शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

जळगाव जिल्ह्यात ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजने’च्या नावाखाली अनेकांची फसवणूक, खासदार रक्षा खडसे यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 13:01 IST

आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन

ठळक मुद्दे10 ते 15 हजार अर्ज भरलेएजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27-  बेटी बचाओ, बेटी पढाओ उपक्रमांतर्गत ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ राबविली जात असून त्यात मुलीच्या विवाहप्रसंगी दोन लाख रुपये दिले जाणार असल्याचे सांगून जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात अर्ज भरले जात आहे. यामाध्यमातून नागरिकांची फसवणूक सुरू असून अशी कोणतीच योजना नसल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. यास जनतेने बळी न पडण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या संदर्भात रक्षा खडसे यांनी पत्रपरिषद घेऊन ही माहिती दिली. या वेळी त्या म्हणाल्या की, ‘प्रधानमंत्री बेटी बचाओ योजना’ असल्याची अफवा पसरवून त्याचे छापील अजर्ही तयार करण्यात आले आहे. हे अर्ज ङोरॉक्सच्या दुकानावरून बिनबोभाटपणे विक्री होत असून सामान्य नागरिक त्यास बळी पडत आहे. 

एजंटांमार्फत सर्वसामान्यांची लूटङोरॉक्सच्या दुकानावर दोन रुपयांना एक अर्ज विक्री होत असून हे अर्ज भरणे व ते पाठविण्यासाठी बहुतांश ठिकाणी एजंटांमार्फत 200 ते 500 रुपये उकळले जात आहे. या शिवाय बरेच नागरिक स्वत: अर्ज भरुन भारत सरकार, महिला आणि बालकल्याण विकास मंत्रालयाच्या पत्त्यावर टपालाने पाठवित आहे. 

10 ते 15 हजार अर्ज भरलेरावेर, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यात हा प्रकार जास्त असून जिल्ह्यातही तो सुरू असण्याची शक्यता खासदार खडसे यांनी वर्तविली. यामध्ये 10 ते 15 हजार अर्ज भरले गेले असून एका अर्जासाठी 32 ते 35 रुपये खर्च येत असल्याचेही त्यांनी सांगितले. या शिवाय एजंट वेगळी रक्कम घेतात. त्यामुळे नागरिकांची फसगत करून केवळ लूट केली जात असल्याचे खडसे यांचे म्हणणे आहे. 

सरपंचांची सही आवश्यक6 ते 32 वयोगटातील मुलींसाठी ही योजना असून हा अर्ज भरल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी दोन लाख रुपये मिळणार असल्याची अफवा पसरविण्यात आली आहे. या अर्जावर मुलीचे छायाचित्र लावण्यासह कुटुंबाची माहिती, बँक खाते क्रमांक, आयएफएससी कोड अशी सविस्तर माहिती असलेले बनावट अर्ज तयार करण्यात आल्याचे खासदार खडसे म्हणाल्या. विशेष म्हणजे यावर गावातील सरपंचांची सहीदेखील आवश्यक असून सरपंचांद्वारेही गावातील मुलींचे काम असल्याने सह्या दिल्या जात असल्याचे चित्र आहे. 

बळी पडू नकाकेंद्राची अशी कोणतीही योजना नसून नागरिकांनी यास बळी पडू नये, असे सांगत खासदार खडसे यांनी बाबत अधिका:यांकडूनही माहिती घेतली. मात्र योजनाच नसल्याचेसांगण्यातआले.