शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

संत श्री गुलाम महाराज यांचा उपदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 01:08 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांचा ‘खान्देशातील संतांची मांदियाळी’ या सदरातील लेख.

गुलाम महाराजांच्या आप मंडळाचा ध्वज लाल रंगाचा, चौकोनी आकाराचा रूमाल होता. लाल हा क्रांतीचा रंग होय. आप मंडळाची सामुदायिक आरती आत्मसन्मानाची प्रतीकच होती. श्री शंकराव देव यांनी या आरती कार्यक्रमात सहभाग नोंदवलेला होता. काही पुढारी, वरिष्ठ वर्ग यांच्यासमवेत प्रतापपूरचे राणे चिप्टन यांनी आरती चळवळीला विरोध केला होता. गुलाम महाराजांचा उपदेश साधा, सोपा आणि सुटसुटीत आहे. सूत्रबद्ध आहे. त्यांना कधी व्याख्यान वा प्रवचन देण्याची आवश्यकता भासली नाही. महाराजांचे वैचारिक अधिष्ठान पुढील 10 सूत्रांमध्ये गुंफले आहे. 1) शौचास जाताना शुद्धीसाठी पाण्याचा उपयोग करा. 2) रोज न चुकता स्नान करा. 3) कपाळी गंध वा कुंकू लावा. 4) मद्यपान करू नका. 5) भांग आदी मादक द्रव्यापासून लांब रहा. 6) शाकाहाराचे पालन करा. 7) सत्यवादी बना. 8) लबाडीचा व्यवहार करू नका. 9) एकमेकांना फसवू नका. 10) ‘आप’ची म्हणजे परस्परांची आरती करा. या उपदेशावर जो गांधी प्रभाव आहे. सामाजिक समरसता, आर्थिक ऊध्र्वीकरण, आंतर्बाह्य शुचिता आणि आध्यात्मिक जागरणाची चतु:सूत्री यात अंतभरूत आहे. यात आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक सूत्रे ग्रथित आहेत. माघ शुद्ध एकादशीला गुलाम महाराजांनी आप मंडळाचा पहिला सामुदायिक आरती समारंभ संपन्न केला. हा समारंभ दर सोमवारी व्हायचा. हजारो स्त्री-पुरुष या कार्यक्रमाला हजेरी लावत असत. उजळत्या मुखमंडलासोबत झळाळत्या दीपज्योतीने अवनी- अंबर थरारून जाई. अशा आठवणी सांगणारे आजही आहेत. महाराजांनी स्वत:ची मात्र कधीही आरती करवून घेतली नाही. आरतीच्या कार्यक्रमासाठी तेल वातीचीच काय ती गरज वाटायची. याशिवाय यासोबत नारळ, गंध, फु ले, अगरबत्ती, कापूर यासारखे कोणतेही पूजाद्रव्य असू नये यावर महाराजांचा कटाक्ष होता. मोरवड गावचे नाव बदलून त्यांनीच रंजनपूर असे केले. आरती समारंभ आटोपल्यावर जनलोक प्रचारार्थ आसपासच्या गावांना जात असत. विशेष निमंत्रणाशिवाय कुणाच्या गावी वा घरी जायचे नाही, असे ठरले होते. या सामंजस्यपूर्ण योजनेमुळे जवळपासचेच नव्हे तर लांबलांबून लोक आरतीसाठी रंजनपूरला येत असत. रंजनपूर आता प्रतिपंढरपूर बनले होते. त्या काळी लोक गात असत, ‘‘पाऊस पडला चिखल झाला, कशाला जाता इतक्या दूर, हेच आपले पंढरपूर.’’ रंजनपूरला यात्रा स्थानाचे महत्त्व आले. सोमवारी लोकांचा कडक उपवास असायचा. दिवे लागणीची वेळ ही आरतीची वेळ असायची. हजारो दांपत्यांनी केलेली सामुदायिक आरती विशिष्ट असायची. जनताजनार्दनाच्या या मंगलमय आरतीनंतर प}ींनी आपापल्या पतीची आरती करायची पद्धत होती. हा सामुदायिक सोहळा कमालीच्या गंभीरपणे पार पडायचा. गुलाम महाराजांसंबंधी श्रद्धा व्यक्त करणारे भिलोरी भाषेतील हे एक पद बघा.. गुला भगवान गुला भगवान । भेट देजे देव अमुने । एकि हाकिडी, वाकडी वेल्योपे । बोलि देजे देव अमुने ।। रात दीही तो जे भगवान । नाव लिऊँ आमु पोयरे । जिहीं जाऊँ तिही भगवान । तोजे नाव लिऊँ आमून ।। चला आपू होगे मिलिगे । देवाला मिला जाते रा । उबे वाटे तो जे भगवान । भजन केयते आउरा ।। गुला भगवान.. थोडक्यात, या पदाचा अर्थ असा सांगता येईल की, हे गुला भगवान, तू आम्हाला भेट दे. आम्ही तुझी लेकरे तुङो रात्रंदिवस नामस्मरण करत आहोत. आम्ही जिथे कुठे म्हणून जाऊ तिथे तुङोच नामस्मरण करू, कारण की तूच आमचा भगवान आहेस. चला आपण सारे मिळून देवाच्या भेटीसाठी जाऊ या. मार्गात देवाचे भजन करू या. गुलाम महाराजांनी गांधी चळवळीशी नाते सांगत सातपुडय़ाच्या द:याखो:यांमधून क्रांतिनाद घुमवला. त्याच्या काही खुणा आजही परिसरात वाचता येतात. महाराजांनी खानदेशच्या भूमीवर भक्तीचे एक मनोरम स्वप्न फुलवले. आत्मप्रत्यय आणि आत्मसन्मान वाढवण्याकामी महाराजांनी केलेल्या या आध्यात्मिक प्रय}ांची नोंद जागरणाच्या वाटेचा अभ्यास करणा:यांना महत्त्वाची ठरावी. 19 जुलै 1938 रोजी महाराजांनी या नश्वर जगाचा निरोप घेतला.