शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

लघु सिंचनच्या कामांना स्थगिती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:12 IST

निकष स्पष्ट करायला समितीची स्थापना

जळगाव : जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागातर्फे यंदाच्या निधीतील १२ कोटींची कामे नेमकया कोणत्या निकषांनी करण्यात येत आहेत याबाबत कार्यकारी अभियंता आऱ के़ नाईक पूर्ण माहिती देत नसल्याने या कामांचे कार्यरंभ आदेश थांबविण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे़ याबाबत एक समिती नियुक्त करण्यात आली असून समितीच्या अहवालापर्यंत ही स्थगिती कायम राहणार आहे़ स्थायी समितीच्या सभेत हा निर्णय झाला़जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली़ सर्वाधिक ग्रामपंचायत विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली़यासह जुनी इमारत पाडून या ठिकाणी नवी इमारत उभी करण्यासाठी शासनाकडून निधी घ्यावा, बिओटी तत्त्वावर ही इमारत उभी करू नये असा निर्णय झाला़ बीओटी तत्त्वाला सदस्य नानाभाऊ महाजन व शशिकांत साळुंखे यांनी विरोध दर्शविला़ यानंतर सर्व कायदेशीर बाबी पडताळून सर्वसाधरण सभेची मंजूरी घेऊन शिवतीर्थ मैदानावर व्यापारी संकुल उभारणीसंदर्भात चर्चा करण्यात आली़गेल्या स्थायी समितीच्या सभेत सिंचनच्या १२ कोटींच्या कामांचे कार्यारंभ आदेश थांबविण्यात आले होते़ जलयुक्त शिवार अभियानाच्या निकषानुसार सत्तर टक्के दुरूस्ती व तीस टक्के नवीन कामे अशी ही कामे नसल्याने नेमक्या कुठल्या निकषांनी ही कामे होणार आहेत, हे कार्यकारी अभियंता वगळून अन्य अधिकाऱ्यांनी पुराव्यानिशी सभागृहाला पटवून द्यावे, तेव्हा या कामांना कार्यारंभ आदेश देण्यास कुणाचा विरोध राहणार नाही, असा मुद्दा मांडण्यात आला़ यावर सीईओंच्या अध्यक्षतेखाली एसीईओंचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली व पुढील स्थायी समितीच्या सभेत ही समिती या कामांचे निकष सभेला सांगणार आहे़ ग्रामनिधी कर्जाचे २० कोटी रूपयांपैकी वर्षभरात केवळ ६० लाख रूपये वसूल झाले आहेत़ यासह पाणीपुरवठा योजनेतील कर्मचारी हस्तांतरणाबाबत दस्तावेज उपलब्ध नसून या कर्मचाऱ्यांवर गेल्या ११ वर्षापासून ११ कोटी रूपये खर्च झाले, मात्र त्यांचे कागदपत्रच उपलब्ध नसल्याचा खुलासा अधिकाºयांनी बैठकीत केला़ या विषयावर चर्चा झाली़ यासह एरंडोल तालुक्यात गटविकास अधिकारी व अतिरिक्त गटविकास अधिकारी कार्यरत नसल्याने कामे खोळंबत असल्याचा मुद्दा नानाभाऊ महाजन यांनी मांडला़चौदाव्या वित्त आयोगासाठी आठ दिवस बैठकाग्रामपंचायतींकडे चौदाव्या वित्त आयोगाचा कोट्यवधी निधी पडून आहे़ त्यात आणखी ७० कोटींचा हफ्ता प्राप्त झाला असून सर्व ग्रामपंचायतींच्या अडचणी ऐकून घेण्यासाठी प्रत्येक पंचायत समिती येथे बीडिओ, ग्रामसेवक, सरपंच यांची संयुक्त बैठक जिल्हा परिषदेतर्फे घेण्यात येणार आहे़ ४ ते १२ सप्टेंबर दरम्यान या बैठका होणार असल्याचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव