शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग आणि सरकारच्या समन्वयातून गड-किल्ल्यांचे संवर्धन -श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:44 IST

दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला. एका कार्यक्रमासाठी ते चाळीसगावी आले असता त्यांच्याशी बातचीत झाली. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे उपस्थित होते.प्रश्न : किल्ले संवर्धनाचे काम कसे सुरू झाले?उत्तर : खरं म्हणजे आपले किल्ल्यांबद्दलचे ज्ञान म्हणजे माहीत असलेल्या किल्ल्यांवर जाणे. अर्थात अशा सर्वपरिचित किल्ल्यांची संख्याही फारच कमी आहे. किल्ल्यांचा परिचय करुन देणारे लिखित साहित्यही उपलब्ध नाही. प्रसिद्ध असणाऱ्या गड-किल्ल्यांची दुरावस्था असताना प्रकाशझोतात नसणाºया इतर किल्ल्यांची काय अवस्था असेल? हा प्रश्न म्हणजे आमच्या कामाची सुरुवात आहे. यातूनच पुढे गड-किल्ले शोध मोहीम सुरू केली.प्रश्न : किती गड-किल्ले शोधण्यात यश आले?उत्तर : राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. १५ वर्षांपूर्वी २००४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. एकूण ४०० किल्ल्यांवर आम्हाला पोहचता आले. यासाठी शिवरथ यात्रा काढली. यामुळे बहुतांशी गड-किल्ले पहिल्यांदा समोर आले. दुरवस्था आणि अनास्था यामुळे हे दुर्ग वैभव दुर्लक्षित होत असल्याचे शल्य वेदनादायी होते. मी स्वत: देशभरातील १६६३ किल्ले पाहिले आहेत.प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात येणाºया अडचणी कोणत्या?उत्तर : राज्यातील फक्त ७८ किल्ल्यांना सरकारच्या संरक्षणाचे कवच आहे. उर्वरित ३२२ किल्ले आजही असंरक्षित आहेत. ७८ पैकी ४६ राज्य तर ३२ किल्ले केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. बहुतांशी गड-किल्ल्यांच्या जमिनी स्थानिक गावकºयांच्या नावे आहेत. सातबाºयावर ही नावे आहे. तर किल्ल्यांच्या पायाथ्याशी असणाºया जमिनीचे वाद वनविभाग व राज्य सरकार असे जटील आहे. त्यामुळेच किल्ल्यांच्या संवर्धनात अडचणी येतात. पावसाळी अधिवेशनात गड-किल्ले दुरुस्ती व संवर्धनाचा शासन निर्णय झाल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. वनविभाग आणि शासन यांनी समन्वय ठेवून गड- किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी पुढे यावे, अशी आमची मागणी आहे.प्रश्न : प्रतिष्ठानचे ठळक कार्य काय ?उत्तर : ३० मार्च २०१६ मध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. या विक्रमाची लिमका वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. १४ मे १६५७ ही संभाजी महाराजांची जन्मतारीख पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदवली. इयत्ता सातवीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गडांवर प्रवेशव्दार उभारले. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रव्धज फडकवला. पद्मदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव