शहरं
Join us  
Trending Stories
1
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
2
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
3
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
5
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
6
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
7
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
9
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
10
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
11
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
12
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
13
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
14
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी
15
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
16
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
17
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
18
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
19
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
20
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन झाले. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागात दुबार पेरणीचे ...

जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन झाले. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नगरदेवळा येथे रात्रभर भीजपाऊस झाला.

पाचोरा

पाचोरा तालुक्यात मध्यम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आही आणि तूर्त दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल तालुक्यातील मंडळनिहाय पडलेला पाऊस पाचोरा -८मि.मी. नांद्रा-२मि.मी. नगरदेवळा-१३मि.मी. गाळण - ३५मि.मी. कुऱ्हाड -५ मि.मी. पिंपळगाव- ८मि.मी. वरखेडी-८ मि.मी. आज सरासरी ११.२८ मि.मी. सरासरी-१५५.६६मि.मी. पाऊस झाला आहे.

भडगाव तालुक्यात पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पिकांना रासायनिक खते देणे शेतकऱ्यांनी सुरू केले. कपाशी, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर आदी पिकांची बैलजोडी वा टिलरने कोळपणी करतांना शेतकरी दिसून आले.

चौकट

नगरदेवळा

नगरदेवळा परिसरात ८ रोजी रात्रभर भीज पाऊस झाल्याने, करपत चाललेल्या नवजात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. अग्नावती मध्यम प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ रोजी रात्री १३ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १२२ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेपर्यंत २७७ मि.मी. पाऊस झालेला होता. परिणामी, तब्बल १५० मि.मी.च्या तुटीसह धरणातही शून्य टक्के साठा असल्याने परिसरावर संकटाचे सावट कायम आहे.

पाळधी

पाळधी, ता.जामनेर येथे पावसाने दमदार सुरुवात केल्याने पाळधीसह परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तर शेती कामाला वेग आला आहे

पहूर, ता जामनेर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पिकांना संजीवनी मिळाल्याने चैतन्य पूर्ण वातावरण निर्माण झाले.

वाघडू, ता. चाळीसगाव येथील परिसरात गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांपासून भीज पाऊस झाल्याने करपत चाललेल्या पिकांना संजीवनीच

मिळाली आहे.

आडगाव

आडगाव, ता. चाळीसगाव परिसरात फक्त आभाळामाया आडगाव आणि परिसरात सकाळपासून नुसती आभाळ माया सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस पावसाचे त्यातील दोन दिवस नेहमीप्रमाणे कोरडे गेले पुढील दोन दिवसात तरी जोरदार पाऊस येईल काय अशी आस बळीराजाला लागून आहे.

चौकट

पारोळा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट कायम

पारोळा : पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट कायम आहे. तालुक्यात जूनमध्ये दोन तीन वेळा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या ८ ते १० दिवसांपासून वरुण राजा रुसल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. तालुक्यात १२२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कपाशी पिकाची ही बिकट अवस्था झाली आहे. विहिरीला पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी ही देत येत नाही. कृषिपंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. अनेक ठिकाणी कोवळे पिके उन्हामुळे कोमजत आहे. तर त्यांना चुहा पाणी देऊन वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.