शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

जामनेर बायपासच्या कामाला सार्वजनिक बांधकाम विभागाने गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 17:54 IST

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष घालण्याचे केली नागरिकांनी मागणी

ठळक मुद्देप्रस्तावित बायपास पुरा भागातून निघुन बोदवड पुलाजवळ निघणारसार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ कामाला सुरुवात करावीभुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतराचा फेरा कमी

आॅनलाईन लोकमतजामनेर,दि.९ : भुसावळहून औरंगाबादकडे जाणारा राज्यमार्ग जामनेर शहराच्या मध्यवस्तीतून जात असल्याने अवजड वाहनांची वाहतुक वाढली आहे. परिणामी शहराच्या वाहतुक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. यावर उपाय म्हणुन हा मार्ग शहराबाहेरुन काढण्यात येणार असल्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी यापूर्वीच सांगितले. या कामास तत्काळ सुरुवात करुन गती मिळावी अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे.भुसावळहून औरंगाबाद जाण्यासाठी जळगावमार्गे जाण्याएवेजी जामनेरमार्गे गेल्यास सुमारे २५ किमी अंतर वाचते. त्यामुळे वाहनधारक या मार्गाने जाणे पसंत करतात. इंदूर येथून पुणे, औरंगाबाद अथवा जालनामार्गे हैद्राबाद जाणारी वाहने जामनेरहून जातात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते.शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाºया या रस्त्यावर शाळा, महाविद्यालय, उपजिल्हा रुग्णालय व शासकीय कार्यालय आहेत. अवजड वाहनांची वर्दळ व शहरातील अंतर्गत वाहतुकीमुळे सतत वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने हा मार्ग शहराबाहेरुन काढणार असल्याचे महाजन यांनी यापूर्वी एका जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. हा प्रस्तावित बायपास पुरा भागातुन निघुन बोदवड पुलाजवळ निघेल.बायपास रस्ता पुढे मुंबई नागपूर मागार्ला मिळणार असल्याने या मार्गावरील वाहने देखील बाहेरुनच भुसावळकडे वळविणे शक्य आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या कामास तातडीने सुरुवात करावी अशी मागणी होत आहे.

 बायपास रस्त्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या तीन महिन्यात हे काम पुर्ण होईल. त्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात केली जाईल.जी. एस. पाटील, उपविभागीय अभियंता, सा.बां उपविभाग,जामनेर.

टॅग्स :JalgaonजळगावJamnerजामनेर