शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:31 IST

पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिकांची वाढ खुंटलीजिल्ह्यातील हलक्या जमिनीवरील पिके धोक्यातजळगाव जिल्ह्यातील काही भागात अधिक बिकट स्थिती

जळगाव : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड वाढत गेल्यास उत्पादनातील घटीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली होती. त्यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरण्याही पूर्ण झाल्या. मध्यंतरी ५-६ दिवस खंड पडल्याने त्या काळात शेतकºयांनी पिकांना खताचा डोसही दिला. त्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावल्याने खतही चांगले लागू पडले. मात्र त्यानंतर पिक ऐन वाढीच्या स्थितीत आलेले असताना गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे.बहुतांश पिकांची वाढ खुंटलीपावसाने पिकांच्या ऐनवाढीच्या काळातच दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने काही शेतकºयांनी खते देणेही टाळले आहे. पिकांची वाढ खुंटली असून सोयाबिन वगळता सर्वच पिकांच्या उत्पादनात आजच्या स्थितीला किमान २० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. उडीद-मुगाचे पीक तर जेमतेम ६५-७५ दिवसांचे असते. त्याला आतापर्यंत शेंगा लागणे अपेक्षित होते. मात्र वाढ खुंटल्याने अद्याप शेंगा लागलेल्या नाहीत. वाढ खुंटल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.कपाशी मोडणे सुरूकाही ठिकाणी तर कपाशीची वाढच चांगली झालेली नाही. असे शेतकरी कपाशी मोडून टाकत असून रब्बीसाठी शेत तयार करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. जामनेर, बोदवड, पाचोरा, मुक्ताईनगरचा वरचा भाग आदी भागात आधीच पावसाने तुरळक हजेरी लावलेली असतानाच पंधरा दिवस ताण दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हलक्या जमिनीवरील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीJalgaonजळगाव