शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय- कवी अशोक कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 16:42 IST

अमळनेर येथे रंगले पावसाळी काव्यसंमेलन

अमळनेर, जि.जळगाव : कविता म्हणजे व्यक्त होणं होय, दु:खाला रूप देणे म्हणजेच कविता होय, असे उदगार प्रसिद्ध कवी अशोक कोतवाल यांनी येथील मराठी वाङ््मय मंडळाच्या ‘पाऊस कवितेतला’ या जिल्हास्तरीय कविसंमेलनात काढले.येथील मराठी वाङ््मय मंडळ व प्रा.र.का.केले सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने काव्यसंमेलन रविवारी सकाळी नांदेडकर सभागृहात पार पडले. या वेळी जिल्ह्यातील कवींच्या श्रावणसरींनी रसिक चिंब झाले. मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, डॉ.सुहास देशमाने, कार्यवाह रमेश पवार, प्रा.प्र.ज.जोशी, नरेंद्र निकुंभ व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.प्रमुख अतिथी डॉ.संजीवकुमार सोनवणे यांनी बोलताना सांगितले, अमळनेर शहरात राहत असताना मी घडत गेलो. साहित्यिक झालो, ही अमळनेरची देणगी असल्याचे सांगत त्यांनी वस्ती आणि मौहला ही कविता सादर केली. त्यातून त्यांनी गावगड्यातील बालपण आणि हिंदू मुस्लीम ऐक्य याविषयी वर्णन ऐकवले.जळगावच्या डॉ.संगीता म्हसकर यांनी प्रेम निसर्ग यावर आधारित ‘पुन्हा हा चंद्र जागावा’, कधी फुलात रंगले कधी डावात न्हाले या दोन गझल सादर केल्या.धरणगावचे बी.एन.चौधरी यांनी आठवणी दंगलीच्या या कवितेतून दंगलीचे वास्तव उभे केले, तर श्रावण या कवितेतून सृष्टीचे वर्णन सादर केले. जळगावच्या माया धुप्पड यांनी माझ्या पाऊस फुला....रे तुझ्यासाठी माझ्या काळजात झुलतो झुला, देशभक्तीपर कविता भारत माझा देश ही कविता सादर केली. मिलिंद चौधरी यांनी कवितेतून खंत व्यक्त केली.भडगाव येथील रमेश धनगर यांनी पावसाची झडप आणि ग्रामीण जीवनावर आधारित कविता सादर केल्या.पाचोरा येथील कृपेश महाजन यांनी पावसाची कविता, डेथ आॅफ सोल या कवितेतून समाजाचे वास्तव यावर प्रकाश टाकला. प्रा.डॉ.रमेश माने यांनी विठ्ठलाचा अभंग यातून पेरूनिया घाम उगला दुष्काळ ही कविता सादर केली, तर सुशिक्षित बेरोजगारांचे अभंग यातून सुशिक्षित बेरोजगारांचे मनोगत व्यक्त केले.अमळनेरचे कवी रमेश पवार डिजिटल युग या कवितेतून पाण्याचे महत्व विशद करणारी कविता सादर केले. तुला कसं सांगू माझ्या देशा ही निर्भया गँगरेपवर आधारित कविता सादर केली.काव्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोतवाल यांनी पंढरपूर आणि वारकरी यांची श्रद्धा व्यक्त करणारी कविता सादर केली. सूत्रसंचालन रमेश पवार यांनी, तर आभार नरेंद्र निकुंभ यांनी मानले.

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर