शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

संत श्री गुलाम महाराज यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरातील लेख.

गुलाम महाराजांच्या आप मंडळाचा ध्वज लाल रंगाचा, चौकोनी आकाराचा रूमाल होता. लाल हा क्रांतीचा रंग होय. आप मंडळाची सामुदायिक आरती आत्मसन्मानाची प्रतीकच होती. श्री शंकराव देव यांनी या आरती कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला होता. काही पुढारी, वरिष्ठ वर्ग यांच्यासमवेत प्रतापपूरचे राणे चिप्टन यांनी आरती चळवळीला विरोध केला होता. गुलाम महाराजांचा उपदेश साधा, सोपा आणि सुटसुटीत आहे. सूत्रबद्ध आहे. त्यांना कधी व्याख्यान वा प्रवचन देण्याची आवश्यकता भासली नाही. महाराजांचे वैचारिक अधिष्ठान पुढील 10 सूत्रांमध्ये गुंफले आहे. 1) शौचास जाताना शुद्धीसाठी पाण्याचा उपयोग करा. 2) रोज न चुकता स्नान करा. 3) कपाळी गंध वा कुंकू लावा. 4) मद्यपान करू नका. 5) भांग आदी मादक द्रव्यापासून लांब रहा. 6) शाकाहाराचे पालन करा. 7) सत्यवादी बना. 8) लबाडीचा व्यवहार करू नका. 9) एकमेकांना फसवू नका. 10) ‘आप’ची म्हणजे परस्परांची आरती करा. या उपदेशावर जो गांधी प्रभाव आहे. सामाजिक समरसता, आर्थिक ऊध्र्वीकरण, आंतर्बाह्य शुचिता आणि आध्यात्मिक जागरणाची चतु:सूत्री यात अंतभरूत आहे. यात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सूत्रे ग्रथित आहेत. माघ शुद्ध एकादशीला गुलाम महाराजांनी आप मंडळाचा पहिला सामुदायिक आरती समारंभ संपन्न केला. हा समारंभ दर सोमवारी व्हायचा. हजारो स्त्री-पुरुष या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. उजळत्या मुखमंडलासोबत झळाळत्या दीपज्योतीने अवनी- अंबर थरारून जाई. अशा आठवणी सांगणारे आजही आहेत. महाराजांनी स्वत:ची मात्र कधीही आरती करवून घेतली नाही. आरतीच्या कार्यक्रमासाठी तेल वातीचीच काय ती गरज वाटायची. याशिवाय यासोबत नारळ, गंध, फु ले, अगरबत्ती, कापूर यासारखे कोणतेही पूजाद्रव्य असू नये यावर महाराजांचा कटाक्ष होता. मोरवड गावचे नाव बदलून त्यांनीच रंजनपूर असे केले. आरती समारंभ आटोपल्यावर जनलोक प्रचारार्थ आसपासच्या गावांना जात असत. विशेष निमंत्रणाशिवाय कुणाच्या गावी वा घरी जायचे नाही, असे ठरले होते. या सामंजस्यपूर्ण योजनेमुळे जवळपासचेच नव्हे तर लांबलांबून लोक आरतीसाठी रंजनपूरला येत असत. रंजनपूर आता प्रतिपंढरपूर बनले होते. त्या काळी लोक गात असत, ‘‘पाऊस पडला चिखल झाला, कशाला जाता इतक्या दूर, हेच आपले पंढरपूर.’’ रंजनपूरला यात्रा स्थानाचे महत्त्व आले. सोमवारी लोकांचा कडक उपवास असायचा. दिवे लागणीची वेळ ही आरतीची वेळ असायची. हजारो दांपत्यांनी केलेली सामुदायिक आरती विशिष्ट असायची. जनताजनार्दनाच्या या मंगलमय आरतीनंतर प}ींनी आपापल्या पतीची आरती करायची पद्धत होती. हा सामुदायिक सोहळा कमालीच्या गंभीरपणे पार पडायचा. गुलाम महाराजांसंबंधी श्रद्धा व्यक्त करणारे भिलोरी भाषेतील हे एक पद बघा.. गुला भगवान गुला भगवान । भेट देजे देव अमुने । एकि हाकिडी, वाकडी वेल्योपे । बोलि देजे देव अमुने ।। रात दीही तो जे भगवान । नाव लिऊँ आमु पोयरे । जिहीं जाऊँ तिही भगवान । तोजे नाव लिऊँ आमून ।। चला आपू होगे मिलिगे । देवाला मिला जाते रा । उबे वाटे तो जे भगवान । भजन केयते आउरा ।। गुला भगवान.. थोडक्यात, या पदाचा अर्थ असा सांगता येईल की, हे गुला भगवान, तू आम्हाला भेट दे. आम्ही तुझी लेकरे तुङो रात्रंदिवस नामस्मरण करत आहोत. आम्ही जिथे कुठे म्हणून जाऊ तिथे तुङोच नामस्मरण करू, कारण की तूच आमचा भगवान आहेस. चला आपण सारे मिळून देवाच्या भेटीसाठी जाऊ या. मार्गात देवाचे भजन करू या. गुलाम महाराजांनी गांधी चळवळीशी नाते सांगत सातपुडय़ाच्या द:याखो:यांमधून क्रांतिनाद घुमवला. त्याच्या काही खुणा आजही परिसरात वाचता येतात. महाराजांनी खानदेशच्या भूमीवर भक्तीचे एक मनोरम स्वप्न फुलवले. आत्मप्रत्यय आणि आत्मसन्मान वाढवण्याकामी महाराजांनी केलेल्या या आध्यात्मिक प्रय}ांची नोंद जागरणाच्या वाटेचा अभ्यास करणा:यांना महत्त्वाची ठरावी. 19 जुलै 1938 रोजी महाराजांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.