शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

संत श्री गुलाम महाराज यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरातील लेख.

गुलाम महाराजांच्या आप मंडळाचा ध्वज लाल रंगाचा, चौकोनी आकाराचा रूमाल होता. लाल हा क्रांतीचा रंग होय. आप मंडळाची सामुदायिक आरती आत्मसन्मानाची प्रतीकच होती. श्री शंकराव देव यांनी या आरती कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला होता. काही पुढारी, वरिष्ठ वर्ग यांच्यासमवेत प्रतापपूरचे राणे चिप्टन यांनी आरती चळवळीला विरोध केला होता. गुलाम महाराजांचा उपदेश साधा, सोपा आणि सुटसुटीत आहे. सूत्रबद्ध आहे. त्यांना कधी व्याख्यान वा प्रवचन देण्याची आवश्यकता भासली नाही. महाराजांचे वैचारिक अधिष्ठान पुढील 10 सूत्रांमध्ये गुंफले आहे. 1) शौचास जाताना शुद्धीसाठी पाण्याचा उपयोग करा. 2) रोज न चुकता स्नान करा. 3) कपाळी गंध वा कुंकू लावा. 4) मद्यपान करू नका. 5) भांग आदी मादक द्रव्यापासून लांब रहा. 6) शाकाहाराचे पालन करा. 7) सत्यवादी बना. 8) लबाडीचा व्यवहार करू नका. 9) एकमेकांना फसवू नका. 10) ‘आप’ची म्हणजे परस्परांची आरती करा. या उपदेशावर जो गांधी प्रभाव आहे. सामाजिक समरसता, आर्थिक ऊध्र्वीकरण, आंतर्बाह्य शुचिता आणि आध्यात्मिक जागरणाची चतु:सूत्री यात अंतभरूत आहे. यात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सूत्रे ग्रथित आहेत. माघ शुद्ध एकादशीला गुलाम महाराजांनी आप मंडळाचा पहिला सामुदायिक आरती समारंभ संपन्न केला. हा समारंभ दर सोमवारी व्हायचा. हजारो स्त्री-पुरुष या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. उजळत्या मुखमंडलासोबत झळाळत्या दीपज्योतीने अवनी- अंबर थरारून जाई. अशा आठवणी सांगणारे आजही आहेत. महाराजांनी स्वत:ची मात्र कधीही आरती करवून घेतली नाही. आरतीच्या कार्यक्रमासाठी तेल वातीचीच काय ती गरज वाटायची. याशिवाय यासोबत नारळ, गंध, फु ले, अगरबत्ती, कापूर यासारखे कोणतेही पूजाद्रव्य असू नये यावर महाराजांचा कटाक्ष होता. मोरवड गावचे नाव बदलून त्यांनीच रंजनपूर असे केले. आरती समारंभ आटोपल्यावर जनलोक प्रचारार्थ आसपासच्या गावांना जात असत. विशेष निमंत्रणाशिवाय कुणाच्या गावी वा घरी जायचे नाही, असे ठरले होते. या सामंजस्यपूर्ण योजनेमुळे जवळपासचेच नव्हे तर लांबलांबून लोक आरतीसाठी रंजनपूरला येत असत. रंजनपूर आता प्रतिपंढरपूर बनले होते. त्या काळी लोक गात असत, ‘‘पाऊस पडला चिखल झाला, कशाला जाता इतक्या दूर, हेच आपले पंढरपूर.’’ रंजनपूरला यात्रा स्थानाचे महत्त्व आले. सोमवारी लोकांचा कडक उपवास असायचा. दिवे लागणीची वेळ ही आरतीची वेळ असायची. हजारो दांपत्यांनी केलेली सामुदायिक आरती विशिष्ट असायची. जनताजनार्दनाच्या या मंगलमय आरतीनंतर प}ींनी आपापल्या पतीची आरती करायची पद्धत होती. हा सामुदायिक सोहळा कमालीच्या गंभीरपणे पार पडायचा. गुलाम महाराजांसंबंधी श्रद्धा व्यक्त करणारे भिलोरी भाषेतील हे एक पद बघा.. गुला भगवान गुला भगवान । भेट देजे देव अमुने । एकि हाकिडी, वाकडी वेल्योपे । बोलि देजे देव अमुने ।। रात दीही तो जे भगवान । नाव लिऊँ आमु पोयरे । जिहीं जाऊँ तिही भगवान । तोजे नाव लिऊँ आमून ।। चला आपू होगे मिलिगे । देवाला मिला जाते रा । उबे वाटे तो जे भगवान । भजन केयते आउरा ।। गुला भगवान.. थोडक्यात, या पदाचा अर्थ असा सांगता येईल की, हे गुला भगवान, तू आम्हाला भेट दे. आम्ही तुझी लेकरे तुङो रात्रंदिवस नामस्मरण करत आहोत. आम्ही जिथे कुठे म्हणून जाऊ तिथे तुङोच नामस्मरण करू, कारण की तूच आमचा भगवान आहेस. चला आपण सारे मिळून देवाच्या भेटीसाठी जाऊ या. मार्गात देवाचे भजन करू या. गुलाम महाराजांनी गांधी चळवळीशी नाते सांगत सातपुडय़ाच्या द:याखो:यांमधून क्रांतिनाद घुमवला. त्याच्या काही खुणा आजही परिसरात वाचता येतात. महाराजांनी खानदेशच्या भूमीवर भक्तीचे एक मनोरम स्वप्न फुलवले. आत्मप्रत्यय आणि आत्मसन्मान वाढवण्याकामी महाराजांनी केलेल्या या आध्यात्मिक प्रय}ांची नोंद जागरणाच्या वाटेचा अभ्यास करणा:यांना महत्त्वाची ठरावी. 19 जुलै 1938 रोजी महाराजांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.