शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

कवयित्री बहिणाबाई : बहुवस्तू स्पर्शी प्रतिभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:41 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात प्रा.ए.बी. पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा.

बहिणाबाईची प्रतिभा बहुवस्तू स्पर्शी होती. ती बुद्धिमान आणि बहुश्रृत होती. अतिशय संवेदनशील होती. त्यामुळे तिच्या नजरेतून कुठलाही विषय, कुठलाही प्रसंग सुटला नाही. घरकाम असो की शेतीकाम, सुख-दु:खाचे प्रसंग असो की निसर्गातील दृश्य असो किंवा वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटीचा प्रसंग असो. या प्रत्येक वेळी तिची प्रतिभा जागृत असायची. तिच्या कवित्व शक्तीमुळे प्रत्येक प्रसंग गाण्याच्या रुपात व्यक्त होत असे. बहिणाबाई निरक्षर असूनसुद्धा या वेगवेगळ्या प्रसंगी व्यक्त होताना तिला शब्दांची अडचण कधी आली नाही. अगदी सहजरीत्या तिच्या लेवागण बोलीमध्ये उपमा, यमकांचा चपखल प्रयोग तिने केलेला आहे.बहिणाबाईकडे विनोद बुद्धीही होती. काही ओव्या, म्हणी, शब्दचित्रे व भाषांमध्ये उपहासाबरोबर शब्दनिष्ठ व प्रसंगनिष्ट विनोद केलेला आहे. ‘नाही दियामधी तेल’ ही कविता प्रसंगनिष्ठ विनोदाचे उत्तम उदाहरण आहे. ‘अनागोंदी कारभार’मध्ये सोनार मडके भाजतो, तर कुंभार दागिने गढतो, सुतार कपडे शिवतो तर शिंपी लाकूड घडतो इत्यादी चित्रणातून बहिणाबाईने उपहासात्मक शैलीत अनागोंदी कारभार व बिघडलेल्या समाज व्यवस्थेचे सुरेख वर्णन केलेले आहे.बहिणाबाईने रेखाटलेली काही व्यक्तीचित्रे ही अप्रतिम आहेत. नात्यातील माणसांचे केलेले वर्णन हुबेहुब तर आहेच, पण त्यातून नात्यातील ओलावाही स्पर्शून जातो. कमिटीचा शिपाई मुनीर, त्याची खुरटलेली दाढी, चकणे डोळे, हातात घडी, तोंडात विडी, तोंडात विडी असे विनोदी अंगाने केलेले वर्णन वाचून तो साक्षात डोळ्यासमोर उभा राहतो. त्याचप्रमाणे छोटू भैय्या, रायरंग आदी व्यक्तीचित्रेही सजीव झालेली आहेत.बहिणाबाईच्या संग्रहात काही म्हणीही आहेत. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय समर्पकपणे प्रकट करण्याचे सामर्थ्य म्हणींमध्ये असते. लोकजीवनात लोकानुभवातून अशिक्षित लोकही अशा सुंदर म्हणींचा वापर करताना दिसतात.बहिणाबाईची पुढील म्हण, ‘‘दया नाही, मया नाही, डोयाले पानी, गोगलगायच्या दुधाचा काढा वो लोणी’’ अशीच नितांत सुंदर आहे. ज्याच्या हृदयात दुसऱ्याबद्दल प्रेम, करुणा नाही तरी डोळ्यात पाणी आहे म्हणजेच तो केवळ दिखावा आहे. गोगलगायच्या दुधाचे लोणी काढण्यासारखे अशक्यप्राय आहे. अशाप्रकारे, ‘‘मस्तकातलं पुस्तकात गेलं, पुस्तकातलं मस्तकात गेलं’’ यासारख्या म्हणी अप्रतिमच आहे.बहिणाबाईची सामाजिक जाणीवही प्रगल्भ होती. हरिजनांच्या वस्तीतून जात असताना त्यांचे हालाखीचे जीवन तिच्या नजरेतून सुटत नाही. ‘‘देखा महारवाड्यात कशी मानसाची दैना’’ असे सांगत त्यांच्या दु:खमय जीवनाचे वर्णन ती करते. दारूभट्टीचे वर्णनही असेच वास्तववादी आहे. जिवंत असून मेल्यासारखी, तोंडाच्या चिलमा झालेली, हातात कवडी नसताना लाखोंच्या गोष्टी करणाºया माणसांचे चित्रण प्रत्ययकारी आहे.बहिणाबाईची प्रतिभा अशी बहुवस्तुस्पर्शी आहे. कुठलाही विषय तिला वर्ज्य नाही. कुठलाही विषय असो त्याला तिने काव्याच्या कोंदणात सुरेख बसवला आहे. हा चमत्कार नि:संदेह बहिणाबाईच्या अलौकिक प्रतिभेचा आहे.बहिणाबाईला भाषाशास्त्र अवगत असायचे कारणच नाही, पण तिने काही ओव्यांमध्ये भाषाशास्त्रीय गमती केल्या आहेत. अर्थात यातून बहिणाबाईचे निरीक्षण व चिंतनच दिसून येते. माय म्हणताना ओठ ओठाला भिडतो तर आत्या म्हणताना ओठात अंतर पडत, तात म्हणताना जीभ दातात अडते, तर काका म्हणताना मागे लपते, सासू म्हणताना तोंडातून वारा जातो. ह्या सर्व गमती भाषाशास्त्रीय आहेत. पण बहिणाबाईने त्यातून नात्यातील अंतर स्पष्ट केले आहे.-प्रा.ए.बी. पाटील

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव