शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

ममुराबाद भागातील ग्रामीण रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : परिसरातील नांद्राखुर्द, आव्हाणे, खेडी, सुजदे, असोदा गावांकडे जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची काही दिवसांपासून प्रचंड दुरवस्था ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : परिसरातील नांद्राखुर्द, आव्हाणे, खेडी, सुजदे, असोदा गावांकडे जाणाऱ्या ग्रामीण रस्त्यांची काही दिवसांपासून प्रचंड दुरवस्था झाली आहे. जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे बहुतांश रस्ते आता वाहतूकयोग्य राहिलेले नाही. शेतकऱ्यांसह वाहनधारकांना त्यामुळे हाल सहन करावे लागत आहेत.

ममुराबादहून तापी नदीकाठावरील नांद्रा खुर्द गावाकडे जाण्यासाठी धामणगाव फाट्यावरून पक्का रस्ता उपलब्ध आहे. मात्र, त्यामार्गे गेल्यास जवळपास पाच ते सहा किलोमीटरचा फेरा पडतो. त्यामुळे नांद्रा तसेच खापरखेडा परिसरांतील वाहनधारक थेट ममुराबादला जोडणाऱ्या मधल्या रस्त्याचा पर्याय निवडतात. याशिवाय तापी नदीच्या पलीकडे असलेली यावल तालुक्यातील थोरगव्हाण, मनवेल, साकळी येथील नागरिकसुद्धा याच रस्त्याचा वापर करतात. दुर्दैवाने मधला कमी अंतराचा हा रस्ता खूप खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनधारकांचे बाराही महिने हाल होताना दिसतात. लोंढा नाल्यानजीकचा काही भाग सोडला तर उर्वरित चार किलोमीटर अंतराचा रस्ता आता शेवटच्या घटका मोजत आहे. रस्त्याच्या दुतर्फा झाडेझुडपे वाढली आहेत. नांद्रा तसेच ममुराबाद गावाकडील प्रत्येकी एक किलोमीटर रस्त्याची जास्तकरून दुरवस्था झाली असून, त्यावरून दुचाकी चालविणेसुद्धा कठीण झाले आहे. अशाच प्रकारे आसोदा, सुजदे, धामणगाव, खेडी-आव्हाणे गावांकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्थिती विदारक झाली आहे. कमी अंतराचे रस्ते खराब झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांना व वाहनधारकांना फेऱ्याच्या रस्त्यांचा वापर करावा लागत आहे.

ममुराबाद ते आसोदा हा रस्ता नावाला डांबरी आहे. त्यावरील अवजड वाहनांची वर्दळ लक्षात घेता त्याच्या मजबुतीकरणाचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तशी मागणी परिसरातून होत आहे.

--------

फोटो कॅप्शन - ममुराबाद ते नांद्राखुर्द रस्त्याची प्रचंड दैन्यावस्था झाली असून त्याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. (जितेंद्र पाटील)