे वाहनधारक या मार्गाने जाणे पसंत करतात. इंदूर येथून पुणे, औरंगाबाद अथवा जालनामार्गे हैद्राबाद जाणारी वाहने जामनेरहून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाºया या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय कार्यालय आहेत. अवजड वाहनांची वर्दळ व शहरातील अंतर्गत वाहतुकीमुळे सतत वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने हा मार्ग शहराबाहेरुन काढणार असल्याचे महाजन यांनी यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. हा प्रस्तावित बायपास पुरा भागातुन निघुन बोदवड पुलाजवळ निघेल.बायपास रस्ता पुढे मुंबई नागपूर मागार्ला मिळणार असल्याने या मार्गावरील वाहने देखील बाहेरुनच भुसावळकडे वळविणे शक्य आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या कामास तातडीने सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.

 बायपास रस्त्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पुर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.जी. एस. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां उपविभाग,जामनेर.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर