शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
2
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
3
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
4
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
5
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
6
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
7
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
8
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
9
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
10
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
11
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
12
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
13
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
14
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
15
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
16
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
17
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
18
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
19
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
20
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!

लोकसहभाग आणि सरकारच्या समन्वयातून गड-किल्ल्यांचे संवर्धन -श्रमिक गोजमगुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:44 IST

दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला.

जिजाबराव वाघ ।चाळीसगाव, जि.जळगाव : दुर्ग संवर्धन म्हणजे नुसती डागडुजी नव्हे. आमच्या चळवळीची सुरुवात राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत, हे शोधण्यापासून सुरू झाली. विशेष म्हणजे दुर्ग जतन व संवर्धन हा प्रवास सोशल माध्यमातून सुरू झाला. मोबाइलच्या माध्यमातून जोडलेल्या चळवळीची ही साखळी आहे. महाराष्ट्रभर पाच हजार दुर्गसेवक जोडले गेले आहे. सह्याद्री प्रतिष्ठानच्या किल्ले संवर्धन अभियानाचा असा प्रवास अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना उलगडला. एका कार्यक्रमासाठी ते चाळीसगावी आले असता त्यांच्याशी बातचीत झाली. यावेळी प्रतिष्ठानचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दिलीप घोरपडे उपस्थित होते.प्रश्न : किल्ले संवर्धनाचे काम कसे सुरू झाले?उत्तर : खरं म्हणजे आपले किल्ल्यांबद्दलचे ज्ञान म्हणजे माहीत असलेल्या किल्ल्यांवर जाणे. अर्थात अशा सर्वपरिचित किल्ल्यांची संख्याही फारच कमी आहे. किल्ल्यांचा परिचय करुन देणारे लिखित साहित्यही उपलब्ध नाही. प्रसिद्ध असणाऱ्या गड-किल्ल्यांची दुरावस्था असताना प्रकाशझोतात नसणाºया इतर किल्ल्यांची काय अवस्था असेल? हा प्रश्न म्हणजे आमच्या कामाची सुरुवात आहे. यातूनच पुढे गड-किल्ले शोध मोहीम सुरू केली.प्रश्न : किती गड-किल्ले शोधण्यात यश आले?उत्तर : राज्यभरात एकूण किती किल्ले आहेत. हा वादाचा मुद्दा होऊ शकतो. १५ वर्षांपूर्वी २००४ मध्ये प्रतिष्ठानतर्फे दुर्ग संवर्धनाचे काम सुरू केले. एकूण ४०० किल्ल्यांवर आम्हाला पोहचता आले. यासाठी शिवरथ यात्रा काढली. यामुळे बहुतांशी गड-किल्ले पहिल्यांदा समोर आले. दुरवस्था आणि अनास्था यामुळे हे दुर्ग वैभव दुर्लक्षित होत असल्याचे शल्य वेदनादायी होते. मी स्वत: देशभरातील १६६३ किल्ले पाहिले आहेत.प्रश्न : गड-किल्ले संवर्धनात येणाºया अडचणी कोणत्या?उत्तर : राज्यातील फक्त ७८ किल्ल्यांना सरकारच्या संरक्षणाचे कवच आहे. उर्वरित ३२२ किल्ले आजही असंरक्षित आहेत. ७८ पैकी ४६ राज्य तर ३२ किल्ले केंद्र सरकारच्या अधिपत्याखाली आहे. बहुतांशी गड-किल्ल्यांच्या जमिनी स्थानिक गावकºयांच्या नावे आहेत. सातबाºयावर ही नावे आहे. तर किल्ल्यांच्या पायाथ्याशी असणाºया जमिनीचे वाद वनविभाग व राज्य सरकार असे जटील आहे. त्यामुळेच किल्ल्यांच्या संवर्धनात अडचणी येतात. पावसाळी अधिवेशनात गड-किल्ले दुरुस्ती व संवर्धनाचा शासन निर्णय झाल्याने आता मार्ग मोकळा झाला आहे. वनविभाग आणि शासन यांनी समन्वय ठेवून गड- किल्ल्यांचे वैभव जपण्यासाठी पुढे यावे, अशी आमची मागणी आहे.प्रश्न : प्रतिष्ठानचे ठळक कार्य काय ?उत्तर : ३० मार्च २०१६ मध्ये एकाच दिवशी व एकाच वेळी ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज फडकवला. या विक्रमाची लिमका वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली आहे. १४ मे १६५७ ही संभाजी महाराजांची जन्मतारीख पाठ्यपुस्तक मंडळाकडे नोंदवली. इयत्ता सातवीच्या पुस्तकात त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. काही गडांवर प्रवेशव्दार उभारले. जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरुपी राष्ट्रव्धज फडकवला. पद्मदुर्ग किल्ल्यावर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :interviewमुलाखतChalisgaonचाळीसगाव