शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

१०० टक्के निधी खर्च करण्यासाठी "नियोजन"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अगोदर कपात होऊन नंतर शंभर टक्के उपलब्ध झालेला जिल्हा विकास योजनेतील निधीदेखील १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे अगोदर कपात होऊन नंतर शंभर टक्के उपलब्ध झालेला जिल्हा विकास योजनेतील निधीदेखील १०० टक्के खर्च करण्यासाठी नियोजन विभागात लगबग सुरू आहे. प्राप्त ३७५ कोटी रुपयांपैकी जवळपास २५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित निधीदेखील वाटपासाठी नियोजन करून खर्च करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे अगोदर कोरोना व नंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेला निधी मिळाल्याने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मावळत्या आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे वार्षिक योजनांच्या निधीमध्ये राज्याने ६७ टक्के कपात करीत केवळ ३३ टक्केच निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यासाठी एकूण मंजूर ३७५ कोटींच्या निधीपैकी केवळ १२३ कोटी रुपयांचाच निधी जिल्ह्यासाठी मिळणार होता. त्यातही यापैकी ५० टक्के निधी हा कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोरोनाला प्राधान्य देत उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला. नंतर निधी वापरावरील बंधने शिथिल झाली तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे निधीला प्रशासकीय मान्यताही देणे शक्य झाले नाही.

त्यानंतर मात्र आलेला संपूर्ण ३७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागांकडून धावपळ सुरू झाली. त्यात आय-पास प्रणाली सक्तीची करण्यात आल्याने त्याद्वारेच संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागत असल्याने मोठी तारांबळ उडत आहे. पूर्वी वेगवेगळ्या विभागातून फाईल आल्या की त्यांना मंजुरी दिली जात होती. मात्र, आता संपूर्ण प्रक्रिया आय-पास प्रणालीद्वारे हवी असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

३७५ कोटींपैकी २५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित १२५ कोटी रुपयेदेखील ३१ मार्चपर्यंत वाटप होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.