शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST

इन्फो : अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत : आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते ...

इन्फो :

अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत :

आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते पाच खड्डे पडलेेले दिसून आले. यापुढे रस्त्यावरून जाताना मार्गात अनेक ठिकाणी लहान-मोेठे खड्डे पडलेले दिसून आले. तर अग्रवाल चौकात रस्त्यात आणि रस्त्याच्या बाजूला लांबीला तीन ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून भली मोठी डाब साचली असून, वाहनधारकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. या कोंडीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयाचा हा परिसर असल्याने, विद्यार्थांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

इन्फो :

आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध खड्डे :

अग्रवाल चौकाकडून पुढे शिवकॉलनीकडे जाताना आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध चार ते पाच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसून आले. पाच ते सहा इंचापर्यंत हे खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी हा रस्ता चांगला असला तरी, शिवकॉलनी रिक्षा थांब्याजवळील चौकातही ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसून आले. तसेच काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसून आले. त्यात खड्ड्यातील दगड-गोटेवर आल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो :

साईडपट्ट्या गेल्या खड्ड्यात

आकाशवाणी चौकापासून ते दादावाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या खाली पाच ते सहा इंचापर्यंत खाली गेलेल्या दिसून आल्या. रस्त्याच्या खाली साईडपट्ट्या गेल्यामुळे दुचाकी वाहन घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवकॉलनी जवळ तर रस्त्याच्या साईडपट्टी १० ते १२ इंचापर्यंत खोल गेलेली दिसून आली. यामुळे वाहनधारक या साईडपट्टीचा खड्डा पाहून वाहने संथ गतीने वाहन चालवित असल्याचे दिसून आले. या मार्गावरून दोन्ही बाजूला साईडपट्ट्याची प्रचंड दुरवस्था दिसून आली.

इन्फो :

तर महामार्ग प्रशासनाने खड्डे तरी बुजवावे :

गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, हे सर्वांना माहिती आहे. तसेच या कामामुळेच रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने चौपदरीकरण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या स्थितीला महामार्गावरचे खड्डे तरी बुजविणे गरजेचे आहे. मात्र, खड्ड्यांकडे महामार्ग प्रशासनाने आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.