शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
2
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
3
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
4
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
5
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
6
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
7
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
8
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
9
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
10
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
11
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
12
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
13
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
14
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...
15
Shahapur: डोंगरावरून उडणारा ड्रोन अचानक कोसळला अन् गावात उडाली खळबळ; तो ड्रोन कोणाचा?
16
Nagpur: संधी मिळताच प्रवाशांना लुटायचे, रेल्वे स्थानकांवर चोऱ्या करणारी टोळी अटकेत
17
Ganeshotsav 2025: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मूर्तिकारांसाठी बीएमसीची महत्त्वाची पोस्ट
18
"बॉलिवूडमध्ये मंदी आली आहे, छोट्या कलाकारांकडे तर...", कल्कि कोचलीनचा खुलासा
19
प्रीतीचा 'मोहरा' विमानातून उतरला जयपूरमध्ये अन् त्याचं लगेज पोहचलं बंगळुरुला; मग भाऊनं असा काढला राग
20
Train Accident: अमळनेरला मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले, सुरत-भुसावळ मार्गावरील वाहतूक ठप्प

पूर्वकर्म होळी सांडू.....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 21:39 IST

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात. दैंय दु:ख आम्हा न येती ...

वारकरी सांप्रदायातील संताच्या अभंगात होळी या सणाचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. संत तुकाराम महाराज सांगतात.दैंय दु:ख आम्हा न येती जवळी । दहन हे होळी होती दोष।।तुकोबा सांगतात - ‘मी होळीत माझ्यातले दोष जाळले. आणि दोष जाळण्याचा परिणाम असा झाला की, दारिद्र आणि दु:ख माझ्या जवळ सुद्धा येत नाही. दोष नाही तर दारिद्र नाही, आणि त्यामुळे दारिद्रांतून निर्माण होणारे दु:ख नाही.’वंदू चरणरज सेवू उष्टावळी । पूर्वकर्म होळी सांडू ।।अमुप हे गाठी बांधू भांडवल । अनाथा विठ्ठल आम्हा जोगा ।।तुकोबा या अभंगात सांगतात- आम्ही पांडुरंगाची चरणवंदना करून, त्यांचे उष्टे सेवन करू, त्यामुळे माझ्या पूर्व कर्माची होळी होईल.शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज सांगतात-देह चतुट्याची रचोनि होळी । ज्ञानाग्नी घालुनी समुळ जाळी ।।१।।अजुनि का उगलासी। बोंब पडो दे नामाची ।।२।।मांदियाळी मिळवा संतांची । तुम्हा साची सोडविण्या ।।३।।धावण्या धावती संत अंतरंग । संसार शिमगा सांग निरसती ।।४।।एका जनार्दनी मारली बोंब । जन वन स्वयंभ एक जाले ।।५।।स्थुल, सुक्ष्म, कारण व महाकारण हे चार देह आहेत. या चारही देहांची होळी रचून, त्याला सदगुरू कृपेने प्रगट होणारा ज्ञानाग्नी लावून, ती होळी समुळ जाळून टाकली पाहिजे, आपण सदगुरूंनी दिलेल्या नामाची, त्यांनी शिकविलेल्या युक्तीने मनापासून बोंब मारावी व या संसार चक्रातून सोडवणूक होण्यासाठी, संताच्या मांदीयाळीला शरण जावे व यथार्थपणे सोडवणूक होईल.शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, गुलाल किंवा अबीर शरीराच्या त्वचेला उत्तेजित करतं आणि आरोग्याला बळकट करतं, त्यात होळी हा सण अशा वेळेस येतो जेव्हा ऋतू बदलांमुळे लोकांमध्ये नैराश्य आणि उदासिनता जाणवते. उबदार हवामानामुळे शरीरात काही प्रमाणात थकवा आणि आळसपणा येतो. शरीराचा हाच थकवा आणि आळसपणा घालविण्यासाठी या हंगामात लोक फक्त गाणचं नव्हे तर बोलतानाही थोडे मोठ्यानेच बोलतात. त्यामुळे कळत-नकळत रोजच्या त्रासातून मनही हलके होते. या हंगामात ऐकू येणारे संगीत देखील जोरदारचं असतं. त्यामुळेच शरीरात नवीन उर्जा निर्माण होते. शुद्ध स्वरूपातील अबीर आणि गुलाल शरीरावर टाकल्याने याचा फार आरामदायी प्रभाव पडतो आणि यामुळे शरीर ताजेतवाणे होते. सगळ्यांसोबत गाणं गायल्याने, नाचल्याने एक वेगळाच उत्साह संचारतो. त्याने मन अगदी खुश होऊन जातं. होळी खेळण्यामागे या वैज्ञानिक बाबींचा विचार महत्वाचा आहे. महाराष्टÑात रंग पंचमीला अधिक महत्व आहे.-डॉ. कैलास पाटील, पिंपळेसीम, ता. धरणगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव