शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:13 IST

जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन झाले. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागात दुबार पेरणीचे ...

जळगाव : जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाचे सुखद आगमन झाले. यामुळे खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. काही भागात दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नगरदेवळा येथे रात्रभर भीजपाऊस झाला.

पाचोरा

पाचोरा तालुक्यात मध्यम पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे. तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आही आणि तूर्त दुबार पेरणीचे संकट टळले आहे. काल तालुक्यातील मंडळनिहाय पडलेला पाऊस पाचोरा -८मि.मी. नांद्रा-२मि.मी. नगरदेवळा-१३मि.मी. गाळण - ३५मि.मी. कुऱ्हाड -५ मि.मी. पिंपळगाव- ८मि.मी. वरखेडी-८ मि.मी. आज सरासरी ११.२८ मि.मी. सरासरी-१५५.६६मि.मी. पाऊस झाला आहे.

भडगाव तालुक्यात पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. शुक्रवारी पिकांना रासायनिक खते देणे शेतकऱ्यांनी सुरू केले. कपाशी, ज्वारी, मका, बाजरी, सोयाबीन, मुग, उडीद, तूर आदी पिकांची बैलजोडी वा टिलरने कोळपणी करतांना शेतकरी दिसून आले.

चौकट

नगरदेवळा

नगरदेवळा परिसरात ८ रोजी रात्रभर भीज पाऊस झाल्याने, करपत चाललेल्या नवजात पिकांना जीवदान मिळाले आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. अग्नावती मध्यम प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ रोजी रात्री १३ मि.मी. पावसाची नोंद झाली. एकूण १२२ मि.मी. पाऊस झाला. गतवर्षी याच तारखेपर्यंत २७७ मि.मी. पाऊस झालेला होता. परिणामी, तब्बल १५० मि.मी.च्या तुटीसह धरणातही शून्य टक्के साठा असल्याने परिसरावर संकटाचे सावट कायम आहे.

पाळधी

पाळधी, ता.जामनेर येथे पावसाने दमदार सुरुवात केल्याने पाळधीसह परिसरातील खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.तर शेती कामाला वेग आला आहे

पहूर, ता जामनेर येथे शुक्रवारी दुपारी झालेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला आहे. पिकांना संजीवनी मिळाल्याने चैतन्य पूर्ण वातावरण निर्माण झाले.

वाघडू, ता. चाळीसगाव येथील परिसरात गुरुवार व शुक्रवार अशा दोन दिवसांपासून भीज पाऊस झाल्याने करपत चाललेल्या पिकांना संजीवनीच

मिळाली आहे.

आडगाव

आडगाव, ता. चाळीसगाव परिसरात फक्त आभाळामाया आडगाव आणि परिसरात सकाळपासून नुसती आभाळ माया सुरू आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार चार दिवस पावसाचे त्यातील दोन दिवस नेहमीप्रमाणे कोरडे गेले पुढील दोन दिवसात तरी जोरदार पाऊस येईल काय अशी आस बळीराजाला लागून आहे.

चौकट

पारोळा तालुक्यात दुबार पेरणीचे संकट कायम

पारोळा : पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीचे संकट कायम आहे. तालुक्यात जूनमध्ये दोन तीन वेळा मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यात बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या होत्या. गेल्या ८ ते १० दिवसांपासून वरुण राजा रुसल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला आहे. तालुक्यात १२२ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. मे महिन्यात लागवड झालेल्या कपाशी पिकाची ही बिकट अवस्था झाली आहे. विहिरीला पाणी असून विद्युत पुरवठा नसल्याने पिकांना पाणी ही देत येत नाही. कृषिपंपाना २४ तास विद्युत पुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे. अनेक ठिकाणी कोवळे पिके उन्हामुळे कोमजत आहे. तर त्यांना चुहा पाणी देऊन वाचविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.