शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारलं, RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल; अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
4
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
5
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
6
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
7
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
8
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
9
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
10
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
11
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
12
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
13
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
14
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
15
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
16
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
17
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
18
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
19
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
20
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग आणि सरकारच्या समन्वयातून गड-किल्ल्यांचे संवर्धन -श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:44 IST

दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला. एका कार्यक्रमासाठी ते चाळीसगावी आले असता त्यांच्याशी बातचीत झाली. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे उपस्थित होते.प्रश्न : किल्ले संवर्धनाचे काम कसे सुरू झाले?उत्तर : खरं म्हणजे आपले किल्ल्यांबद्दलचे ज्ञान म्हणजे माहीत असलेल्या किल्ल्यांवर जाणे. अर्थात अशा सर्वपरिचित किल्ल्यांची संख्याही फारच कमी आहे. किल्ल्यांचा परिचय करुन देणारे लिखित साहित्यही उपलब्ध नाही. प्रसिद्ध असणाऱ्या गड-किल्ल्यांची दुरावस्था असताना प्रकाशझोतात नसणाºया इतर किल्ल्यांची काय अवस्था असेल? हा प्रश्न म्हणजे आमच्या कामाची सुरुवात आहे. यातूनच पुढे गड-किल्ले शोध मोहीम सुरू केली.प्रश्न : किती गड-किल्ले शोधण्यात यश आले?उत्तर : राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. १५ वर्षांपूर्वी २००४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. एकूण ४०० किल्ल्यांवर आम्हाला पोहचता आले. यासाठी शिवरथ यात्रा काढली. यामुळे बहुतांशी गड-किल्ले पहिल्यांदा समोर आले. दुरवस्था आणि अनास्था यामुळे हे दुर्ग वैभव दुर्लक्षित होत असल्याचे शल्य वेदनादायी होते. मी स्वत: देशभरातील १६६३ किल्ले पाहिले आहेत.प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात येणाºया अडचणी कोणत्या?उत्तर : राज्यातील फक्त ७८ किल्ल्यांना सरकारच्या संरक्षणाचे कवच आहे. उर्वरित ३२२ किल्ले आजही असंरक्षित आहेत. ७८ पैकी ४६ राज्य तर ३२ किल्ले केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. बहुतांशी गड-किल्ल्यांच्या जमिनी स्थानिक गावकºयांच्या नावे आहेत. सातबाºयावर ही नावे आहे. तर किल्ल्यांच्या पायाथ्याशी असणाºया जमिनीचे वाद वनविभाग व राज्य सरकार असे जटील आहे. त्यामुळेच किल्ल्यांच्या संवर्धनात अडचणी येतात. पावसाळी अधिवेशनात गड-किल्ले दुरुस्ती व संवर्धनाचा शासन निर्णय झाल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. वनविभाग आणि शासन यांनी समन्वय ठेवून गड- किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी पुढे यावे, अशी आमची मागणी आहे.प्रश्न : प्रतिष्ठानचे ठळक कार्य काय ?उत्तर : ३० मार्च २०१६ मध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. या विक्रमाची लिमका वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. १४ मे १६५७ ही संभाजी महाराजांची जन्मतारीख पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदवली. इयत्ता सातवीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गडांवर प्रवेशव्दार उभारले. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रव्धज फडकवला. पद्मदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव