शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

हंगामपूर्व कापूस लागवडीसाठी बियाणे उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कापसाची हंगामपूर्व लागवड केल्यास त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापूस लागवड न करता शेतकऱ्यांनी १ जूननंतरच कापूस लागवड करावी, असे आवाहन केले आहे. तसेच बियाणेदेखील १ जूननंतरच बाजारात उपलब्ध होणार आहे. मात्र, कृषी विभागाच्या या निर्णयाला शेतकऱ्यांचा विरोध होत असून, १५ मेनंतर बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

जिल्ह्यात कापसाचा पेरा अंदाजे साडेचार ते साडेपाच लाख हेक्टर आहे. यापैकी बागायत कापसाची लागवड प्रामुख्याने शेतकरी मे महिन्यात करीत असतो; परंतु शासनाने दिलेल्या आदेशानुसार १ जूननंतर शेतकऱ्यांना कापूस बियाणे उपलब्ध व्हावे, असे आदेशित केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून शासनाने शेतकऱ्यांना कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. याबाबत खा. उन्मेष पाटील यांनीदेखील कृषी सचिवांकडे एका पत्राद्वारे मागणी केली आहे.

तर परराज्यातून बियाणांचा होऊ शकतो काळाबाजार

कापूस बियाणे १५ मेनंतर उपलब्ध न झाल्यास, शेतकरी जवळच्या राज्यातून अथवा काळाबाजारातून या पर्यायी मार्गाने बियाणे खरेदी करतील. यात त्यांना बोगस बियाणे तसेच त्यांची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शासनाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम ‘एक गाव एक वाण’ याला देखील एक जूननंतर बियाणे उपलब्ध झाल्यास या कार्यक्रमाला हरताळ फासले जाईल. कारण शेतकरी कापूस लागवडीसाठी जून महिन्यापर्यंत थांबत नसतो ही वस्तुस्थिती असल्याचे राज्याचे कृषी सचिव तसेच कृषी आयुक्त यांच्याकडे खा. उन्मेष पाटील यांनी कळविले आहे.

बागायती कापूस लागवड झाल्यास, तीन हंगाम घेता येऊ शकतात

असोदा येथे प्रगतिशील शेतकरी किशोर चौधरी सांगतात की, जिल्ह्यात ७० टक्के शेतकरी हे बागायती कापसाची लागवड करतात. यामुळे शेतकऱ्यांना तीन हंगामदेखील घेता येऊ शकतात. कापसानंतर हरभरा व हरभऱ्यानंतर बाजरीची लागवड शेतकरी करतात. मात्र, बागायती कापसाची लागवड न झाल्यास शेतकरी केवळ दोन हंगाम घेतात. तसेच उत्पादनदेखील थोडे उशिरानेच मिळत असते. त्यामुळे जे अनेक वर्षांपासून सुरू आहे त्याचप्रमाणे हे चक्र कायम ठेवण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

कोट..

बागायती कापसाची लागवड झाल्यास मान्सूनआधीच शेतामध्ये कापसाचा पेरा चांगल्या प्रकारे उतरत असतो. तसेच बोंडअळीचा प्रादुर्भाव गेल्या वर्षीदेखील कमी झाला होता. उशिराने लागवड झाल्यास उत्पादनावर देखील मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे कृषी विभागाने हंगामपूर्व कापसासाठी बियाणे उपलब्ध करून द्यावे.

-भास्कर खंडू पाटील, कापूस उत्पादक शेतकरी, आडगाव, ता. चोपडा

शेतकऱ्यांनी हंगामपूर्व कापसाची लागवड करू नये, असे आवाहन केले जात आहे. गेल्या वर्षी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पसार झाला होता. हंगामपूर्व कापसाची लागवड न झाल्यास बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता कमी आहे. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासून हा निर्णय घेण्याची गरज आहे.

-संभाजी ठाकूर, जिल्हा कृषी अधीक्षक, जळगाव.