शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय कंटेनर महामंडळाकडून कंटेनर स्वीकारण्यास तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 12:41 IST

रेल्वेच्या जागेऐवजी पर्यायी जागांचा शोध सुरू ?

जळगाव :  भारतीय कंटेनर महामंडळाकडून भुसावळ येथील आगार बंद करण्यासंदर्भात हालचाली सुरू झाल्याने विषयी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कंटेनगर महामंडळाने सध्या उद्योजकांकडून कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे. त्यानुसार शनिवारी काही कंटेनरदेखील भुसावळ येथे पाठविण्यात आले. दरम्यान, रेल्वेने जागेची भाडेवाढ केली असली तरी महामंडळाकडून आता पर्यायी जागांचा शोध सुरू झाला असल्याचे वृत्त आहे.जिल्ह्यातील आयात-निर्यातीसाठी सोयीचे असलेले भुसावळ येथील भारतीय कंटेनर महामंडळाचे आगार बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला व तशा नोटीस उद्योजक व संबंधितांना दिल्या होत्या. या संदर्भात ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले. त्यानंतर खासदार रक्षा खडसे, उन्मेष पाटील यांनी महामंडळाच्या अधिकाºयांशी चर्चा केली होती.या सोबतच ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर महामंडळाने सध्या माल निर्यातीसाठीचे कंटेनर स्वीकारण्याची तयारी दर्शविली आहे.  त्यानुसार शनिवारी मालदेखील रवाना झाला.खान्देशातील उद्योग-व्यावसायिकांकडून होणाºया व्यवहारांमुळे या आगारात दरवर्षी आयातीचे एक हजार कोटी तर निर्यातीचे ७०० कोटी रुपये अशी एकूण १७०० कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मात्र आगार बंद करण्याच्या निर्णयाने महामंडळ या उलाढालीवर पाणी सोडण्याच्या तयारीत आहे.  शिवाय यामुळे उद्योजक-व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. हे आगार बंद झाल्यास माल पोहचविण्यासाठी व आणण्यासाठी थेट मुंबई येथे जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. यामुळे आर्थिक बोझा वाढणार असून त्यामुळे किंमतीवरही परिणाम होऊ शकतो. मात्र आता ‘लोकमत’च्या वृत्तानंतर कंटेनर घेण्याची तयारी महामंडळाने दाखविल्याने उद्योजक, व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे.  महामंडळाकडून पर्यायी जागेचा शोधमहामंडळाच्या भुसावळ येथील जागेची रेल्वेने भाडेवाढ केल्याने हे आगार बंद करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. मात्र ‘लोकमत’च्या वृत्तानंतर महामंडळाकडून पर्यायी जागेचा शोध सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. त्यानुसार हे आगार जिल्ह्यात कायम राहणार असल्याचे संकेत आहेत.कामगार, शेतकºयांनाही होणार आधारभारतीय कंटेनर महामंडळाच्या भुसावळ येथील आगारात वेगवेगळ््या कामांसाठी जवळपास १०० कामगार असून कंपन्यांमधील मजूर यांनाही याचा फटका बसणार आहे. सोबतच निर्यात थांबल्यास शेती मालही पडून राहून शेतकºयांना फटका बसू शकतो. मात्र आता निर्णय बदलल्यास त्याचा कामगार, शेतकºयांनाही आधार होणार आहे. तसेच ३० ते ३५ देशात होणारी निर्यात कायम राहून विदेशी चलन मिळण्यास मोठा हातभार मिळेल.  

टॅग्स :Jalgaonजळगाव