शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात कृषि उत्पादनात २० टक्के घट होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 12:31 IST

पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपावसाअभावी पिकांची वाढ खुंटलीजिल्ह्यातील हलक्या जमिनीवरील पिके धोक्यातजळगाव जिल्ह्यातील काही भागात अधिक बिकट स्थिती

जळगाव : पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने ऐन वाढीच्या कालावधीत पिकांना ताण पडल्याने वाढ खुंटली असून उत्पादनात किमान २० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पावसाचा खंड वाढत गेल्यास उत्पादनातील घटीचे प्रमाण वाढण्याची भिती आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरूवात केली होती. त्यानंतरही काही प्रमाणात पाऊस झाल्याने राहिलेल्या पेरण्याही पूर्ण झाल्या. मध्यंतरी ५-६ दिवस खंड पडल्याने त्या काळात शेतकºयांनी पिकांना खताचा डोसही दिला. त्यानंतर लगेचच पावसाने हजेरी लावल्याने खतही चांगले लागू पडले. मात्र त्यानंतर पिक ऐन वाढीच्या स्थितीत आलेले असताना गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दांडी मारली आहे.बहुतांश पिकांची वाढ खुंटलीपावसाने पिकांच्या ऐनवाढीच्या काळातच दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्याने काही शेतकºयांनी खते देणेही टाळले आहे. पिकांची वाढ खुंटली असून सोयाबिन वगळता सर्वच पिकांच्या उत्पादनात आजच्या स्थितीला किमान २० टक्के घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केली. उडीद-मुगाचे पीक तर जेमतेम ६५-७५ दिवसांचे असते. त्याला आतापर्यंत शेंगा लागणे अपेक्षित होते. मात्र वाढ खुंटल्याने अद्याप शेंगा लागलेल्या नाहीत. वाढ खुंटल्याने सर्वच पिकांच्या उत्पादनावर व गुणवत्तेवर परिणाम होणार आहे.कपाशी मोडणे सुरूकाही ठिकाणी तर कपाशीची वाढच चांगली झालेली नाही. असे शेतकरी कपाशी मोडून टाकत असून रब्बीसाठी शेत तयार करण्याच्या तयारीत असल्याचे चित्र आहे. जामनेर, बोदवड, पाचोरा, मुक्ताईनगरचा वरचा भाग आदी भागात आधीच पावसाने तुरळक हजेरी लावलेली असतानाच पंधरा दिवस ताण दिल्याने पिके धोक्यात आली आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही हलक्या जमिनीवरील पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे.

टॅग्स :agricultureशेतीJalgaonजळगाव