शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:54 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालण्याचे केली नागरिकांनी मागणी

ठळक मुद्देप्रस्तावित बायपास पुरा भागातून निघुन बोदवड पुलाजवळ निघणारसार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात करावीभुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतराचा फेरा कमी

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.९ : भुसावळहून औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग जामनेर शहराच्या मध्यवस्तीतून जात असल्याने अवजड वाहनांची वाहतुक वाढली आहे. परिणामी शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणुन हा मार्ग शहराबाहेरुन काढण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी यापूर्वीच सांगितले. या कामास तत्काळ सुरुवात करुन गती मिळावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.भुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जळगावमार्गे जाण्याएवेजी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतर वाचते. त्यामुळे वाहनधारक या मार्गाने जाणे पसंत करतात. इंदूर येथून पुणे, औरंगाबाद अथवा जालनामार्गे हैद्राबाद जाणारी वाहने जामनेरहून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाºया या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय कार्यालय आहेत. अवजड वाहनांची वर्दळ व शहरातील अंतर्गत वाहतुकीमुळे सतत वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने हा मार्ग शहराबाहेरुन काढणार असल्याचे महाजन यांनी यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. हा प्रस्तावित बायपास पुरा भागातुन निघुन बोदवड पुलाजवळ निघेल.बायपास रस्ता पुढे मुंबई नागपूर मागार्ला मिळणार असल्याने या मार्गावरील वाहने देखील बाहेरुनच भुसावळकडे वळविणे शक्य आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या कामास तातडीने सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.

 बायपास रस्त्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पुर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.जी. एस. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां उपविभाग,जामनेर.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर