शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

वरुणराजाच्या कृपेने प्रशासनाचीही आबादानी..... जळगाव जिल्ह्याचा संभाव्य टंचाई आराखडा ३६ कोटींवरून १४ लाखावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:04 IST

केवळ अमळनेर व पारोळ््यात टंचाईची शक्यता

जळगाव : जिल्ह्यावर यंदा वरुणराजाची अधिकच मेहरनजर दाखविल्याने संभाव्य पाणी टंचाईचा आराखडा यंदा केवळ १३ लाख ९० हजार रूपयांचा असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. चांगला पाऊस झाल्याने प्रथमच एवढ्या कमी रकमेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलना पाहता हा आराखडा ३६ कोटी रुपयांवरून केवळ १३ लाख ९० हजारावर आला आहे.जिल्ह्यात यंदा १३८ टक्के पाऊस झाला आहे. सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी पार केली. त्यामुळे तलाव, धरणेही ओसंडून वाहिले. जानेवारी महिन्यातदेखील नद्या, तलावांना चांगले पाणी आहे. त्यामुळे दरवर्षी तयार होणारा आराखडा तयार करण्यावरून प्रशासनात पेच निर्माण झाला. जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने या वर्षासाठी सुरुवातीला २ कोटी ३८ लाखांचा आराखडा तयार केला होता. मात्र जिल्ह्यातील धरणे आणि नद्यांची पाणी स्थिती लक्षात घेता हा आराखडा जिल्हा परीषदेकडे परत पाठविण्यात आला होता. शनिवारी सुधारीत आराखडा जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.अमळनेर व पारोळा तालुक्यातच पाणीटंचाईची शक्यतानव्याने तयार करण्यात आलेल्या टंचाई कृती आराखड्यानुसार जिल्ह्यात यंदा अमळनेर तालुक्यातील ९ आणि पारोळा तालुक्यातील ९ अशा एकूण १८ गावांना संभाव्य पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यासाठी १८ योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून त्यासाठीचा खर्च १३ लाख ९० हजार रुपये प्रस्तावित आहे. यात प्रादेशिक नळ योजनांची विशेष दुरूस्ती केली जाणार आहे. गतवर्षी संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा हा ३६ कोटी रुपयांचा तयार करण्यात आला होता. यावेळी मात्र जिल्ह्यात तब्बल १३८ टक्के पाऊस झाल्याने आराखडा अवघा १३ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली.

टॅग्स :Jalgaonजळगाव