शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

‘आशादीप’प्रकरणी चौकशी सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:30 IST

जळगाव : जळगावातील आशादीप महिला वसतिगृहात गैरप्रकार घडल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने बुधवारी जाबजबाब घेतले असून त्यात आक्षेपार्ह काही आढळले ...

जळगाव : जळगावातील आशादीप महिला वसतिगृहात गैरप्रकार घडल्याप्रकरणी नियुक्त केलेल्या समितीने बुधवारी जाबजबाब घेतले असून त्यात आक्षेपार्ह काही आढळले नाही. मात्र या प्रकरणी सखोल चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल राज्य सरकारला पाठविला असून राज्याने महिला व बालविकास विभागाकडूनही आठ दिवसात अहवाल मागविला आहे. तोदेखील तीन ते चार दिवसात सादर केला जाईल, असेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

जळगाव येथील गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या विषयी सामाजिक संघटनांनी मंगळवारी या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती तसेच या विषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते.

या प्रकरणी जिल्हाधिकारी राऊत यांनी प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समितीची नियुक्ती केली असून यामध्ये महिला पोलीस उप निरीक्षक, स्त्री रोग तज्ज्ञ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मानसोपचार विभागातील समुपदेशक यांचा समावेश आहे.

प्राथमिक अहवाल सादर

या समितीने बुधवारी वसतिगृहात जाऊन तेथील मुली, आरोप करणारी महिला यांचे जबाब घेतले. या सोबतच वसतिगृहाच्या आजूबाजूच्या रहिवाशांचेही जबाब घेतले असून या जबाबामध्ये काही आक्षेपार्ह आढळले नसल्याने समितीने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. असे असले तरी या प्रकरणी सखोल चौकशी सुरूच ठेवणार असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

दोन जणींनी केली अन्यत्र हलविण्याची मागणी

आशादीप वसतिगृहात चौकशीदरम्यान तेथे असलेल्या गरोदर महिलांना काही त्रास होऊ नये, म्हणून अशा तीन महिलांना महिला निरीक्षणगृहात हलविण्यात आल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी इतरही दोन मुलींना आम्हाला इतरत्र हलवा, अशी मागणी केली असताना त्यांनाही निरीक्षण गृहात हलविण्यात आले आहे. या पाच जणींना निरीक्षण गृहात हलविल्यानंतर वसतिगृहात सद्या १२ मुली आहेत.

अधिवेशनात पडसाद, राज्याने मागविला अहवाल

या प्रकरणाचे राज्य मंत्रिमंडळाच्या अधिवेशनात पडसाद उमटले. विरोधकांनी या विषयी गंभीर आरोप केल्यानंतर गृहमंत्र्यांनीही समितीची माहिती दिली. तसेच महिला व बालविकास विभागाने आठ दिवसात अहवाल सादर करावा, असे आदेश राज्य शासनाने दिले असून हा अहवाल तीन ते चार दिवसात सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी राऊत यांनी दिली.