शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार- कवी रमेश पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 23:40 IST

कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देमसापच्या भडगाव शाखेचा वर्धापन दिन सोहळाभडगाव येथे कवि संमेलन रंगलेसमीक्षा साहित्य संमेलन भडगावी होणार

भडगाव, जि.जळगाव : कविता म्हणजे आत्म्याचा हुंकार जोपर्यंत अनुभव आपल्या मनाशी भेटत नाही तोपर्यंत आपली कविता दुसऱ्याच्या मनाला भिडत नाही. कविता कशी सुचली हे सांगत बसणारे कवी बहुदा कवितेच्या मूळापर्यंत पोहचलेले नसतात. तो त्यांचा उथळ अनुभव असतो. कविता ही आतून आलेली असावी, असे प्रतिपादन साहित्य संस्कृती मंडळ, मुंबईचे सदस्य कवी रमेश पवार यांनी व्यक्त केले.ते महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा भडगावच्या प्रथम वर्धापन दिन सोहळा व कविसंमेलनात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य तथा मसाप चाळीसगाव शाखेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य तानसेन जगताप यांनी केले.यावेळी विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील, प्रतापराव पाटील, शिवनारायण जाधव गायकवाड, निमंत्रित कवी विष्णू थोरे, हास्य कवी प्रमोद अंबडकर, सुप्रसिद्ध कवी कृपेश महाजन, सिनेट सदस्य दिनेश नाईक, नरेंद्र निकुंभ आदी व्यासपीठावर उपस्थित होते.प्राचार्य जगताप यांनी शाखेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच ज्ञानातून पैसा व पैशातून ज्ञान व मनोरंजन समाजासाठी उपलब्ध करून द्या, असे आवाहन शाखेस केले. भडगावला मोठी सांस्कृतिक परंपरा असून या परंपरेत मसाप शाखेचे योगदान असावे, असे मला नेहमीच वाटत होते आणि म्हणून भडगावी शाखा मिळावा म्हणून आपण आग्रह धरला होता, असे त्यांनी सांगितले.विश्वस्त अध्यक्ष सुनील पाटील यांनी कवी दिनकर यांची हिंदी रचना सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.यावेळी कवी विष्णू थोरे यांनी 'वेदनेच्या विहिरीचा बाई तळ लयी खोलं, दु:ख सावळून येते मुखी डोळ्यामधी वंलं' या कवितेने अंतर्मुख केले, तर हास्य कवी प्रमोद अंबडकर यांनी माय म्हणे बाबू तु लगीन कधी करतं, दोन तीन वर्षात तुही ढेरी येईल वरतं' या वºहाडी कवितेतून प्रेक्षकांना हसवले. पोरीचा बाप हो तिरपा व्हता डोया, आन ताटं सोडून जमिनीवर वाढत जाये पोया,' अशा विनोदी कविता सादर केल्या. शाहीर शिवाजीराव पाटील, कवी सुनील गायकवाड, सीमा पाटील, लताबाई पाटील, बालकवी राजेश पाटील यांनीही आपल्या कविता सादर केल्या. काव्य मैफिलीचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.रमेश माने यांनी केले.विविध क्षेत्रातील यशवंतांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सन्मान करण्यात आला. यात शाहीर शिवाजीराव पाटील, प्रा.डॉ.रमेश माने, प्रा.डॉ.दीपक मराठे, प्रा.डॉ.दिनेश तांदळे, प्रा.डॉ.जे.डी.गोपाळ, प्रा.डॉ.बी.एस भालेराव, डॉ.प्रमोद पाटील, सुनील गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक प्रा.सुरेश कोळी यांनी, तर सूत्रसंचालन किरण चव्हाण यांनी केले.यावेळी २०२१ मधील समीक्षा साहित्य संमेलन भडगाव शाखेला आपण देणार आहोत, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे विभागीय सदस्य प्राचार्य तानसेन जगताप यांनी यावेळी घोषित केले, तर नगरदेवळ्याचे कवी गो.शि.म्हसकर यांच्या काव्यसंग्रहासाठी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ प्रयत्न करेल, असे आश्वासन कवी रमेश पवार यांनी दिले. 

टॅग्स :literatureसाहित्यBhadgaon भडगाव