शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

हंगामपूर्व कापूस लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कापूस लागवड करावी, असे आवाहन केले आहे. तसेच बियाणेदेखील १ जूननंतरच बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र, कृषी विभागाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून, १५ मेनंतर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात कापसाचा पेरा अंदाजे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर आहे. यापैकी बागायत कापसाची लागवड प्रामुख्याने शेतकरी मे महिन्यात करीत असतो; परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार १ जूननंतर शेतकऱ्यांना कापूस बियाणे उपलब्ध व्हावे, असे आदेशित केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत खा. उन्मेष पाटील यांनीदेखील कृषी सचिवांकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

तर परराज्यातून बियाणांचा होऊ शकतो काळाबाजार

कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध न झाल्यास, शेतकरी जवळच्या राज्यातून अथवा काळाबाजारातून या पर्यायी मार्गाने बियाणे खरेदी करतील. यात त्यांना बोगस बियाणे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘एक गाव एक वाण’ याला देखील एक जूननंतर बियाणे उपलब्ध झाल्यास या कार्यक्रमाला हरताळ फासले जाईल. कारण शेतकरी कापूस लागवडीसाठी जून महिन्यापर्यंत थांबत नसतो ही वस्तुस्थिती असल्याचे राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्त यांच्याकडे खा. उन्मेष पाटील यांनी कळविले आहे.

बागायती कापूस लागवड झाल्यास, तीन हंगाम घेता येऊ शकतात

असोदा येथे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी सांगतात की, जिल्ह्यात ७० टक्के शेतकरी हे बागायती कापसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांना तीन हंगामदेखील घेता येऊ शकतात. कापसानंतर हरभरा व हरभऱ्यानंतर बाजरीची लागवड शेतकरी करतात. मात्र, बागायती कापसाची लागवड न झाल्यास शेतकरी केवळ दोन हंगाम घेतात. तसेच उत्पादनदेखील थोडे उशिरानेच मिळत असते. त्यामुळे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याचप्रमाणे हे चक्र कायम ठेवण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कोट..

बागायती कापसाची लागवड झाल्यास मान्सूनआधीच शेतामध्ये कापसाचा पेरा चांगल्या प्रकारे उतरत असतो. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीदेखील कमी झाला होता. उशिराने लागवड झाल्यास उत्पादनावर देखील मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापसासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे.

-भास्कर खंडू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आडगाव, ता. चोपडा

शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करू नये, असे आवाहन केले जात आहे. गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पसार झाला होता. हंगामपूर्व कापसाची लागवड न झाल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून हा निर्णय घेण्याची गरज आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव.