शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

प्लॅस्टिक बंदीचा परिणाम : खाद्य पदार्थांच्या वस्तूंचे भाव वधारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:48 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खाद्य पदार्थांच्याही किंमतीवर होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्याने वाढण्याचे संकेत व्यापारी वर्गातून दिले जात ...

ठळक मुद्देबाजारात ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकमध्येजळगावात सहा उद्योग

विजयकुमार सैतवालजळगाव : ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वापरण्यास बंदी घालण्यात आल्याने खाद्य पदार्थांच्या आवरणासाठीही (पॅकेजिंग मटेरिअल) वापरण्यात येणाऱ्या प्लॅस्टिकची जाडी आता वाढवावी लागणार असल्याने आवरणाचे भाव वाढून त्याचा थेट परिणाम खाद्य पदार्थांच्याही किंमतीवर होणार आहे. त्यामुळे या पदार्थांचे भाव ५ ते १० टक्क्याने वाढण्याचे संकेत व्यापारी वर्गातून दिले जात आहे.मार्च महिन्यात प्लॅस्टिक बंदीबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढल्यानंतर २३ जून पासून राज्यात बंदी लागू करण्यात आली. यामध्ये खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी, असे निर्देश आहे. त्यामुळे आता या आवरणाची जाडी वाढवावी लागणार आहे.जळगावात सहा उद्योगखाद्य पदार्थांचे आवरण (पॅकेजिंग मटेरिअल) तयार करणारे जळगावात सहा उद्योग आहेत. या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचेही प्लॅस्टिक तयार केले जात होते. मात्र आता बंदीमुळे या ठिकाणी केवळ ५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडीचेच प्लॅस्टिक तयार करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे साहजिकच निर्मिती खर्च वाढून आता त्याची किंमतही वाढणार आहे.बाजारात ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकमध्येप्लॅस्टिकवर सरकारने बंदी घातली असली तरी बाजारपेठेचा विचार केला तर जवळपास ९० टक्के वस्तू प्लॅस्टिकची आवरणे असलेलीच आहे. यामध्ये बेकरीतील वस्तू, फास्ट फूड, पॉपकॉर्न, चहा पावडर असे घरातील बहुतांश वस्तू प्लॅस्टिकमध्येच असते. त्यामुळे बंदी घालताना आवरणासाठी वापरात येणाºया प्लॅस्टिकचे दर कमी होणे गरजेचे आहे. अन्यथा प्लॅस्टिक निर्मितीचा खर्च वाढून त्याचा थेट बोझा ग्राहकांवरच येण्याची चिन्हे आहे.खाद्य पदार्थ महागणारप्लॅस्टिकची जाडी वाढल्याने त्याचा वाढीव खर्च विक्रेतेही सहन करणार नाही व ते थेट खाद्य पदार्थांच्या किंमती वाढवतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे पाच-दहा रुपयांना मिळणारे पॉपकॉर्नचे पाकीटही आता सात ते १४ रुपयांना मिळेल, असा अंदाज आतापासूनच वर्तविला जात आहे. अशाच प्रकारे बेकरीतील वस्तू, चहा पावडर, फास्ट फूड व इतरही वस्तूंचे दर वाढणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.खाद्य पदार्थांच्या पॅकिंगसाठी वापरण्यात येणाºया आवरणाची जाडीही आता वाढवावी लागणार आहे. त्यामुळे त्याची किंमत वाढून खाद्य पदार्थांचेही दर ५ ते १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.-किरण राणे, कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र प्लॅस्टिक असोसिएशन

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव