शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

१०० टक्के निधी खर्च करण्यासाठी "नियोजन"

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनामुळे अगोदर कपात होऊन नंतर शंभर टक्के उपलब्ध झालेला जिल्हा विकास योजनेतील निधीदेखील १०० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनामुळे अगोदर कपात होऊन नंतर शंभर टक्के उपलब्ध झालेला जिल्हा विकास योजनेतील निधीदेखील १०० टक्के खर्च करण्यासाठी नियोजन विभागात लगबग सुरू आहे. प्राप्त ३७५ कोटी रुपयांपैकी जवळपास २५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित निधीदेखील वाटपासाठी नियोजन करून खर्च करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे अगोदर कोरोना व नंतर ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकलेला निधी मिळाल्याने त्याचा पुरेपूर उपयोग करून घेण्याचे नियोजन केले जात आहे.

मावळत्या आर्थिक वर्षात कोरोना संसर्गामुळे वार्षिक योजनांच्या निधीमध्ये राज्याने ६७ टक्के कपात करीत केवळ ३३ टक्केच निधी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यासाठी एकूण मंजूर ३७५ कोटींच्या निधीपैकी केवळ १२३ कोटी रुपयांचाच निधी जिल्ह्यासाठी मिळणार होता. त्यातही यापैकी ५० टक्के निधी हा कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी प्राधान्याने उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार कोरोनाला प्राधान्य देत उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध करून दिला. नंतर निधी वापरावरील बंधने शिथिल झाली तरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहितेमुळे निधीला प्रशासकीय मान्यताही देणे शक्य झाले नाही.

त्यानंतर मात्र आलेला संपूर्ण ३७५ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यासाठी सर्वच विभागांकडून धावपळ सुरू झाली. त्यात आय-पास प्रणाली सक्तीची करण्यात आल्याने त्याद्वारेच संपूर्ण प्रक्रिया राबवावी लागत असल्याने मोठी तारांबळ उडत आहे. पूर्वी वेगवेगळ्या विभागातून फाईल आल्या की त्यांना मंजुरी दिली जात होती. मात्र, आता संपूर्ण प्रक्रिया आय-पास प्रणालीद्वारे हवी असल्याने त्याची अंमलबजावणी केली जात आहे.

३७५ कोटींपैकी २५० कोटी रुपयांचे वाटप झाले असून उर्वरित १२५ कोटी रुपयेदेखील ३१ मार्चपर्यंत वाटप होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.