शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Election 2026: अर्ज माघारीसाठी ५०-६० लाखांचं आमिष, विरोधी उमेदवारांच्या घरच्यांवरही दबाव; मनसेचा खळबळजनक आरोप
2
'हिंसक निदर्शनांमध्ये अमेरिका इराणमध्ये घुसण्यास तयार'; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा
3
KDMC Election 2026: डोंबिवलीत मनसेला धक्का, शहराध्यक्षाने अचानक अर्ज घेतला मागे; भाजपा उमेदवार बिनविरोध विजयी
4
Rahul Gandhi : "पाणी नाही, विष वाटलं, प्रशासन कुंभकर्णासारखं झोपेत"; राहुल गांधी आक्रमक, विचारले संतप्त सवाल
5
मनसेच्या बंडखोर उमेदवार अनिशा माजगावकर नॉट रिचेबल! खासदाराच्या मुलीविरोधात मैदानात 
6
Thane Municipal Election 2026: ठाण्यात एकनाथ शिंदेंचा मोठा धमाका! शिवसेनेचे पाच नगरसेवक बिनविरोध विजयी
7
पाकिस्तानच्या हाती लागला मोठा खजिना; देशाची गरिबी दूर होणार? पीएम शरीफ म्हणाले...
8
एकटी पाहून घरात घुसला, बळजबरी करू लागला, तरुणीने कुऱ्हाड उचलली आणि...
9
KFC आणि Pizza Hut च्या पॅरेंट कंपन्यांचं होणार मेगा मर्जर; McDonald’s आणि Domino’s चं टेन्शन वाढणार
10
मुंबईत मनसेला खिंडार, एकाचवेळी ११ पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; भाजपात प्रवेश, कारण काय?
11
NPS मध्ये ऐतिहासिक सुधारणा: बँका स्थापन करू शकतील पेन्शन फंड, शुल्क आणि पैसे काढण्याचे नियमही बदलले
12
नाशिकमध्ये अर्ज मागे घेताना भाजपाच्या दोन उमेदवारांमध्ये हाणामारी, निवडणूक कार्यालयासमोरच भिडले
13
'तुम्ही दहशत पसरवली, तर भारत गप्प बसणार नाही', जयशंकर यांचा पाकिस्तानवर निशाणा
14
इराणमध्ये सत्ता उलथवून टाकण्याचा प्रयत्न, १०० बंदुका जप्त; खामेनींच्या सैन्याने सादर केले पुरावे
15
दशकभराच्या प्रवासाचा अखेर! टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार; चाहत्यांना मोठा धक्का
16
Gold Silver Price Today: २०२६ मध्येही सोन्या-चांदीची चमक कायम; चांदी ५६५६ रुपयांनी महागली, सोन्यातही जोरदार तेजी
17
'पाकिस्तानला उखडून टाका, आम्ही भारताबरोबर'; 'पाक'मधून कोणत्या नेत्याने लिहिले परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना ओपन लेटर?
18
Health Tips: तरुणांमध्ये कॅन्सर वाढण्याची ५ धक्कादायक कारणं; डॉक्टरांनी सांगितले तातडीचे उपाय
19
"ज्यांच्यामुळे श्वास गुदमरत होता, ते आता च्यवनप्राश देताहेत का?" आशिष शेलारांचा राज ठाकरेंना सवाल
20
भाजपा नगरसेवकाच्या मुलाची गुंडगिरी; पोलिसाला मारली कानाखाली, संतप्त जमावाने दिला चोप
Daily Top 2Weekly Top 5

लोकसहभाग आणि सरकारच्या समन्वयातून गड-किल्ल्यांचे संवर्धन -श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:44 IST

दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला. एका कार्यक्रमासाठी ते चाळीसगावी आले असता त्यांच्याशी बातचीत झाली. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे उपस्थित होते.प्रश्न : किल्ले संवर्धनाचे काम कसे सुरू झाले?उत्तर : खरं म्हणजे आपले किल्ल्यांबद्दलचे ज्ञान म्हणजे माहीत असलेल्या किल्ल्यांवर जाणे. अर्थात अशा सर्वपरिचित किल्ल्यांची संख्याही फारच कमी आहे. किल्ल्यांचा परिचय करुन देणारे लिखित साहित्यही उपलब्ध नाही. प्रसिद्ध असणाऱ्या गड-किल्ल्यांची दुरावस्था असताना प्रकाशझोतात नसणाºया इतर किल्ल्यांची काय अवस्था असेल? हा प्रश्न म्हणजे आमच्या कामाची सुरुवात आहे. यातूनच पुढे गड-किल्ले शोध मोहीम सुरू केली.प्रश्न : किती गड-किल्ले शोधण्यात यश आले?उत्तर : राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. १५ वर्षांपूर्वी २००४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. एकूण ४०० किल्ल्यांवर आम्हाला पोहचता आले. यासाठी शिवरथ यात्रा काढली. यामुळे बहुतांशी गड-किल्ले पहिल्यांदा समोर आले. दुरवस्था आणि अनास्था यामुळे हे दुर्ग वैभव दुर्लक्षित होत असल्याचे शल्य वेदनादायी होते. मी स्वत: देशभरातील १६६३ किल्ले पाहिले आहेत.प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात येणाºया अडचणी कोणत्या?उत्तर : राज्यातील फक्त ७८ किल्ल्यांना सरकारच्या संरक्षणाचे कवच आहे. उर्वरित ३२२ किल्ले आजही असंरक्षित आहेत. ७८ पैकी ४६ राज्य तर ३२ किल्ले केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. बहुतांशी गड-किल्ल्यांच्या जमिनी स्थानिक गावकºयांच्या नावे आहेत. सातबाºयावर ही नावे आहे. तर किल्ल्यांच्या पायाथ्याशी असणाºया जमिनीचे वाद वनविभाग व राज्य सरकार असे जटील आहे. त्यामुळेच किल्ल्यांच्या संवर्धनात अडचणी येतात. पावसाळी अधिवेशनात गड-किल्ले दुरुस्ती व संवर्धनाचा शासन निर्णय झाल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. वनविभाग आणि शासन यांनी समन्वय ठेवून गड- किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी पुढे यावे, अशी आमची मागणी आहे.प्रश्न : प्रतिष्ठानचे ठळक कार्य काय ?उत्तर : ३० मार्च २०१६ मध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. या विक्रमाची लिमका वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. १४ मे १६५७ ही संभाजी महाराजांची जन्मतारीख पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदवली. इयत्ता सातवीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गडांवर प्रवेशव्दार उभारले. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रव्धज फडकवला. पद्मदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव