शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

वरुणराजाच्या कृपेने प्रशासनाचीही आबादानी..... जळगाव जिल्ह्याचा संभाव्य टंचाई आराखडा ३६ कोटींवरून १४ लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:04 IST

केवळ अमळनेर व पारोळ््यात टंचाईची शक्यता

जळगाव : जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची अधिकच मेहरनजर दाखविल्याने संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा यंदा केवळ १३ लाख ९० हजार रूपयांचा असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चांगला पाऊस झाल्याने प्रथमच एवढ्या कमी रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलना पाहता हा आराखडा ३६ कोटी रुपयांवरून केवळ १३ लाख ९० हजारावर आला आहे.जिल्ह्यात यंदा १३८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली. त्यामुळे तलाव, धरणेही ओसंडून वाहिले. जानेवारी महिन्यातदेखील नद्या, तलावांना चांगले पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी तयार होणारा आराखडा तयार करण्यावरून प्रशासनात पेच निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने या वर्षासाठी सुरुवातीला २ कोटी ३८ लाखांचा आराखडा तयार केला होता. मात्र जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांची पाणी स्थिती लक्षात घेता हा आराखडा जिल्हा परीषदेकडे परत पाठविण्यात आला होता. शनिवारी सुधारीत आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.अमळनेर व पारोळा तालुक्यातच पाणीटंचाईची शक्यतानव्याने तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात यंदा अमळनेर तालुक्यातील ९ आणि पारोळा तालुक्यातील ९ अशा एकूण १८ गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यासाठीचा खर्च १३ लाख ९० हजार रुपये प्रस्तावित आहे. यात प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा ३६ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. यावेळी मात्र जिल्ह्यात तब्बल १३८ टक्के पाऊस झाल्याने आराखडा अवघा १३ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव