शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

‘आशादीप’प्रकरणी चौकशी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:30 AM

जळगाव : जळगावातील आशादीप महिला वसतिगृहात गैरप्रकार घडल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने बुधवारी जाबजबाब घेतले असून त्यात आक्षेपार्ह काही आढळले ...

जळगाव : जळगावातील आशादीप महिला वसतिगृहात गैरप्रकार घडल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने बुधवारी जाबजबाब घेतले असून त्यात आक्षेपार्ह काही आढळले नाही. मात्र या प्रकरणी सखोल चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला पाठविला असून राज्याने महिला व बालविकास विभागाकडूनही आठ दिवसात अहवाल मागविला आहे. तोदेखील तीन ते चार दिवसात सादर केला जाईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या विषयी सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तसेच या विषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.

या प्रकरणी जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची नियुक्ती केली असून यामध्ये महिला पोलीस उप निरीक्षक, स्त्री रोग तज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागातील समुपदेशक यांचा समावेश आहे.

प्राथमिक अहवाल सादर

या समितीने बुधवारी वसतिगृहात जाऊन तेथील मुली, आरोप करणारी महिला यांचे जबाब घेतले. या सोबतच वसतिगृहाच्या आजूबाजूच्या रहिवाशांचेही जबाब घेतले असून या जबाबामध्ये काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. असे असले तरी या प्रकरणी सखोल चौकशी सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

दोन जणींनी केली अन्यत्र हलविण्याची मागणी

आशादीप वसतिगृहात चौकशीदरम्यान तेथे असलेल्या गरोदर महिलांना काही त्रास होऊ नये, म्हणून अशा तीन महिलांना महिला निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी इतरही दोन मुलींना आम्हाला इतरत्र हलवा, अशी मागणी केली असताना त्यांनाही निरीक्षण गृहात हलविण्यात आले आहे. या पाच जणींना निरीक्षण गृहात हलविल्यानंतर वसतिगृहात सद्या १२ मुली आहेत.

अधिवेशनात पडसाद, राज्याने मागविला अहवाल

या प्रकरणाचे राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले. विरोधकांनी या विषयी गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांनीही समितीची माहिती दिली. तसेच महिला व बालविकास विभागाने आठ दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले असून हा अहवाल तीन ते चार दिवसात सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.