शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

वीजपुरवठा खंडित होणे ही झाली नित्याचीच बाब...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:06 IST

भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही ...

भुसावळ : पावसाचे चार शितोडे जरी आले किंवा हलकासा वारा सुटला की लगेचच वीजपुरवठा खंडित होतो. ही समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे शिवाजीनगर भागातील संतप्त नागरिकांनी वीज वितरण कार्यालयावर धडक देत ही समस्या तत्काळ सोडवण्याची मागणी केली आहे. रहिवाशांनी अतिरिक्त कार्यकारी अभियंता राहुल पावडे यांना निवेदन दिले असून ही समस्या न सुटल्यास वीज बिल न भरण्याचा इशारा दिला आहे.

निवेदनावर गौरव राजेंद्र वाघ, हर्षल कापडे, रेहान अली, समीर महोमद, रफिक शेख, चेतन मेहते, आकाश अग्रवाल, प्रवीण भोसले, आशिष जाधव, विशाल अग्रवाल, महोमद जुबेर, नदीम शेख, अशोक पवार, जितू मेहरा, नेहाल यादव, तुषार पवार, अभिषेक देवपूजे, नितीन वाघ, आकाश निकम, नितीन गोरे, वेभव बर्गे, वरुण अग्रवाल, चेतन मेंढारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

केवळ लॉकडाऊनमध्येच पुरवठा सुरळीत?

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना अखंड वीजपुरवठा देणाऱ्या महावितरणला आता सुरळीत वीजपुरवठा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ लॉकडाऊन असेल तरच महावितरण सुरळीत वीजपुरवठा करू शकते का, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे.

तांत्रिक कामाच्या नावाखाली खंडित होतो वीजपुरवठा

शाळा, कॉलेजेसकडून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. अद्यापही अनेकांचे ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. अशात सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढला आहे. उन्हाळा नसतानाही केवळ तांत्रिक कामाच्या नावाखाली देखभाल, दुरुस्तीअभावी महावितरण सुरळीत वीजपुरवठा करूच शकत नसल्याचे बोलले जात आहे.

दरात वाढ कायम, समस्या मात्र सुटेना

दरवर्षी महावितरणकडून वीजदरात वाढ करण्यात येते. त्या तुलनेत सुविधा मात्र देण्यात येत नाहीत. शहरातील ८५ टक्के भागांत वीजपुरवठ्याच्या मुद्द्यावर खेळखंडोबा सुरू आहे. अनेक भागांमध्ये व्होल्टेजची समस्याही कायम आहे. त्यामुळे नागरिक हैराण आहेत.