शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

vidhan sabha 2019 : निवडणूकपूर्व संशयकल्लोळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 12:48 IST

नकार देऊनही मातब्बरांच्या भाजपप्रवेशाची चर्चा कायम ; नियोजनपूर्वक रणनीती की मतदारसंघातील चाचपणी?, तिकीट नाकारल्यास भाजप इच्छुकांच्या भूमिकेविषयी पक्षश्रेष्ठी घेतायत अंदाज ; धक्कादायक नावांची शक्यता

मिलिंद कुलकर्णीलोकसभेप्रमाणे यंदाची विधानसभा निवडणूक ही अभूतपूर्व होईल, असे चित्र आतापर्यंतच्या घडामोडींवरुन दिसून येत आहे. ‘अभी नही, तो कभी नही!’ असे इरेला पेटून सर्वच राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार पहिली लढाई पक्षांतर्गंत विरोधकांशी लढत आहे. स्वत:ची कामगिरी, सक्षमता आणि निवडणूक जिंकण्याची क्षमता हे मुद्दे पक्षश्रेष्ठींना पटवून देण्यापेक्षा पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी उमेदवाराविषयी कान भरण्याचे, अफवा पसरविण्याचे उद्योग सुरु झाले आहेत. स्वाभाविकपणे पक्षांतर्गंत गटबाजी फोफावली असून पक्षशिस्त राखण्याचे नवे काम नेत्यांना करावे लागत आहे.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार हे निश्चित झाले आहे. कोणता पक्ष कोणत्या जागा लढवणार हेदेखील बहुदा ठरले असावे, परंतु आताच त्यांची घोषणा करणे बंडखोरी आणि नाराजीला वाट करुन देण्यासारखे असल्याने निर्णय गुलदस्त्यात ठेवलेला दिसतोय. पण तरीही जळगाव जिल्ह्यात जागावाटपाची बातमी फुटलीच. त्यावरुन काँग्रेस भवनात गदारोळ माजला. कार्यकर्त्यांच्या हाती आलेल्या माहितीनुसार जळगाव शहर आणि रावेर हे दोनच मतदारसंघ आघाडीअंतर्गत काँग्रेसच्या वाट्याला आलेले आहेत. ११ पैकी ९ मतदारसंघ राष्टÑवादीकडे गेले आहेत. कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया स्वाभाविक आहे. पण काँग्रेसदेखील यापेक्षा अधिक जागांसाठी आग्रही होती काय, हे देखील समजून घ्यायला हवे. मुळात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचे सूत्र लक्षात घेतले तर त्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवली होती. ११ पैकी १० जागांवर राष्टÑवादीच्या उमेदवाराने काँग्रेस उमेदवारापेक्षा अधिक मते मिळविली होती. केवळ रावेरचा अपवाद होता. दुसरा मुद्दा म्हणजे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या उपस्थितीत आयोजित प्रशिक्षण शिबीर केवळ ३ मतदारसंघात झाले. त्यावरुन अंदाज आला होताच की, काँग्रेस याच मतदारसंघावर भर देणार आहे. त्यातही आता जामनेर वगळले गेले आहे.भाजपकडे इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी असली तरी तेथे ‘ससा-कासवा’ची स्पर्धा देखील दिसून येत आहे. काहींनी सहा महिन्यांपासून पूर्वतयारी सुरु केली होती तर काहींनी दोन महिन्यांत कार्यक्रमांचा, यात्रेचा, भूमिपूजनाचा, वैयक्तीक लाभ मिळवून देण्याचा धडाका लावला आहे. हा उत्साह पाहता उमेदवारी जणू निश्चित आहे, असेच कुणालाही वाटावे. मात्र काही अनुभवी आणि सुज्ञ उमेदवार हे शांततेने आणि संयमाने तयारी करीत आहे. प्रकाशझोत आणि धूमधडाका न करता चाललेली वाटचाल थेट पक्षश्रेष्ठी आणि मतदारांच्या लक्षात कशी येईल, असे नियोजन सुरु आहे.काही विषय निवडणुकीत कसे महत्त्वाचे ठरतात, हे चाळीसगावमध्ये दिसून आले. ‘बेलगंगा’चा विषय घेत २०१४ मध्ये उन्मेष पाटील यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यावेळी उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांना गिरीश महाजन यांची मदत झाली होती. लोकसभा निवडणुकीतही महाजन यांच्यामुळेच त्यांना ऐनवेळी तिकीट मिळाले. आता हाच ‘बेलगंगे’चा विषय घेऊन चित्रसेन पाटील रिंगणात उतरले आहेत. उन्मेष पाटील हे पत्नी संपदा यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत तर त्यांचे सहकारी राहिलेले मंगेश चव्हाण हे आव्हान उभे करुन आहेत. महाजन यंदा कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, हे निर्णायक ठरणार आहे.लोकसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळविल्याने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हा हुकुमाचा एक्का भाजपकडे असल्याने इच्छुकांची मोठी संख्या त्यांच्याकडे असणे अगदी स्वाभाविक आहे. परंतु, तिकीट एकालाच मिळणार आहे. न मिळालेले इच्छुक त्यावेळी कोणती भूमिका घेतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे. विरोधी पक्षातील मंडळींना आपल्यात सामावणाऱ्या भाजपला ऐनवेळी हेच इच्छुक प्रतिस्पर्धी उमेदवार बनून उभे ठाकले तर नवल वाटायला नको. भाजप त्याचाही अंदाज घेत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव