शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महामार्गावरील खड्डे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:21 IST

इन्फो : अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत : आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते ...

इन्फो :

अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरत :

आकाशवाणी चौकाकडून अग्रवाल चौकाकडे जाताना आकाशवाणी चौकातच रस्त्याच्या मधोमध जागोजागी चार ते पाच खड्डे पडलेेले दिसून आले. यापुढे रस्त्यावरून जाताना मार्गात अनेक ठिकाणी लहान-मोेठे खड्डे पडलेले दिसून आले. तर अग्रवाल चौकात रस्त्यात आणि रस्त्याच्या बाजूला लांबीला तीन ते पाच फुटांपर्यंत खड्डे पडलेले दिसून आले. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तुंबून भली मोठी डाब साचली असून, वाहनधारकांना या ठिकाणाहून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तसेच या खड्ड्यांमुळे दिवसभर वाहतूक कोंडी उद्भवत आहे. या कोंडीमुळे रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे शाळा-महाविद्यालयाचा हा परिसर असल्याने, विद्यार्थांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहेत.

इन्फो :

आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध खड्डे :

अग्रवाल चौकाकडून पुढे शिवकॉलनीकडे जाताना आयटीआय समोर रस्त्याच्या मधोमध चार ते पाच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले दिसून आले. पाच ते सहा इंचापर्यंत हे खड्डे असल्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी हा रस्ता चांगला असला तरी, शिवकॉलनी रिक्षा थांब्याजवळील चौकातही ठिकठिकाणी खड्डे पडलेले दिसून आले. तसेच काही ठिकाणी रस्ता खचलेला दिसून आले. त्यात खड्ड्यातील दगड-गोटेवर आल्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे.

इन्फो :

साईडपट्ट्या गेल्या खड्ड्यात

आकाशवाणी चौकापासून ते दादावाडीपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या अनेक ठिकाणी रस्त्याच्या खाली पाच ते सहा इंचापर्यंत खाली गेलेल्या दिसून आल्या. रस्त्याच्या खाली साईडपट्ट्या गेल्यामुळे दुचाकी वाहन घसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवकॉलनी जवळ तर रस्त्याच्या साईडपट्टी १० ते १२ इंचापर्यंत खोल गेलेली दिसून आली. यामुळे वाहनधारक या साईडपट्टीचा खड्डा पाहून वाहने संथ गतीने वाहन चालवित असल्याचे दिसून आले. या मार्गावरून दोन्ही बाजूला साईडपट्ट्याची प्रचंड दुरवस्था दिसून आली.

इन्फो :

तर महामार्ग प्रशासनाने खड्डे तरी बुजवावे :

गेल्या दोन वर्षांपासून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे, हे सर्वांना माहिती आहे. तसेच या कामामुळेच रस्त्यांची अधिकच दुरवस्था होऊन, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने चौपदरीकरण होईल तेव्हा होईल, मात्र सध्या स्थितीला महामार्गावरचे खड्डे तरी बुजविणे गरजेचे आहे. मात्र, खड्ड्यांकडे महामार्ग प्रशासनाने आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी सोयीस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप शिवकॉलनी परिसरातील नागरिकांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.