शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

पोळा : जीवाच्या मैतराचा सण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:20 IST

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा ...

श्रावण महिन्यात सणांची रेलचेल पाहायला मिळते. अनेक सण या महिन्यात आपल्याला भेटीला येतात. पावसाचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालू नेसून नवीकोरी झालेली असते. संपूर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मनदेखील ताजंतवानं झालेलं असतं.

अशा या श्रावण महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी यासारखे सण साजरे करतो आणि या श्रावण महिन्याची सांगता होते ती श्रावण महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या पोळा या सणाने. बळीराजाचा आनंदाचा दिवस.

श्रावण अमावास्येला अर्थात पिठोरी अमावास्येला शेतकरी बांधव आपल्या सर्जाराजाचा हा सण अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. विदर्भ, खान्देशात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. महाराष्ट्रात बळीराजा मात्र आपल्या जिवाभावाच्या सोबत्याचा हा सण अत्यंत पारंपरिक पद्धतीने आजही साजरा करताना दिसतो. हा आपल्या मातीशी जोडणारा सण आहे. ही संस्कृती आपणच जपायला हवी. आमच्याकडे घरी दोन-दोन जोड्या होत्या. काका, वडील बैलांना आमंत्रण द्यायचे. पोळा या सणाच्या आदल्या दिवशी बैलांना रीतसर आमंत्रण देण्याची पद्धत आहे. त्याला खांदेमळणी म्हणतात.

“आज आमंत्रण देतोय ते घ्या आणि उद्या जेवायला या!” असं कानात सांगतात. असं आमंत्रण या बैलांना दिलं जातं. दुसऱ्या दिवशी सकाळी बैलांना नदीवर न्यायचं, त्यांना झकास अंघोळ घालायची. घरी आणल्यावर त्यांच्या सर्वांगावर गेरूने ठिपके द्यायचे, शिंगांना बेगड, रंग, डोक्याला बाशिंग,

गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा घातल्या जातात. पायांमध्ये चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घालतात. नवी वेसण, नवा कासरा घातल्यानंतर अंगावर रेशमी नक्षीकाम केलेली झूल पांघरली जाते. बैलांचा गोठा स्वच्छ करण्यात येतो. घरातील सुवासिनी बैलांची विधीवत पूजा करतात.

बैलांना पोळ्याच्या दिवशी कोणतेही काम करू दिले जात नाही.

पुरणपोळीचा त्याला नैवेद्य दाखविला जातो. बैलाची कायम निगा राखणाऱ्या सालदाराला नवे कपडे दिले जातात. जेवण दिल जाते. मालक सालदाराबरोबरच जेवतात. भेद नसतो. बैलांचे जेवण झाल्यानंतर सायंकाळी त्यांना गावाबाहेर मंदिरात नेले जाते. बऱ्याच गावांत नदीच्या काठावर बैलांना आणले जाते.

सर्व शेतकरी आपापल्या जोड्या घेउन या ठिकाणी एकत्र येतात. आंब्याच्या पानांचे तोरण बांधून बैलांना रांगेत उभे करण्यात येते. ढोल-ताशे, नगारे वाजविले जातात. गावचा पोलीस पाटील तोरण तोडतील आणि पोळा फुटतो. पोळ्याची गीतं म्हटली जातात. येथे बैलांच्या शर्यतीदेखील आयोजित केल्या जातात. ज्याच्या जोडीला सर्वांत चांगले तयार केले असेल त्या जोडीला पारितोषिक दिले जाते.

आपापल्या गावातील परंपरेनुसार उत्सव साजरा झाल्यानंतर कार्यक्रम संपन्न होतो. घरी निघताना बैलांना घरोघरी नेले जाते. तेथे घरोघरी बैलांची पूजा करतात. औक्षण करतात. पुरणपोळीचा घास भरवितात. बैल नेणाऱ्यास ओवाळणी (पैसे) देतात. आपल्या संस्कृतीत वृक्षांप्रमाणेच वन्यजीवांनादेखील पूजनीय मानले जाते. वर्षभर शेतात शेतकऱ्यासमवेत बरोबरीने राबणाऱ्या बैलाप्रती एक दिवस उतराई होण्याची संधी म्हणून पोळा या सणाकडे आपण पाहतो. पूर्वापार चालत आलेल्या रूढीपरंपरांप्रमाणे हे उत्सव आजही गावागावांमधून साजरे होताना आपल्याला दिसताहेत; पण पहिल्यासारखा उत्साह वाटत नाही. त्याला अनेक कारणे आहेत.

बहुतेक कामे मशीन, ट्रँक्टरच्या साह्याने होत असल्याने बैलांची संख्याही रोडावली आहे. शहरी भागात तर पोळा सण आला-गेला अशीच अवस्था असते. अजूनही बऱ्याच घरात मातीच्या बैलजोडी आणून पूजा करतात. जोपर्यंत शेती-शेतकरी आहे, तोपर्यंत पोळा आणी बैलपोळ्याचे महत्त्व टिकून राहणार आहे. ते जिवाभावाचे नाते आहे, हे सांगायला नको.

बहिणाबाई चौधरी आपल्या कवितेत म्हणतात- ‘आला आला शेतकऱ्या, पोयाचा रे सण

मोठा, हाती घेईसन वाट्या, आता शेंदुराले घोटा, आता बांधा रे तोरण, सजवारे घरदार..।’