शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

हंगामपूर्व कापूस लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कापूस लागवड करावी, असे आवाहन केले आहे. तसेच बियाणेदेखील १ जूननंतरच बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र, कृषी विभागाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून, १५ मेनंतर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात कापसाचा पेरा अंदाजे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर आहे. यापैकी बागायत कापसाची लागवड प्रामुख्याने शेतकरी मे महिन्यात करीत असतो; परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार १ जूननंतर शेतकऱ्यांना कापूस बियाणे उपलब्ध व्हावे, असे आदेशित केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत खा. उन्मेष पाटील यांनीदेखील कृषी सचिवांकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

तर परराज्यातून बियाणांचा होऊ शकतो काळाबाजार

कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध न झाल्यास, शेतकरी जवळच्या राज्यातून अथवा काळाबाजारातून या पर्यायी मार्गाने बियाणे खरेदी करतील. यात त्यांना बोगस बियाणे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘एक गाव एक वाण’ याला देखील एक जूननंतर बियाणे उपलब्ध झाल्यास या कार्यक्रमाला हरताळ फासले जाईल. कारण शेतकरी कापूस लागवडीसाठी जून महिन्यापर्यंत थांबत नसतो ही वस्तुस्थिती असल्याचे राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्त यांच्याकडे खा. उन्मेष पाटील यांनी कळविले आहे.

बागायती कापूस लागवड झाल्यास, तीन हंगाम घेता येऊ शकतात

असोदा येथे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी सांगतात की, जिल्ह्यात ७० टक्के शेतकरी हे बागायती कापसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांना तीन हंगामदेखील घेता येऊ शकतात. कापसानंतर हरभरा व हरभऱ्यानंतर बाजरीची लागवड शेतकरी करतात. मात्र, बागायती कापसाची लागवड न झाल्यास शेतकरी केवळ दोन हंगाम घेतात. तसेच उत्पादनदेखील थोडे उशिरानेच मिळत असते. त्यामुळे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याचप्रमाणे हे चक्र कायम ठेवण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कोट..

बागायती कापसाची लागवड झाल्यास मान्सूनआधीच शेतामध्ये कापसाचा पेरा चांगल्या प्रकारे उतरत असतो. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीदेखील कमी झाला होता. उशिराने लागवड झाल्यास उत्पादनावर देखील मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापसासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे.

-भास्कर खंडू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आडगाव, ता. चोपडा

शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करू नये, असे आवाहन केले जात आहे. गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पसार झाला होता. हंगामपूर्व कापसाची लागवड न झाल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून हा निर्णय घेण्याची गरज आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव.