शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार- कवी रमेश पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:40 IST

कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमसापच्या भडगाव शाखेचा वर्धापन दिन सोहळाभडगाव येथे कवि संमेलन रंगलेसमीक्षा साहित्य संमेलन भडगावी होणार

भडगाव, जि.जळगाव : कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगावच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा व कविसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य तथा मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांनी केले.यावेळी विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील, प्रतापराव पाटील, शिवनारायण जाधव गायकवाड, निमंत्रित कवी विष्णू थोरे, हास्य कवी प्रमोद अंबडकर, सुप्रसिद्ध कवी कृपेश महाजन, सिनेट सदस्य दिनेश नाईक, नरेंद्र निकुंभ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य जगताप यांनी शाखेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच ज्ञानातून पैसा व पैशातून ज्ञान व मनोरंजन समाजासाठी उपलब्ध करून द्या, असे आवाहन शाखेस केले. भडगावला मोठी सांस्कृतिक परंपरा असून या परंपरेत मसाप शाखेचे योगदान असावे, असे मला नेहमीच वाटत होते आणि म्हणून भडगावी शाखा मिळावा म्हणून आपण आग्रह धरला होता, असे त्यांनी सांगितले.विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील यांनी कवी दिनकर यांची हिंदी रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी कवी विष्णू थोरे यांनी 'वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लयी खोलं, दु:ख सावळून येते मुखी डोळ्यामधी वंलं' या कवितेने अंतर्मुख केले, तर हास्य कवी प्रमोद अंबडकर यांनी माय म्हणे बाबू तु लगीन कधी करतं, दोन तीन वर्षात तुही ढेरी येईल वरतं' या वºहाडी कवितेतून प्रेक्षकांना हसवले. पोरीचा बाप हो तिरपा व्हता डोया, आन ताटं सोडून जमिनीवर वाढत जाये पोया,' अशा विनोदी कविता सादर केल्या. शाहीर शिवाजीराव पाटील, कवी सुनील गायकवाड, सीमा पाटील, लताबाई पाटील, बालकवी राजेश पाटील यांनीही आपल्या कविता सादर केल्या. काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश माने यांनी केले.विविध क्षेत्रातील यशवंतांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यात शाहीर शिवाजीराव पाटील, प्रा.डॉ.रमेश माने, प्रा.डॉ.दीपक मराठे, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.जे.डी.गोपाळ, प्रा.डॉ.बी.एस भालेराव, डॉ.प्रमोद पाटील, सुनील गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.सुरेश कोळी यांनी, तर सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.यावेळी २०२१ मधील समीक्षा साहित्य संमेलन भडगाव शाखेला आपण देणार आहोत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांनी यावेळी घोषित केले, तर नगरदेवळ्याचे कवी गो.शि.म्हसकर यांच्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ प्रयत्न करेल, असे आश्वासन कवी रमेश पवार यांनी दिले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhadgaon भडगाव