शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्लॅस्टिकबंदीचा कापड व्यवसायाला फटका; साड्या, कपड्यांवर धूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 12:35 IST

हाताळल्याने डाग लागून माल पडून राहण्याची भीती

ठळक मुद्देबंदीबाबत अधिकारी-कर्मचारीच संभ्रमातप्लॅस्टिक काढून विक्री

विजयकुमार सैतवालजळगाव : प्लॅस्टिकबंदीमुळे साड्या, तयार कपडे प्लॅस्टिकमध्ये ठेवण्यास अडचणी येऊ लागल्या असून त्याचा कापड व्यवसायास मोठा फटका बसत असल्याचे चित्र कापड बाजारात आहे. यामुळे कपड्यांवर धूळ बसण्यासह ग्राहकांनी हाताळल्याने त्यास डाग लागून ते खराब होण्याची भीती असल्याने कापड व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.पर्यावरणाच्या दृष्टीने प्लॅस्टिकबंदीचा निर्णय योग्य असल्याचे सांगून त्याचे स्वागतही केले जात आहे. मात्र त्याचा विविध व्यवसायावर परिणाम होऊ लागल्याचेही चित्र आहे. यामध्ये या बंदीचा थेट परिणाम कापड व्यवसायावरही होत आहे. कापड व्यवसायातील साड्या असो की तयार कपडे यावर धूळ बसू नये व ग्राहकांना दाखविताना त्यास हात लागून ते खराब होऊ नये म्हणून ते प्लॅस्टिकमध्येच ठेवावे लागतात. मात्र कपड्यांचे धूळ-मातीपासून संरक्षण करणाऱ्या प्लॅस्टिकवर बंदी आल्याने कापड व्यावसायिक चिंतीत आहेत.बंदीबाबत अधिकारी-कर्मचारीच संभ्रमातप्लॅस्टिकबंदीमध्ये कोणत्याही आवरणासाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक ५० मायक्रॉनपेक्षा जास्त असावे, असे निर्देश आहे. त्यानुसार साड्या, कपडे यांचे आवरण हे ५० मायक्रॉनपेक्षा जास्तच असते, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. असे असले तरी कारवाई करताना हे प्लॅस्टिकही चालणार नाही, असे सांगून अधिकारी, कर्मचारी या प्लॅस्टिक वापराबाबतही बंदी घालत असल्याच्या तक्रारी काही व्यावसायिकांच्या आहे. नेमके कोणते प्लॅस्टिक अथवा नॉन व्होन बॅग चालतील याबाबत अधिकारी, कर्मचारीच संभ्रमात असल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.कपडे खराब झाल्यास काय करावेप्लॅस्टिकबंदीत साड्या, तयार कपडे, शेरवाणी, कोट, अशा महागड्या कपड्यांसह सर्वच कपड्यांवरील प्लॅस्टिक आवरण काढण्यास सांगितले जात असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. हे आवरण काढल्यास या महागड्या कपड्यांवर धूळ बसून ते खराब होऊ शकतात. सोबतच दररोज ग्राहकांना दाखविताना ते दिवसातून कितीतरी वेळा हाताळले जाऊन त्यास डाग लागण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा खराब झालेल्या साड्या, कपडे ग्राहक घेणार नाही की कंपनी परत घेणार नाही, त्यामुळे त्यांचे काय करावे, असा प्रश्न व्यावसायिकांपुढे पडला आहे.प्लॅस्टिक काढून विक्रीस्थानिक अधिकारी-कर्मचारी संभ्रमात असले तरी कापड विक्रीबाबत इतर शहरातील संघटनांकडून आलेल्या सूचनांनुसारप्लॅस्टिक बाहेर जाऊ नये म्हणून व्यावसायिकानीच साडी, कपडे विक्री नंतर ते देताना त्यावरील आवरण काढून घ्यावे असे सूचित करण्यात आले आहे.ग्राहक नाराजव्यावसायिक वेठीस, संभ्रमाबाबत पालकमंत्र्यांना साकडेकारवाई करताना अधिकारी-कर्मचारी दुकानात आल्यानंतर एखाद्या गुन्हेगाराच्या घर अथवा दुकानाची झडती घेतात, त्याप्रमाणे झडती घेत असल्याचा आरोप एका व्यावसायिकाने केला आहे. दोन दिवसांपूर्वीच दुकानातील सर्वत्र शोधाशोध करीत वेठीस धरण्यात आल्याचा प्रकार घडल्याने संबंधित व्यावसायिकाने थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून अधिकाºयांना कशावर बंदी आहे व कशावर नाही याबाबत सूचना देण्याची विनंती केली.कापड व्यवसायातील प्लॅस्टिकचे आवरण काढल्यास साडी व इतर कपड्यांवर धूळ बसण्यासह ग्राहकांनी हाताळून ते खराब होतील. त्यामुळे त्यांचे काय करावे, असा प्रश्न आहे. प्लॅस्टिकबंदीबाबत अधिकारी, कर्मचाºयांचा संभ्रम दूर होणे गरजेचे आहे.- भरत समदडिया, कापड व्यावसायिक.प्लॅस्टिकबंदीमुळे कपडे, साड्या खराब होण्याची भीती असून यामुळे ग्राहकही नाराजी व्यक्त करीत आहे. खराब माल ग्राहकही घेणार नाही व त्याचा फटका व्यावसायिकांनाच बसेल.- किरण फिरके, कापड व्यावसायिक.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीJalgaonजळगाव