शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शहरातील ६४५ किमीपैकी ५७० किमीच्या रस्त्यांची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:20 IST

भुयारी गटार योजनेंतर्गत होणारे खोदकाम - १७० किमी पाणी पुरवठा योजनेंतर्गत झालेले खोदकाम - ६२४ किमी शहरातील रस्ते - ...

भुयारी गटार योजनेंतर्गत होणारे खोदकाम - १७० किमी

पाणी पुरवठा योजनेंतर्गत झालेले खोदकाम - ६२४ किमी

शहरातील रस्ते - ६४५ किमी

दोन्ही योजनेंतर्गत तुटलेले रस्ते - ५७० किमी

योजनेचे काम नसतानाही रस्त्यांची दुर्दशा - ९० किमी (अंदाजे)

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात गेल्या दोन वर्षांपासून अमृत अंतर्गत पाणी पुरवठा व भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. यामुळे शहरातील नवीन रस्त्यांच्या कामाला ‘ब्रेक’ लागला आहे. या योजनेच्या खोदकामामुळे शहरातील एकूण ६४५ किमी रस्त्यांपैकी ५७० किमीचे रस्ते फुटले आहेत. म्हणजे शहरातील ९० टक्के रस्त्यांची दुर्दशा झाली असून, गेल्या दोन वर्षांपासून खड्डेमय रस्त्यावरूनच जळगावकरांना प्रवास करावा लागत आहे.

अमृत पाणी पुरवठा योजना शहरासाठी मंजूर झाल्यानंतर शहरात नवीन रस्त्यांचे काम हाती घेण्यास शासनाने बंदी घातली होती. त्यामुळे जळगावकरांना दोन वर्षे योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत खराब रस्त्यामधूनच मार्ग काढावा लागणार, हे निश्चित झाले होते; मात्र प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी हा शासननिर्णय इतका मनावर घेतला की, रस्त्यांची साधी दुरुस्तीही त्यांना करता आलेली नाही. काही ठिकाणी दुरुस्ती झाली; मात्र तीन महिन्यांच्या काळातच मनपाच्या कामाचे पितळ उघडे पडले. दरम्यान, आता कुठे दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली असली तरी हे काम थातूूरमातूर पद्धतीनेच होत आहे.

दुरुस्तीसाठी ३०० कोटींचे अंदाजपत्रक

अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम मार्चपर्यंत संपणार आहे. तर भुयारी गटार योजनेच्या कामाची मुदत जुलै महिन्यापर्यंत आहे. भुयारी गटार योजनेच्या कामाची गती पाहिल्यास हे काम मुदतीपूर्वी होण्याची शक्यता असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी दिली होती. या दोन्ही योजनांचे काम अंदाजे ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शहरातील फुटलेल्या रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सुमारे ३०० कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात येणार आहे. ३०० कोटींचा निधी शासनाकडून प्राप्त न झाल्यास मनपाकडे इतका निधी निर्माण होणे कठीण आहे. त्यामुळे अमृतची कामे पूर्ण झाली तरी निधीअभावी कामे होणे कठीणच आहे.

शासनाकडून निधी मिळणे कठीण

ज्या शहरांमध्ये अमृतची कामे झाली आहेत किंवा सुरू आहेत. त्या शहरातील रस्त्यांची कामे अमृत योजना पूर्ण झाल्यावरच करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या; तसेच शासन आदेशाप्रमाणे योजनेनंतर रस्त्यांचा कामासाठीचा निधी शासनाकडून देण्यात येणार होता; मात्र ४ मे च्या शासन निर्णयानुसार कोरोनाच्या महामारीमुळे नवीन कामांना शासनाने ‘ब्रेक’ लावला आहे. शासनाने मनपाला जाहीर झालेल्या १०० कोटींच्या निधीला स्थगिती दिली आहे. अशा परिस्थितीत मनपाला नवीन रस्त्यांसाठी लागणारा ३०० कोटींचा निधी मनपा उभारणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, मनपा फंडातून मनपाने आधीच ४६ कोटींच्या रस्त्यांचे काम हाती घेतले आहे. त्यासाठीही मनपाकडून निधी उपलब्ध नाही.

कोट..

अमृतची कामे सुरू असलेल्या शहरात खोदकामामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्तीसाठी शासनच निधी देणार आहे. त्यामुळे भविष्यात रस्त्यांचा प्रश्न भेडसावणार नाही. अमृतच्या कामामुळे नक्कीच रस्त्यांची दुरवस्था झाली असली, तरी त्याला पर्याय नव्हता; मात्र योजना पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांचे काम हेच मुख्य अजेंड्यावर राहणार आहे.

-भारती सोनवणे, महापौर, मनपा.