शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

कोरोनाच्या संकटातही राजकारण सुटेना, प्रशासनालाही वारंवार इशारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. इतकेच नव्हे आपण काही तरी करीत ...

राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असला तरी या काळात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. इतकेच नव्हे आपण काही तरी करीत आहे, हे दाखविण्यासाठी वारंवार प्रशासनाकडे विविध मागण्या करीत इशारे दिले जात आहे. राज्य सरकार केंद्रावर तर भाजप नेते राज्य सरकारवर टीका करीत आहे. अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातही असेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. भाजपचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करण्यासह जिल्हा प्रशासनाकडेही वारंवार विविध मागण्या करीत आहे. यात भाजपच्या या पूर्वीच्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी काय केले व किती निधी आणला, असाही सवाल शिवसेनेकडून उपस्थित होत आहे. कोरोना संसर्ग वाढत असताना सर्वांनी जनतेसाठी काम करणे अपेक्षित असताना राजकीय नेते मात्र या महामारीची संधी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातूनच गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप थांबलेले नाही. यात रुग्णसंख्या व मृतांच्या आकडेवारीवर संशय व्यक्त करीत माजी मंत्री गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर टीका केली. यामध्ये राज्य शासन कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असून आपले अपयश लपविण्यासाठी कोरोनाची चाचणी, मृतांचा आकडा अशा सर्वच बाबतीत लपवाछपवी सुरू आहे. इतका वाईट प्रसंग जनतेवर आला असून, ज्या गांभीर्याने हा प्रसंग घ्यायला हवा, त्या पद्धतीने राज्य शासन गांभीर्याने घेत नाहीये, अशी टीका गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर केली होती. इतकेच नव्हे तर शासनाच्या नाकर्तेपणामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्यात वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, तरीही शासन हा विषय गांभीर्याने घेत नाही. शासनाच्या अपयशामुळेच आपण ज्यांचा जीव वाचवू शकतो, अशा लोकांचाही मृत्यू होत असल्याचा गंभीर आरोप महाजन यांनी केला. रेमडेसिविर, ऑक्सिजनचा सर्वत्र तुटवडा आहे. रुग्णालयांना रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी रेमडेसिविर व ऑक्सिजन मिळत आहे. रुग्णांना बेड मिळत नाही. कोरोना चाचणीचे अहवाल १२ ते १४ दिवस येत नाहीत, हे सारे चित्र गंभीर असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकारकडून राज्य सरकारला हवी तशी मदत मिळत नसल्याचा दावा महाविकास आघाडीकडून केला जात असताना गिरीश महाजन यांनाही लक्ष्य करण्यात आले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव महापालिकेसाठी डीपीडीसीतून निधी दिला तसेच कोरोना उपाययोजनांसाठी विविध पावले उचलल्याचे सांगत गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांनी किती निधी दिला, असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला जात आहे. या शिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते जवळपास दर आठवड्याला जिल्हाधिकारी कार्यालयात भेटी देत विविध मागण्या करीत आहे तर कधी गंभीर इशारा देत आहे. मात्र या काळात प्रशासनाला सहकार्य करीत राजकारण बाजूला ठेवून कोरोनाशी दोन हात करणे अपेक्षित असल्याची जनतेची अपेक्षा आहे.